शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

भारावलेल्या महात्मा गांधींनी सोडले अमरावतीत मौन

By admin | Updated: January 29, 2015 22:57 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळांतर्गत येथे ३० डिसेंबर १९२६ साली सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रपिता

प्रभाकरराव वैद्य यांची माहिती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची अशीही महतीइंदल चव्हाण - अमरावतीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळांतर्गत येथे ३० डिसेंबर १९२६ साली सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची एकोप्याची भावना बघून महात्मा गांधी भावूक झाले होते. त्यांनी काही दिवसांपासून सुरू ठेवलेले मौन येथे सोडले होते, अशी माहिती हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी रोजी पुण्यतिथी शहरात विविध शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत संपन्न होणार आहे. त्यांनी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात दिलेली भेट अविस्मरणीय आहे. संस्थेच्या खास निमंत्रणावरून महात्मा गांधी गोहत्ती काँग्रेस जाण्यापूर्वी मुद्दाम नवीन इमारतीच्या अनावरण समारंभासाठी आपल्या एक वर्षासाठी मौनव्रतानंतर ते २१ डिसेंबर १९२६ रोजी अमरावती येथे आले होते. त्यांच्या स्वागताकरिता डॉ. सोमण यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांची एक तुकडी बडनेरा मुक्कामी रवाना झाली होती. महात्माजी गाडीतून उतरताक्षणीच प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवकांनी त्यांना सलामी दिली.महात्मा गांधी भारावलेपुष्पहार अर्पण करून त्यांना आमरावतीतील शेठ शिवनाथ बाबू यांच्या बगिचात आणले गेले. तेथे अल्पोपाहार घेऊन शेठ जन्मनलाल महादेवभाई देसाई, शेठपन्नालाल, राधावल्लभ लढ्ढा आदी मंडळींसह व्यायाम मंदिरात आले. भर दुपारी २ वाजता बापूंच्या दर्शनासाठी १० हजार जनसुदाय उसळला होता. चोख व्यवस्थेसाठी संस्थेच्यावतीने ३०० स्वयंसेवक तैनात होते. शंभर भालाईतांची गार्ड आॅफ आॅनर्सची सलामी घेत महात्मा गांधी अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर डॉ. सोमण यांनी प्रास्ताविकातून संस्थेची थोडक्यात माहिती सांगून गांधीजींना इमारतीचा अनावरण करण्याची विनंती केली. महात्माजींनी इमारत उघडली. 'सगळ्या वऱ्हाडात मध्यप्रांतांत तर त्यांच्या आखाड्यासारखा दुसरा आखाडा नाहीच. परंतु सबंध हिंदुस्थानातही त्याला जोड नाही आणि तो आहेच तसा, असे म्हणत गांधीजींनी १० मिनिटे भाषण केले होते. ते म्हणाले 'या आखाड्यात हिंदू-मुसलमान दोघांनाही सारखाच प्रवेश मिळतो आणि मुसलमानच काय पण अस्पृश्य तरुणदेखील त्याचे सभासद आहेत. माझ्यासारख्या नितांत अहिंसावाद्याने या आखाड्यासारख्या संस्थेशी अशाप्रकारे सहकार्य का व कसा केला त्याचे कारण स्पष्टच आहे. अहिंसा हिंसा करण्याच्या शक्तीचा त्याग करणे यास्तव ज्यामध्ये ही करण्याची शक्ती नाही तो अहिंसाही करू शकत नाही. जातीय विद्वेषापासून ही संस्था अलग आहे, हे पाहून मला हर्ष झाला, असे त्यांनी सांगितले होते. हव्याप्र मंडळात विविध जाती, धर्माचे विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेत होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ संस्थेच्यावतीने शारीरिक कौशल्यावर आधारित डेमोस्ट्रेशन घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून महात्मा गांधी भारावून गेले आणि म्हणाले ''ही संस्था भविष्यात फार मोठी होणार'' त्यांचे स्वप्न आज खरे ठरले आहे. या संस्थेत विविध राज्यांतून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्याकरिता येत आहेत. यावेळी दाजीसाहेब पटवर्धन, आचार्य त्र्यंबक जोशी, अंबादासपंत वैद्य, अहिरराव देशपांडे, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असलेले वीर वामनराव जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.