शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांना ओढा ग्रामीण भागाकडे कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST

दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर, सीईटी परीक्षेने वाढविली विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता अमरावती : ना शाळा, ना परीक्षा तरीही दहावीचा ...

दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर, सीईटी परीक्षेने वाढविली विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता

अमरावती : ना शाळा, ना परीक्षा तरीही दहावीचा १०० टक्के निकाल लागला. आता खरी परीक्षा अकरावी प्रवेशासाठी सीईटीतून होणार आहे. निकाल फुगल्याने प्रवेशासाठी गर्दी होईल, यात दुमत नाही. मात्र, जागा कमी आणि विद्यार्थी जास्त अशा स्थितीत अकरावीसाठी विद्यार्थी ग्रामीण भागाकडे वळतील, अशी शक्यता आहे.

गत काही वर्षांपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. अमरावती शहरात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेच्या अकरावी प्रवेशासाठी एकूण ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १५३६० प्रवेशाची क्षमता आहे. त्याअनुषंगाने गतवर्षी १०९३५ जागांवर प्रवेश देण्यात आला. ४४०७ जागांवर प्रवेश रिक्त होता. यावर्षी मात्र दहावीचा निकाल जोरात असल्याने अकरावी प्रवेशासाठी आपसूकच विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार आहे. सीईटी परीक्षेत चांगल्या प्रकारे गुण मिळविणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहजतेने नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळेल, अशी माहिती आहे.

----------------------

अमरावती शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ६३

एकूण जागा : १५३६०

गतवर्षी किती अर्ज आले? : १०९३५

किती जणांनी प्रवेश घेतला? : १०९३५

किती जागा रिक्त राहिल्या? : ४४०७

------------------

अकरावीसाठी गावात प्रवेश का?

दहावीचा निकाल फुगला असला तरी शहरी भागात नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात सीईटी परीक्षा देणे ‘ढ’ मुलांना शक्य नाही. त्यामुळे अकरावीत प्रवेशही मिळावा आणि शैक्षणिक वर्षही वाया जाऊ नये, यासाठी नजीकच्या गावातील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचा कल आहे.

----------------

म्हणून घेणात गावात प्रवेश

शहरी भागात शिक्षणाचा खर्च झेपत नाही. त्यामुळे गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेशाला पसंती दिली जाणार आहे. खासगी शिकवणी, रूम भाड्याने करून राहणे हे शक्य होणार नाही. त्यापेक्षा घरच्या भाकरीवर दहावीनंतर शिक्षण गावातच बरे राहील.

- प्रमोद मेश्राम, विद्यार्थी

----------------

शहरात शिक्षणासाठी जावे, अशी मनोमन इच्छा आहे. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच आहे. तसेही आईला शेतीकामासाठी हातभार लावावा लागतो. त्यामुळे घराबाहेर शिक्षणासाठी जाणे मला संयुक्तिक ठरणारे आहे. गावातील कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करेल.

- पुष्पा मगर, विद्यार्थिनी.

------------

केंद्रीय प्रवेश समितीद्वारे प्रवेश व्हावेत

ऑफलाईन किंवा ऑनलाईन प्रणालीने अकरावी प्रवेश प्रक्रिया न राबविता ती केंद्रीय प्रवेश समितीने राबविल्यास सुकर होईल. अवघ्या ५० रुपयांच्या अर्जाद्वारे अकरावीत प्रवेश दिला जाईल. मागील १४ वर्षात हीच प्रक्रिया राबविली जात होती.

- अरविंद मंगळे, शिक्षणतज्ज्ञ

-----

विद्यार्थ्यांना विनाअडथळ्यांनी अकरावीत प्रवेश मिळावा, अशीच प्रणाली शिक्षण विभागाने राबविली पाहिजे. अगोदर कोरोनाने विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत. प्रवेशासाठी मारामार हाेता कामा नये. यंदा निकालाचा टक्का वाढल्याने प्रवेशाच्या जागादेखील वाढविण्यात याव्यात.

- प्रशांत राठी, संस्थाचालक.