शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

धामणगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना कधी मिळणार मदतीचा आधार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:11 IST

पाच गावे उपेक्षित पान १ वर गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल ...

पाच गावे उपेक्षित

पान १ वर

गतवर्षी उघडली बगाजी सागर धरणाची १३ दारे, अप्पर वर्धाचे अतिरिक्त पाण्याने शेतकऱ्यांचे हाल

धामणगाव रेल्वे : गतवर्षी जुलै महिन्यात बगाजी सागर धरणाचे १३ दरवाजे उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच गावांतील तब्बल अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र, अद्यापही मदतीचा आधार न मिळाल्याने या शेतकऱ्यांचा आक्रोश कायम आहे.

गतवर्षी अधिक पाऊस झाल्याने अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. येथील पाण्याचा प्रवाह बगाजी सागर धरणात आल्याने या धरणाचे १३ दरवाजे उघडण्यात आले. गतवर्षी जुलै महिन्यात एकीकडे वर्धा नदीला आलेला महापूर, तर दुसरीकडे बगाजी सागर धरणाचे दरवाजे उघडल्याने वर्धा नदीच्या पात्रालगत असलेल्या नायगाव, दिघी महल्ले, बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, आष्टा, चिंचोली या परिसरातील तब्बल २५० शेतकऱ्यांची शेतजमीन जमीन खरडून गेली होती, तर पिके पूर्णत: वाहून गेली. एकट्या नायगाव येथील सर्वाधिक ४८ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले होते. महसूल प्रशासनाने त्यावेळी सर्वेक्षण केले जिल्हा प्रशासनाला ही यादी पाठवण्यात आली होती. मात्र, या शेतकऱ्यांना एक रुपया अद्यापही मदत मिळाली नाही.

दहा वर्षांपासून शेतकऱ्यांचा नशिबाला दोष

मागील आठ-दहा वर्षांपासून दरवर्षी नदीपात्रालगत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पुरामुळे नुकसान होते. परंतु, तालुका व जिल्हा प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच डबघाईस येत आहे. दरवर्षी उसनवारी, व्याजाने पैसे घेऊन पेरणी केल्यानंतर बगाजी सागर धरणाचे पाणी सोडले जाते. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे हे पीक नष्ट होते. अनेक वेळा तालुका व जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, आता न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. दहा वर्षांपासून या भागातील शेतकरी नशिबाला दोष देत शेती करीत आहेत.

--------------

गतवर्षी उसनवारी घेऊन शेतीची पेरणी केली. मात्र, जुलैमध्ये बगाजी सागरचे दरवाजे उघडले. त्यात वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे संपूर्ण शेतच खरडून गेले. शासन व प्रशासनाने आमच्या मागणीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.

- राजेंद्र शेलार, नायगाव