शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

अकरावीसाठी विद्यार्थ्यांना ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर, सीईटी परीक्षेने वाढविली विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता अमरावती : ना शाळा, ना परीक्षा तरीही दहावीचा ...

दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर, सीईटी परीक्षेने वाढविली विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता

अमरावती : ना शाळा, ना परीक्षा तरीही दहावीचा १०० टक्के निकाल लागला. आता खरी परीक्षा अकरावी प्रवेशासाठी सीईटीतून होणार आहे. निकाल फुगल्याने प्रवेशासाठी गर्दी होईल, यात दुमत नाही. मात्र, जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशा स्थितीत अकरावीसाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळतील, अशी शक्यता आहे.

गत काही वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अमरावती शहरात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकूण ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १५३६० प्रवेशाची क्षमता आहे. त्याअनुषंगाने गतवर्षी १०९३५ जागांवर प्रवेश देण्यात आला. ४४०७ जागांवर प्रवेश रिक्त होता. यावर्षी मात्र दहावीचा निकाल जोरात असल्याने अकरावी प्रवेशासाठी आपसूकच विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. सीईटी परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण मिळविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहजतेने नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळेल, अशी माहिती आहे.

----------------------

अमरावती शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ६३

एकूण जागा : १५३६०

गतवर्षी किती अर्ज आले? : १०९३५

किती जणांनी प्रवेश घेतला? : १०९३५

किती जागा रिक्त राहिल्या? : ४४०७

------------------

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

दहावीचा निकाल फुगला असला तरी शहरी भागात नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात सीईटी परीक्षा देणे ‘ढ’ मुलांना शक्य नाही. त्यामुळे अकरावीत प्रवेशही मिळावा आणि शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये, यासाठी नजीकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा कल आहे.

----------------

म्हणून घेणात गावात प्रवेश

शहरी भागात शिक्षणाचा खर्च झेपत नाही. त्यामुळे गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेशाला पसंती दिली जाणार आहे. खासगी शिकवणी, रूम भाड्याने करून राहणे हे शक्य होणार नाही. त्यापेक्षा घरच्या भाकरीवर दहावीनंतर शिक्षण गावातच बरे राहील.

- प्रमोद मेश्राम, विद्यार्थी

----------------

शहरात शिक्षणासाठी जावे, अशी मनोमन इच्छा आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेही आईला शेतीकामासाठी हातभार लावावा लागतो. त्यामुळे घराबाहेर शिक्षणासाठी जाणे मला संयुक्तिक ठरणारे आहे. गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करेल.

- पुष्पा मगर, विद्यार्थिनी.

------------

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेश व्हावेत

ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रणालीने अकरावी प्रवेश प्रक्रिया न राबविता ती केंद्रीय प्रवेश समितीने राबविल्यास सुकर होईल. अवघ्या ५० रुपयांच्या अर्जाद्वारे अकरावीत प्रवेश दिला जाईल. मागील १४ वर्षात हीच प्रक्रिया राबविली जात होती.

- अरविंद मंगळे, शिक्षणतज्ज्ञ

-----

विद्यार्थ्यांना विनाअडथळ्यांनी अकरावीत प्रवेश मिळावा, अशीच प्रणाली शिक्षण विभागाने राबविली पाहिजे. अगोदर कोरोनाने विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत. प्रवेशासाठी मारामार हाेता कामा नये. यंदा निकालाचा टक्का वाढल्याने प्रवेशाच्या जागादेखील वाढविण्यात याव्यात.

- प्रशांत राठी, संस्थाचालक.