शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई केव्हा ?

By admin | Updated: July 17, 2016 00:10 IST

अनेक वर्षांपासून नोकरीत असलेले शिक्षकच शिकवणी वर्ग घेत आहेत.

अवैध शिकवणी वर्ग सुरूच : अधिकारी की बघे ?अमरावती : अनेक वर्षांपासून नोकरीत असलेले शिक्षकच शिकवणी वर्ग घेत आहेत. त्यामुळे पालकांची आर्थिक लूट होत आहे. हे शिक्षक शिक्षण विभागाने काढलेल्या शासन निर्णयाची पायमल्ली करीत असून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी.आर.राठोड केव्हा कारवाई करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. अधिकाऱ्यांना कारवार्इंचे अधिकार असतानाही कारवाई होत नाही. त्यामुळे अधिकारी झोपेत आहेत का, असा प्रश्न उपस्थिीत होत आहे. अमरावती जिल्हयात ४०० पेक्षा जास्त शिकवणी वर्ग आहे. काही शिकवणी वर्ग ही खासगी शिक्षकांची आहेत. अनेक शासकीय शिक्षकांनीच विद्यादानाच्या नावावर खासगी दुकानदाऱ्या थाटल्या आहेत. त्यामुळे अश्या शिक्षकांच्या शिकवणी वर्गावर धाडी टाकून कारवाई करणे अपेक्षित आहेत. इयत्ता १० वी १२ हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा र्टनिंग पाँईट असतो. त्यामुळे विद्यार्थी शिकवणी वर्ग लावावे लागतात. यामध्ये प्रामुख्याने विज्ञान शाखेचे सर्वच विद्यार्थी शिकवणी वर्ग लावतात. १२ वीच्या परीक्षेत प्रात्यक्षिक परीक्षेत गुण टाकणे संबंधित विषय शिक्षकांच्या हातातच असते. त्यामुळे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेत आपल्याला जास्त गुण मिळावे ते कमी पडू नये, याकरिता त्यांच्याकडेच शिकवणी वर्ग लावतात. या कारणानेच हा अवैध शिक्षणराज फोफावला आहे. यातूनच अनेक शिक्षक हे शिक्षणसम्राट झाले आहे. ते स्वत: तर त्यांच्यकडे असलेल्या विषयाची शिकवणी वर्ग घेतातच पण त्यांनी आपली खाजगी शिकवणी वर्गांची दुकानदारी थाटून इतरही शिक्षकांना यामध्ये समाविष्ट करुन घेतात. त्यांच्याकडूनही त्यांना विद्यार्थी देण्याचे कमीशन घेतल्या जाते. हा प्रकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना महिती नसते. जर विद्यार्थ्यांना कुठलाही फक्त एकच विषय लावायचा असेल तर त्याच मनाई केली जाते. इयत्ता १२ वी साठी, यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र व रसायनशास्त्र या विषयाचा समावेश राहतो. खासगी शिकवणी वर्गाचे संचालक चारही विषयाचा ग्रुप स्थापन करतात सर्व विषय आमच्याकडे लावा, असे बंधनकारक केले जाते. यातूनच लाखोरुपये छापण्याचा गोरखधंदा सुरु होतो. हा प्रकार दिवसादिवस वाढतच जात आहे. इयत्ता ११ वीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला की त्याला वर्षभराचे शुल्क सुरुवातीलाच भराला भाग पाळण्यात येते. त्यामुळे पालकानाही आर्थीक भुर्दंड सहन करावा लागतो. अशाप्रकरे अमरावतीत हा प्रकार कुठे चालतो हे पाहण्याची साधी तसदीही घेण्यात आली नाही. यासंदर्भात सुशिक्षित बेरोजगार शिक्षकांनी शिक्षण विभागाला अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या आहेत. पण कुठलीही कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष! (प्रतिनिधी)हमीपत्राचे होते तरी काय ? आमच्या शाळेत कुणीही खासगी शिकवणी वर्ग घेत नाही, असे सर्व शिक्षकांकडून हमीपत्र भरून घेतले जाते. मात्र याची अंमलबजावणी होत नाही. जर नोकरीत असतानाही कुणी शिकवणी वर्ग घेत असेल तर शाळा प्रशासनही त्यांना समज देऊ शकते. गेल्या वर्षी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड यांनी शाळांना पत्र पाठवून अश्या शिक्षकांचे हमीपत्र शिक्षणविभागाला पाठविण्याचे आदेश दिले होते. यानंतर माशी कुठे शिंक ली, हे कळलेच नाही.