शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अतिवृष्टी, दवाळबाधित तुरीची मदत केव्हा?

By admin | Updated: May 19, 2017 00:36 IST

गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान अतिवृष्टी तसेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यातील अतीथंडीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शासनाला विसर : गतवर्षी ४१ हजार हेक्टरमध्ये नुकसान लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षी जून ते आॅक्टोबर दरम्यान अतिवृष्टी तसेच डिसेंबर ते जानेवारी महिन्यातील अतीथंडीमुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने कृषी व महसूल यंत्रणेव्दारा सर्वेक्षण केले. शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. मात्र खुद्द शासनाला त्यांनी केलेल्या घोषणेचा विसर पडला आहे. खरिपाच्या तोंडावर आर्थिक कोंडीत असलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची प्रतीक्षा लागली आहे. मागील हंगामात जून ते आॅक्टोबर दरम्यान जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक ११५ टक्के पाऊस पडला. यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान ३३ टक्क्यांवर असल्याने शासन मदतीस पात्र आहे. याविषयी भरपाई देण्याचा निर्णय शासनाने ९ जानेवारी २०१७ रोजी घेतला. शासनाकडे नुकसानीचे पंचनामे सादर झाले. त्यानुसार जिल्ह्यात १९ हजार ५९० शेतकऱ्यांचे १२ हजार ६६९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन १,५५१ हेक्टर, कापूस ६६५ हेक्टर, तूर १,३४२ हेक्टर, मूग व उडीद ९,०४७ हेक्टर, फळपिके १४.९२ हेक्टर, व भाजीपाला पिकांचे ४०.४४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला होता. पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. मागील हंगामात ५२ दिवस अतिवृष्टी झाली. त्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीत येणारे मूग व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच तुरीवर "मर" रोगाचा प्रादुर्भाव झाला. शासनाने या पिकांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात यंदाचा खरीप हंगाम दोन आठवड्यांवर आला असताना शेतकऱ्यांना मदतीचा शासनाला विसर पडल्याने खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला आहे. दोन हेक्टर मर्यादेत मिळणार मदत प्रचलित नियमानुसार शेती व बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानीसाठी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळू शकते. यासाठी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांचा संयुक्त अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर झालेला आहे. त्यानुसार ही मदत मिळणे आवश्यक आहे. पंचनाम्यासोबतच नुकसानबाधित क्षेत्राचे शेतकरी त्या बाधित क्षेत्रात उभा असलेले छायाचित्र अनिवार्य आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल, असे शासनाने ९ जानेवारीच्या आदेशात स्पष्ट केले आहे.