शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

धामणगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना कधी मिळणार मदतीचा आधार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

पाच गावे उपेक्षित पान १ वर गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल ...

पाच गावे उपेक्षित

पान १ वर

गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल

धामणगाव रेल्वे : गतवर्षी जुलै महिन्यात बगाजी सागर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच गावांतील तब्बल अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र, अद्यापही मदतीचा आधार न मिळाल्याने या शेतकऱ्यांचा आक्रोश कायम आहे.

गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. येथील पाण्याचा प्रवाह बगाजी सागर धरणात आल्याने या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात एकीकडे वर्धा नदीला आलेला महापूर, तर दुसरीकडे बगाजी सागर धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या पात्रालगत असलेल्या नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, आष्टा, चिंचोली या परिसरातील तब्बल २५० शेतकऱ्यांची शेतजमीन जमीन खरडून गेली होती, तर पिके पूर्णत: वाहून गेली. एकट्या नायगाव येथील सर्वाधिक ४८ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने त्यावेळी सर्वेक्षण केले जिल्हा प्रशासनाला ही यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना एक रुपया अद्यापही मदत मिळाली नाही.

दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नशिबाला दोष

मागील आठ-दहा वर्षांपासून दरवर्षी नदीपात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान होते. परंतु, तालुका व जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डबघाईस येत आहे. दरवर्षी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊन पेरणी केल्यानंतर बगाजी सागर धरणाचे पाणी सोडले जाते. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे हे पीक नष्ट होते. अनेक वेळा तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, आता न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. दहा वर्षांपासून या भागातील शेतकरी नशिबाला दोष देत शेती करीत आहेत.

--------------

गतवर्षी उसनवारी घेऊन शेतीची पेरणी केली. मात्र, जुलैमध्ये बगाजी सागरचे दरवाजे उघडले. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेतच खरडून गेले. शासन व प्रशासनाने आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.

- राजेंद्र शेलार, नायगाव