शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

मुख्य सूत्रधाराला अटक केव्हा?

By admin | Updated: January 31, 2015 01:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा मुख्य सूत्रधार राजेश पडोळे हा तिवसा पोलिसांना गवसलाच नाही. त्याला एक, दोन व्यतिरिक्त कोणी पाहिलेच नसल्याने त्याचा शोध घेऊन अटक करणे तिवसा पोलिसांना आव्हान ठरले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या राजीव गांधी ग्राम विमा योजनेच्या नावे तिवसा तालुक्यामधील किमान १५ ग्रामपंचायतीमधील शेकडो नागरिकांना गंडविण्यात आले. १०० रूपयात १ लाखाची विमा पॉलिसी असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, शासनाची राजमुद्रा अंकित असणारी पावती देण्यात येत असल्याने विश्वास बसला व ईथेच त्यांची फसगत झाली. प्रकरणात भांबोरा ग्रामपंचायतीचा शिपाई गणेश गवळी याला तिवसा पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे याच्या मागावर पोलीस आहे. त्याला फार कमी लोकांनी पाहिले असल्याने व त्याचा पत्तादेखील कुणाला माहीत नसल्याने पोलीस तपासातील अडचणी वाढत आहेत. दरम्यान शुक्रवारी भांबोरा ग्रामपंचायतीचे सरपंच काळमेघ यांचे तिवसा पोलिसांनी बयाण नोंदविले. तसेच ग्रामसेवक बांते यालादेखील चौकशीसाठी बोलाविण्यात येऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकारी तेलंग यांनी सांगितले. चपराशाने परिपत्रक आणून दिले त्यावरून ठराव घेण्यात आला, असे ग्रामसेवकाने सांगितले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तेलंग म्हणाले.शासनाची राजमुद्रा, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र, ग्रामपंचायतने शासकीय योजना म्हणून ग्रामपंचायतने घेतलेला ठराव, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचाच चपराशी काढत असलेली विमा पॉलिशी यावर विश्वास बसत भांबोरा, अमदाबाद, पालवाडी येथील शेकडो नागरिकांनी अस्तित्वात नसलेल्याच राजीव गांधी ग्राम विमा योजना, जीवनदायी ग्राम विमा योजनेच्या पॉलिसी काढल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)