शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

भारावलेल्या महात्मा गांधींनी सोडले अमरावतीत मौन

By admin | Updated: January 29, 2015 22:57 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळांतर्गत येथे ३० डिसेंबर १९२६ साली सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रपिता

प्रभाकरराव वैद्य यांची माहिती : हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची अशीही महतीइंदल चव्हाण - अमरावतीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळांतर्गत येथे ३० डिसेंबर १९२६ साली सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांचा शारीरिक कौशल्यावर आधारित प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रपिता महात्मा गांधी होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची एकोप्याची भावना बघून महात्मा गांधी भावूक झाले होते. त्यांनी काही दिवसांपासून सुरू ठेवलेले मौन येथे सोडले होते, अशी माहिती हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची ३० जानेवारी रोजी पुण्यतिथी शहरात विविध शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत संपन्न होणार आहे. त्यांनी अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात दिलेली भेट अविस्मरणीय आहे. संस्थेच्या खास निमंत्रणावरून महात्मा गांधी गोहत्ती काँग्रेस जाण्यापूर्वी मुद्दाम नवीन इमारतीच्या अनावरण समारंभासाठी आपल्या एक वर्षासाठी मौनव्रतानंतर ते २१ डिसेंबर १९२६ रोजी अमरावती येथे आले होते. त्यांच्या स्वागताकरिता डॉ. सोमण यांच्या नेतृत्वात स्वयंसेवकांची एक तुकडी बडनेरा मुक्कामी रवाना झाली होती. महात्माजी गाडीतून उतरताक्षणीच प्लॅटफॉर्मवर स्वयंसेवकांनी त्यांना सलामी दिली.महात्मा गांधी भारावलेपुष्पहार अर्पण करून त्यांना आमरावतीतील शेठ शिवनाथ बाबू यांच्या बगिचात आणले गेले. तेथे अल्पोपाहार घेऊन शेठ जन्मनलाल महादेवभाई देसाई, शेठपन्नालाल, राधावल्लभ लढ्ढा आदी मंडळींसह व्यायाम मंदिरात आले. भर दुपारी २ वाजता बापूंच्या दर्शनासाठी १० हजार जनसुदाय उसळला होता. चोख व्यवस्थेसाठी संस्थेच्यावतीने ३०० स्वयंसेवक तैनात होते. शंभर भालाईतांची गार्ड आॅफ आॅनर्सची सलामी घेत महात्मा गांधी अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यानंतर डॉ. सोमण यांनी प्रास्ताविकातून संस्थेची थोडक्यात माहिती सांगून गांधीजींना इमारतीचा अनावरण करण्याची विनंती केली. महात्माजींनी इमारत उघडली. 'सगळ्या वऱ्हाडात मध्यप्रांतांत तर त्यांच्या आखाड्यासारखा दुसरा आखाडा नाहीच. परंतु सबंध हिंदुस्थानातही त्याला जोड नाही आणि तो आहेच तसा, असे म्हणत गांधीजींनी १० मिनिटे भाषण केले होते. ते म्हणाले 'या आखाड्यात हिंदू-मुसलमान दोघांनाही सारखाच प्रवेश मिळतो आणि मुसलमानच काय पण अस्पृश्य तरुणदेखील त्याचे सभासद आहेत. माझ्यासारख्या नितांत अहिंसावाद्याने या आखाड्यासारख्या संस्थेशी अशाप्रकारे सहकार्य का व कसा केला त्याचे कारण स्पष्टच आहे. अहिंसा हिंसा करण्याच्या शक्तीचा त्याग करणे यास्तव ज्यामध्ये ही करण्याची शक्ती नाही तो अहिंसाही करू शकत नाही. जातीय विद्वेषापासून ही संस्था अलग आहे, हे पाहून मला हर्ष झाला, असे त्यांनी सांगितले होते. हव्याप्र मंडळात विविध जाती, धर्माचे विद्यार्थी शारीरिक शिक्षण घेत होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ संस्थेच्यावतीने शारीरिक कौशल्यावर आधारित डेमोस्ट्रेशन घेण्यात आले. विद्यार्थ्यांचे कौशल्य पाहून महात्मा गांधी भारावून गेले आणि म्हणाले ''ही संस्था भविष्यात फार मोठी होणार'' त्यांचे स्वप्न आज खरे ठरले आहे. या संस्थेत विविध राज्यांतून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्याकरिता येत आहेत. यावेळी दाजीसाहेब पटवर्धन, आचार्य त्र्यंबक जोशी, अंबादासपंत वैद्य, अहिरराव देशपांडे, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असलेले वीर वामनराव जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.