शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

शहर विद्रुप करणाऱ्यांच्या मुसक्या केव्हा आवळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:16 IST

शहरात होर्डिंग, फ्लेक्स छपाईसह जागोजागी लावण्याचे कंत्राट घेतल्या जात असल्यानेच शहर सौंदर्यीकरण विद्रुप होऊ लागले आहे. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग झोपी गेला असल्याने दिवसागणिक या प्रकारात वाढ होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेद्वारा स्वच्छ सर्वेक्षण-२०१९, असे जेथे अंकित केले, त्याच ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावली जात असल्याने एवढा निर्ढावलेपणा आला कुठून, असा नागरिकांचा सवाल आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या आदेशाला खो : महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात होर्डिंग, फ्लेक्स छपाईसह जागोजागी लावण्याचे कंत्राट घेतल्या जात असल्यानेच शहर सौंदर्यीकरण विद्रुप होऊ लागले आहे. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग झोपी गेला असल्याने दिवसागणिक या प्रकारात वाढ होत आहे. विशेष म्हणजे महापालिकेद्वारा स्वच्छ सर्वेक्षण-२०१९, असे जेथे अंकित केले, त्याच ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स लावली जात असल्याने एवढा निर्ढावलेपणा आला कुठून, असा नागरिकांचा सवाल आहे.महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उड्डाणपुलाच्या पिल्लरवर शहर स्वच्छतेच्या जागृतीसाठी जाहिरातीचे फलक लागले असताना त्याच ठिकाणी अनधिकृत फलक लावल्याने या विभागाचा कोडगेपणा चव्हाट्यावर आला. या जाहिराती कोणी लावल्या त्याचा शोध घेणे, त्यांना नोटीस बजाविणे व सार्वजनिक मालमत्ता विद्रुप करणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणास प्रतिबंध अधिनियम १९९५ अन्वये गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने शहर विद्रुपीकरणाचा धंदा फोफावला आहे.सर्वाधिक अनधिकृत चमकोबाज राजकीयचशहरात चौकाचौकांत लागलेले सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्स हे राजकीय पदाधिकाऱ्यांचेच आहे. सोमवारी महाशिवरात्रीनिमित्त दिलेल्या अनधिकृत फलकावरील शुभेच्छा फलकांचे अवलोकन केल्यास ते फलकही राजकीय व्यक्तींच्या आहेत. याला आवर घालण्याचे काम महापालिका प्रशासनाचे असताना बाजार परवाना विभागाद्वारा आतापर्यंत चालढकल केल्यामुळेच हे होर्डिंग्स आता नागरिकांच्या जिवावर उठले आहे.कोचिंग क्लासेसचीचमकोगिरी ही बेकायदाचराजकीय होर्डिंग्स, फ्लेक्सनंतर शहरात सर्वाधिक अनधिकृत होर्डिग्स, फ्लेक्स हे कोचिंग क्लासेसचे असल्याचे वास्तव पुढील आले आहे. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहरातील अनेक चौकांत लावलेल्या बहुतेक जाहिराती या अनधिकृतच आहेत. त्यावर बाजार परवाना विभागाचे स्टिकर नाही किंवा मुद्रक व प्रिंटरचे नाव नसल्यामुळे या नियमबाह्य जाहिरातींमधून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, असा पालकांचा सवाल आहे.आयुक्तांनी केली खानापूर्तीआयुक्त संजय निपाणे यांनी बैठका घेतल्या, खानापूर्ती झाली. मुख्यमंत्री, उच्च न्यायालयाच्या आदेशाची दखल घेतल्याचा देखावा करुन झाला. प्रत्यक्षात मात्र शहरात जे सुरू आहे तेच कायम राहिले. महापालिकेने काढलेली फलके पुन्हा लागलीत. कुठे जुनीच, कुठे नवी महापालिका प्रशासनाचा धाक नाहीच मुळी कुणावर, हेच यातून स्पष्ट होते.