शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

बियाण्यांच्या उगवणक्षमतेची सर्वस्वी जबाबदारी कृषी विक्रेत्यांवर का? कंपन्यांवर का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 14:03 IST

Amravati News बियाणे विक्रेता हा बियाणे उत्पादन कंपनी व शेतकरी यांच्यातील फक्त मध्यस्ती आहे. निकृष्ट बियाणे व बियाण्यांच्या उगवणक्षमतेची सर्वस्वी जबाबदारी कृषी विक्रेत्यावरच कां, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची बाजारात बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सोयाबीन बियाणे विक्री करताना, कृषी केंद्रावर प्रशासनाने अनेक निर्बंध लादले आहेत. बियाणे विक्रेता हा बियाणे उत्पादन कंपनी व शेतकरी यांच्यातील फक्त मध्यस्ती आहे. निकृष्ट बियाणे व बियाण्यांच्या उगवणक्षमतेची सर्वस्वी जबाबदारी कृषी विक्रेत्यावरच कां, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

             राज्याच्या कृषी विभागाने बियाणे उत्पादन कंपण्या, प्रमाणीकरण यंत्रणा व कृषी विभाग यांचा बियाण्यांशी काहीच संबंध नाही का? खरंतर शेतकऱ्यांच्या शेतावर बीजोत्पादनाचा कार्यक्रम बियाणे कंपनी राबविते. सदर बियाण्यांवर प्रक्रिया करून ते बियाणे शासनाच्या, बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली पिशवीत सीलबंद केल्या जाते. या पिशवीवरील टॅगवर बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा शिक्का, तसेच संबंधित यंत्रणेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांची स्वाक्षरीसुध्दा असते. एवढ्यावरच ही बाब थांबत नाही, तर पिशवीत सीलबंद बियाण्यांतील काही बियाणे, शॅम्पल म्हणून प्रमाणीकरण यंत्रणेच्या फिल्ड टेस्टींग सेंटरला पाठविण्यात येते. तेथे या शॅम्पलमधील बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी करून, त्याची शुध्दता, अानुवंशिक गुणवत्ता व उगवणक्षमतेची चाचणी केली जाते.

             या चाचण्यांमध्ये बियाणे शासनाच्या ठरलेल्या मानकानुसार, योग्य ठरले तरच सदर बियाणे विक्रीस कंपनीला परवानगी देण्यात येते. याला कृषीच्या भाषेत रिलिज ऑर्डर, असे म्हणतात. या ऑर्डरशिवाय कोणतेही बियाणे कंपनीला विकता येत नाही. प्रमाणीकरण यंत्रणेच्या सर्व चाचण्यांमध्ये खरे उतरलेले मान्यताप्राप्त बियाणेच, संबंधित कंपनीकडून प्राप्त झाल्यानंतरच बियाणे विक्रेता याची विक्री दुकानातून करू शकतो. एवढे सोपस्कार पूर्ण करून विक्रीस आलेले बियाणे बोगस कसे? समजा हे बियाणे बोगस किंवा सदोष असतील तर याला जबाबदार बियाणे विक्री करणारा दुकानदारच का? याला बियाणे कंपनी, प्रमाणीकरण यंत्रणा व कृषी विभागही तितकाच जबाबदार आहे. मग हे सर्व या जबाबदारीपासून दूर का पळतात. हे सर्व बियाण्याची सर्वस्वी जबाबदारी का स्वीकारत नाहीत? ज्याआर्थी कंपनी, प्रमाणीकरण यंत्रणा व कृषी विभाग ही जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. तेव्हाच या बियाणे व्यवहारात कंपनी, प्रमाणीकरण यंत्रणा व कृषी विभाग यांच्यातच बियाण्यांच्या बाबतीत गडबड केली जाते. यांची काहीतरी मिलिभगत आहे. हे यांच्या जबाबदारी झटकण्यावरून स्पष्ट होते.

             बियाणे विक्रेत्यांवर लादलेल्या अटींमुळे विक्रेते सोयाबीन बियाणे अत्यल्प प्रमाणात विक्रीकरीता आणत आहेत. यामुळे बाजारात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे बियाणे कंपन्यांना मागणी असलेल्या बियाण्यांच्या भाववाढीला वाव मिळत आहे. यावरून शासकीय यंत्रणा विक्रेत्यांना वेठीस धरून,बियाणे दर वाढीसाठी कंपन्यांना अप्रत्यक्ष मदतच करीत आहेत असे दिसून येते. शासन व सर्व शासकीय यंत्रणांच्या परवानगीने सोयाबीनचे लेबलचे बियाणे विकल्या जाते. संशोधित बियाण्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या, या बियाण्याला शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे.याच बियाण्यांमध्ये सर्वाधिक सदोष बियाण्याची शक्यता असते. तरी सुध्दा अशा बियाणांना शासकीय यंत्रणांकडून विक्रीस परवानगी मिळते.

टॅग्स :agricultureशेती