शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष, भारतीय संघ आशिया कपमध्ये खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
2
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
3
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
4
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
5
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
6
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
7
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
8
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
9
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
10
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
11
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
12
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
13
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
14
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
15
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
16
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
17
पाक हेर ज्योती व ओडिशाच्या यूट्यूबरच्या संबंधाची चौकशी
18
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
19
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
20
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका

सार्वजनिक समस्या सोडविणार कोण?

By admin | Updated: August 2, 2015 00:33 IST

साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी ...

लोकप्रतिनिधींची अनास्था : धुळीस मिळाले साखर कारखान्याचे स्वप्नअंजनगाव सुर्जी : साठ हजार लोक वस्तीचे शहर आणि दीड लाख लोक वस्तीचा ग्रामीण भाग असा दोन लाखांच्याही वर लोक संख्येचा भार वाहणारा अंजनगाव सुर्जी तालुका अजूनही सार्वजनिक समस्यांच्या समाधानासाठी योग्य नेत्याची वाट पाहत आहे. अकोट, दर्यापूर व परतवाडा या तीनही शहरांच्या मध्यभागी तीस किलोमीटरच्या समान अंतरावर असलेले अंजनगाव सुर्जी आजही एसटी आगारापासून वंचित आहे. दररोज शंभरच्यावर बसफेऱ्या येथून लांब पल्ल्याच्या गावांपर्यंत जातात. अमरावती व अकोला मार्गावर भारी वाहतूक असून एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहनेसुध्दा प्रवाशांनी खचून भरलेली असतात. खेडे पाड्यातून शिकण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना एसटी पासेससाठी ताटकळावे लागते. प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंंबून रहावे लागते. घरी लग्न समारंभ असला तर विनाकारण आजूबाजूच्या डेपोचे जाण्यायेण्याचे साठ किलोमिटरचे एसटीचे भाडे भरावे लागते. पन्नास वर्षे उलटूनसुध्दा एकाही आमदाराला ही समस्या सोडविता आली नाही. अंबादेवी साखर कारखान्याचे स्वप्न आता माती मोल झाले आहे. काळी कसदार शेती, सिंचनाच्या सोयी व उसाचे भरघोस उत्पन्नाची हमी असलेल्या तालुक्यात मोठ्या थाटामाटाने उभारलेला अंबा साखर कारखाना राजकीय हेवेदाव्यांमुळे कायमचा बुडाला आहेत. ज्या शिखर बँकेने हा कारखाना अवसायनात काढून विकला त्या घेणाऱ्या कंपनीचे नाव आणि कार्यालय रहस्यमय आहे आणि दिलेल्या मुंबईच्या पत्त्यावर कंपनीचे कार्यालय बेपत्ता आहे. येथील ग्रामीण रुग्णालय स्थापनेपासूनच समस्याग्रस्त असून केवळ तीस खाटांच्या भरवश्यावर आणि अपुऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आधारे आपले दिवस काढत आहेत. गावाच्या परिसरात एखादा मोठा अपघात झाला किंवा कुणी व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याला येथे कोणत्याच सुविधा नाहीत. जिल्ह्याचे ठिकाणी नेताना अनेक गंभीर व्यक्ती रस्त्यातच दगावल्या आहेत. मृत महिलांच्या शव विच्छेदनासाठी अथवा महिला वर्गाच्या शस्त्रक्रियेसाठी येथे महिला डॉक्टर उपलब्ध नसून वेळप्रसंगी खासगी महिला डॉक्टराला अथवा आजुबाजूच्या तालुक्यातून महिला डॉक्टरला बोलवावे लागते. उपजिल्हा रुग्णालयासाठी येथील ग्रामीण रुग्णालय आतुरतेने प्रतीक्षेत आहे.