शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

पाचवी ते आठवीच्या आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आदिवासी विकास ...

अमरावती : शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आदिवासी विकास विभागाने अद्यापही पाचवी ते आठवीच्या निवासी आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी आजही घरीच लॉकडाऊन असल्याचे चित्र आहे.

महापालिका, जिल्हा परिषद, खासगी शैक्षणिक संस्थाचालकांनी २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याची तयारी चालविली आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याविषयी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त नियमावली, अटी-शर्ती पालकांच्या मोबाईलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविण्यात येत आहे. मुलांना शाळेत पाठविताना पालकांचे संमतिपत्र अनिवार्य केले आहे. यापूर्वी नववी ते बारावीसाठी लागू असलेली नियमावली पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी लागू असणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा, वसतिगृहात अद्यापही विद्यार्थी पोहोचले नाहीत. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी १ डिसेंबर २०२० पासून नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित आश्रमशाळा, वसतिगृहे सुरू करण्याचे आदेश दिले होते. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे पालकांचे संमतिपत्र घेऊनच मुलांना शाळांमध्ये प्रवेश द्यावा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, एकाही पालकाने संमतिपत्र लिहून दिले नाही. त्यामुळे आश्रमशाळा सुरू होऊनही विद्यार्थी नसल्याची जिल्ह्यातील स्थिती आहे. परंतु, शिक्षणात खंड पडू नये, यासाठी शिक्षकांकडून गणित, विज्ञान आणि इंग्रजीचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

------------------

पाचवी ते आठवीचे १० हजार ९११ विद्यार्थी

अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी व पुसद या सातही प्रकल्पस्तरावर ८२ आश्रमशाळांमध्ये १० हजार ९११ विद्यार्थी प्रवेशित आहेत.

नववी ते बारावीचे ३३ हजार ४९१ विद्यार्थी आहेत. यात शासकीय आश्रमशाळांमध्ये ११ हजार ६२२, अनुदानित आश्रमशाळांमध्ये १६ हजार १३९, नामांकित सीबीएसई शाळांमध्ये २ हजार २१६, नामांकित राज्य बोर्ड शाळांमध्ये १ हजार ५२६, तर सैनिकी शाळांमध्ये १ हजार ९४८ विद्यार्थी आहेत.

--------------------------

आश्रमशाळा निवासी असल्यामुळे पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्याबाबतचे स्वतंत्र आदेश प्राप्त झाले नाहीत. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यात. मात्र, पालकांचे संमतिपत्र नाही. शाळांमध्ये सक्ती करता येत नाही. ज्या काही गाईड लाईन येतील, त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, ‘ट्रायबल’ अमरावती