शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चौकाचौकात कचरा कंटेनर गेलेत कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 01:22 IST

शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे.

ठळक मुद्देप्रभाग स्वच्छतेची लागली वाट : कंत्राटदारांवर नियंत्रण कुणाचे?

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; यामुळे शहर स्वच्छतेची वाट लागली आहे. प्रभागनिहाय स्वच्छता कंत्राटदार करतात काय अन् यावर नियंत्रण कुणाचे, असा अमरावतीकरांचा सवाल आहे.मागील वर्षी डेंग्यू, स्वाइन फ्लू अन् स्क्रब टायफसच्या प्रकोपामुळे कित्येक नागरिकांना जीव गमवावा लागला. किंबहुना ते महापालिकेच्या आरोग्य विभागातील बेबंदशाहीचे बळी ठरले. यातून महापालिकेने काही बोध घेतला, असे दिसून येत नाही. वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची शहराच्या आमदारांनी काल-परवा पालकमंत्र्यांसमक्ष केलेली कानउघाडणी व त्यांना कायम करण्यात येणार नाही, अशी दिलेली तंबी शहराचे आरोग्य तूर्तास ठीक नसल्याचेच निदर्शक आहे. त्यामुळे उपायुक्त, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी अन् डझनावरी स्वास्थ्य निरीक्षकांची फळी करतेय काय, असा सवाल अमरावतीकरांचा आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रभाग, झोनमध्ये दिलेल्या गृहभेटी कागदोपत्रीच आहेत. सर्व आजारांचे मूळ असलेल्या डासांची उत्पत्ती थांबविण्याच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी यामध्ये सातत्य नाही. सर्व अधिकारी कंत्राटदारांचे बटीक असल्यासारखे वागतात. त्याचा साधा कर्मचारीही आरोग्य यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत.नाल्या, कच्च्या नाल्यांची नियमित स्वच्छता नाहीच. कित्येक ठिकाणी कचरा गोळा करणारे वाहन पोहचत नाही. अधिकारी, पदाधिकारी अन् नगरसेवकांना भेटीदरम्यान स्वच्छता सुरू असल्याचा केवळ दिखावा केला जातो. हेच शहराचे वास्तव आहे.जागोजागी तुंबली गटारे अन् डबकीपावसाच्या १५ दिवसांच्या झडसदृश स्थितीमुळे दोन महिन्याची सवड मिळालेल्या आरोग्य विभागाची लक्तरे वेळीवर टांगली गेली आहेत. ठिकठिकाणी तुंबलेली गटारे आणि पावसामुळे रिक्त प्लॉटमध्ये झालेली तळी आरोग्यसेवेची वाट लावणार आहे. या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये, यासाठी ना केमिकल टाकले जात, ना पाणी काढले जात आहे. अर्जुननगर ते शेगाव रस्त्यावर पाण्याच्या टाकीमागे रिक्त प्लॉटवर गटार आहे.फॉगिंगचे फोटोशेसन किती वेळा?प्रत्येक कंत्राटदाराजवळ पाच फॉगिंग मशीन अनिवार्य आहेत. ज्यावेळी पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटी होतात, त्यावेळी फॉगिंग सुरू असल्याचे फोटोशेसन केले जाते. नागरिकांच्या सह्यांचे रजिस्टर पूर्ण केले जाते. या सह्यांची व कंत्राटदाराजवळ आवश्यक पाच फॉगिंग मशीन असल्याची खातरजमा आरोग्य विभागाने केलेली नाही.फाईल चोरीपर्यंत कंत्राटदारांची मजलप्रभाग कंत्राट हे ‘राजाश्रया’ने मंजूर झालेत. यामध्ये निविदाप्रक्रिया ही लिपापोती ठरल्याचे वास्तव आहे. त्यामुळे कंत्राटदार एवढे शिरजोर झालेत की, प्रतिस्पर्ध्याची फाइल चक्क लेखाधिकाऱ्यांच्या कार्यालयातून गायब केली जाते. कोणी हा कारनामा केला, हे फुटेजमध्ये निष्पन्न झाले. कंत्राटदारांची मजल कुठवर अन् अधिकाºयांचे नियंत्रण कितपत, हा विषय प्रशासनातच नव्हे, तर शहरातदेखील चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती