शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मुख्य सूत्रधाराला अटक केव्हा?

By admin | Updated: January 31, 2015 01:01 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून अस्तित्वात नसलेल्या योजनेच्या नावाने शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या प्रकरणातील अमरावतीचा मुख्य सूत्रधार राजेश पडोळे हा तिवसा पोलिसांना गवसलाच नाही. त्याला एक, दोन व्यतिरिक्त कोणी पाहिलेच नसल्याने त्याचा शोध घेऊन अटक करणे तिवसा पोलिसांना आव्हान ठरले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रे ग्रामपंचायतींना दाखवून अस्तित्वात नसलेल्या राजीव गांधी ग्राम विमा योजनेच्या नावे तिवसा तालुक्यामधील किमान १५ ग्रामपंचायतीमधील शेकडो नागरिकांना गंडविण्यात आले. १०० रूपयात १ लाखाची विमा पॉलिसी असल्याने व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे अर्ज, शासनाची राजमुद्रा अंकित असणारी पावती देण्यात येत असल्याने विश्वास बसला व ईथेच त्यांची फसगत झाली. प्रकरणात भांबोरा ग्रामपंचायतीचा शिपाई गणेश गवळी याला तिवसा पोलिसांनी अटक केली. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अमरावतीचा राजेश पडोळे याच्या मागावर पोलीस आहे. त्याला फार कमी लोकांनी पाहिले असल्याने व त्याचा पत्तादेखील कुणाला माहीत नसल्याने पोलीस तपासातील अडचणी वाढत आहेत. दरम्यान शुक्रवारी भांबोरा ग्रामपंचायतीचे सरपंच काळमेघ यांचे तिवसा पोलिसांनी बयाण नोंदविले. तसेच ग्रामसेवक बांते यालादेखील चौकशीसाठी बोलाविण्यात येऊन त्याचे बयाण नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकारी तेलंग यांनी सांगितले. चपराशाने परिपत्रक आणून दिले त्यावरून ठराव घेण्यात आला, असे ग्रामसेवकाने सांगितले असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तेलंग म्हणाले.शासनाची राजमुद्रा, जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र, ग्रामपंचायतने शासकीय योजना म्हणून ग्रामपंचायतने घेतलेला ठराव, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायतीचाच चपराशी काढत असलेली विमा पॉलिशी यावर विश्वास बसत भांबोरा, अमदाबाद, पालवाडी येथील शेकडो नागरिकांनी अस्तित्वात नसलेल्याच राजीव गांधी ग्राम विमा योजना, जीवनदायी ग्राम विमा योजनेच्या पॉलिसी काढल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)