शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सर्वांसाठी घरे कुठे? ८०० अमरावतीकरांचे घरांचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली.

ठळक मुद्देराज्यात अव्वल प्रकल्पाचे बोचरे वास्तव

गजानन मोहोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कामाच्या प्रगतीमुळे राज्यात अव्वल ठरलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या घटक तीनमधील बोचरी बाजू आता समोर आली आहे. यामुळे ८०० अमरावतीकरांच्या घरांचे स्वप्न झाल्यागत स्थिती निर्माण झाली. या योजनेत मुख्य कंत्राटदारांने नेमलेल्या दुसऱ्या व त्याने सबकॉन्ट्रक्ट दिलेल्या अर्धा डझन कंत्राटदारांनी कामे थांबविल्याने महापालिकेची गोची झाल्याचे वास्तव आहे.योजनेच्या घटक तीनमध्ये १४ भूखंडावर सामान्यांच्या स्वप्नातल्या ८६० घरांची निर्मिती करावयाची आहे. या प्रकल्पाला ११ जुलै २०१६ रोजी केंद्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. भूखंडनिहाय निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने सर्व भूखंडाची निविदा प्रसिद्ध केली असता, मुंबईच्या एका कंपनीला ६१.४९ कोटींचा कंत्राट देण्यात आला. ३ जुलै २०१८ रोजी कार्यारंभ आदेश व २४ महिन्यांची मुदत देण्यात आली. दरम्यान म्हसला येथील ६० सदनिकांचेच काम पूर्ण होऊ शकले. अन्य सहा कामे प्रलंबित असल्याने प्रकल्प कालावधीत ते पूर्ण होणार की नाही, याविषयी महापालिका प्रशासनात दुमत आहे. या प्रकल्पाला कोविड कालावधीमुळे ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. तत्पूर्वी नागपूरच्या सब कॉन्ट्रॅक्टरने पुन्हा सहा सबकॉन्ट्रॅक्ट दिले. मात्र, नागपूरच्या कॉन्ट्रॅक्टरने इतरांचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी कामे थांबविली आहेत. प्रकल्पातील सावळा गोंघळामुळे ४०० वर नागरिकांनी त्यांचा प्रत्येकी ४९ हजारांचा डीडी परत घेतल्याने या योजनेला घरघर लागल्याची स्थिती आहे.

चार मजली इमारती, ३० चौ.मी. चटई क्षेत्रया प्रकल्पात ८६० सदनिकांसाठी १४ भूखंडावर चार मजली इमारती बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक सदनिकेचे चटई क्षेत्र हे ३० चौ. मीटरचे आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांना ४९ हजारांचा डीडी महापालिकेकडे जमा करावा लागला व ड्राॅ पद्धतीनंतर नागरिकांना घराची खरेदी करून देण्यात येत आहे. तत्पूर्वी त्यांना सदनिकेचा हप्ता सहा समान किश्तीत जमा करावा लागणार आहे.

१ जानेवारीपासून दंडात्मक कारवाईया कामांच्या दिरंगाईबाबत मुंबई येथील संबंधित एजन्सीला आतापर्यंत २० मार्च २०२०,  २० जुलै २०२०व २५ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेने नोटीस बजावली आहे. आता १ जानेवारी २०२२ पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कंत्राटदाराचा कुठलाच मुलाहिजा केला जाणार नसल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

सबकंत्राटदारांनी थांबविले काममुख्य कंत्राटदारांला देयक मिळाल्यानंतर त्यांनी नागपूरच्या कंत्राटदारांना संबंधित निधी दिल्याची माहिती आहे. मात्र, या कंत्राटदाराने नेमलेल्या सहा कंत्राटदारांना बिले देण्यात न आल्यामुळे त्यांनी कामे थांबविल्याचे सांगण्यात आले. यात रहाटगाव येथील भूखंडावर कामांसाठी खड्डे खोदण्यात आल्याने लगतची घरे धोक्यात आल्याचे वास्तव आहे.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना