शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
5
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
6
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
7
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
8
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
9
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
10
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
11
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
12
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!

सर्वांसाठी घरे कुठे? ८०० अमरावतीकरांचे घरांचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली.

ठळक मुद्देराज्यात अव्वल प्रकल्पाचे बोचरे वास्तव

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कामाच्या प्रगतीमुळे राज्यात अव्वल ठरलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घटक तीनमधील बोचरी बाजू आता समोर आली आहे. यामुळे ८०० अमरावतीकरांच्या घरांचे स्वप्न झाल्यागत स्थिती निर्माण झाली. या योजनेत मुख्य कंत्राटदारांने नेमलेल्या दुसऱ्या व त्याने सबकॉन्ट्रक्ट दिलेल्या अर्धा डझन कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने महापालिकेची गोची झाल्याचे वास्तव आहे.योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली. दरम्यान म्हसला येथील ६० सदनिकांचेच काम पूर्ण होऊ शकले. अन्य सहा कामे प्रलंबित असल्याने प्रकल्प कालावधीत ते पूर्ण होणार की नाही, याविषयी महापालिका प्रशासनात दुमत आहे. या प्रकल्पाला कोविड कालावधीमुळे ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी नागपूरच्या सब कॉन्ट्रॅक्टरने पुन्हा सहा सबकॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, नागपूरच्या कॉन्ट्रॅक्टरने इतरांचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी कामे थांबविली आहेत. प्रकल्पातील सावळा गोंघळामुळे ४०० वर नागरिकांनी त्यांचा प्रत्येकी ४९ हजारांचा डीडी परत घेतल्याने या योजनेला घरघर लागल्याची स्थिती आहे.

चार मजली इमारती, ३० चौ.मी. चटई क्षेत्रया प्रकल्पात ८६० सदनिकांसाठी १४ भूखंडावर चार मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक सदनिकेचे चटई क्षेत्र हे ३० चौ. मीटरचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांना ४९ हजारांचा डीडी महापालिकेकडे जमा करावा लागला व ड्राॅ पद्धतीनंतर नागरिकांना घराची खरेदी करून देण्यात येत आहे. तत्पूर्वी त्यांना सदनिकेचा हप्ता सहा समान किश्तीत जमा करावा लागणार आहे.

१ जानेवारीपासून दंडात्मक कारवाईया कामांच्या दिरंगाईबाबत मुंबई येथील संबंधित एजन्सीला आतापर्यंत २० मार्च २०२०,  २० जुलै २०२०व २५ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेने नोटीस बजावली आहे. आता १ जानेवारी २०२२ पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंत्राटदाराचा कुठलाच मुलाहिजा केला जाणार नसल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सबकंत्राटदारांनी थांबविले काममुख्य कंत्राटदारांला देयक मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या कंत्राटदारांना संबंधित निधी दिल्याची माहिती आहे. मात्र, या कंत्राटदाराने नेमलेल्या सहा कंत्राटदारांना बिले देण्यात न आल्यामुळे त्यांनी कामे थांबविल्याचे सांगण्यात आले. यात रहाटगाव येथील भूखंडावर कामांसाठी खड्डे खोदण्यात आल्याने लगतची घरे धोक्यात आल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना