शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१०० रूपयांत डाळ मिळते तरी कोठे ?

By admin | Updated: November 10, 2015 00:24 IST

ऐन सणासुदीच्या काळात तूरडाळीसह अन्य वस्तूंचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

गृहिणींचा सवाल : शासनाचे आश्वासन हवेत विरलेअमरावती : ऐन सणासुदीच्या काळात तूरडाळीसह अन्य वस्तूंचे दर वाढल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. १८० रुपयांवर पोहोचलेली तूरडाळ १०० रुपयांमध्ये विक्री करण्याचे निर्देश अन्न व पुरवठा मंत्र्याकडून दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात कोठेही डाळीचे दर उतरलेले नाहीत. त्यामुळे सरकारी आश्वासन हवेत विरल्याची गृहिणींची भावना असून सरकारने फसगत केल्याची संतप्त प्रतिक्रिया गृहिणी व्यक्त करू लागल्या आहेत. मुंबईमध्ये भाजपकडून १०० रूपये प्रतिकिलोप्रमाणे तूर डाळीची विक्री करण्यात आली. अमरावतीमध्येही तो प्रयोग राबवावा, अशी मागणी होत आहे. दोन दिवसांपूर्वी युवक काँग्रेसने डाळवाटपाचा फार्स केला होता. असा फार्स न करता राजकीय पक्षांनी डाळीचे दर आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधिशांवर दबाव आणावा, तूर डाळीचे दर पूर्वीप्रमाणेच रहावेत, साठेबाजीवर नियंत्रण ठेवावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. आदेशात सुस्पष्टता नाहीअमरावती : माध्यमांमध्ये ‘यापुढे १०० रु. दराने डाळ विक्री’ असे बापटांचे वक्तव्य आल्याने अनेक गृहिणींनी १०० रूपयांमध्ये डाळ विक्री कुठे सुरू आहे, याबाबत विचारणा केली. मात्र त्यांना अशा स्टॉल संदर्भात माहिती मिळू शकली नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी १००-१२० रुपये प्रति किलो तुरडाळ देण्याची फक्त घोषणाच करण्यात आली. घोषणेच्या चार दिवसानंतर जप्त केलेला माल संबंधित व्यापाऱ्यांना परत दिल्यानंतरही तुरडाळीचे दर १७०-१८० च्या घरात आहेत. डी मार्ट सारख्या मोठ्या मार्केटमधून तुरडाळीचे दर गगनाला भिडणारेच आहेत. तुरीचे उत्पादन ३० टक्क्यांपेक्षा कमी असताना डाळीचे दर आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस उपाययोजना केली नाही, अशा शब्दात केंद्राने राज्याचे कान टोचले होते. स्वस्त धान्य दुकानातून तुरडाळीचे वितरण करावे, अशा सूचना केंद्राने राज्याला दिले होत्या. मात्र त्या सुचनेची अंमलबजावणी राज्याने केली नाही. शिवसेनेने १२० रुपयांमध्ये डाळ वितरणाची भूमिका घेतल्याने श्रेयवादासाठी बुधवारपासून राज्यात १०० रु. किलोने किरकोळ विक्री करण्याचे निर्देश गिरीश बापट यांनी दिले. मात्र या आदेशात कुठेही सुस्पष्टता नव्हती. जप्त केलेल्या तुरडाळीची विक्री खुल्या बाजारात १०० रुपयांनी करावी अशा सूचना दिल्ळाची सारवासारव मग करण्यात आली. श्रेयवादाच्या या लढाईत गरीबांच्या हाती मात्र सरकारनेच ‘तुरी’ दिल्याची भावना व्यक्त केल्या गेली. डाळीसह अन्य चीज वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने संसार कसा करायचा, असा यक्षप्रश्न हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांपुढे उभा राहिला आहे. (प्रतिनिधी)