शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

पाण्याअभावी संत्राबागा जगवाव्यात कशा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:17 IST

यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत.

ठळक मुद्देउत्पादकांचा सवाल : शासन करणार काय २००३ ची पुनरावृत्ती?

आॅनलाईन लोकमतनेरपिंगळाई : यावर्षी मोर्शी तालुक्यातील तळणी ते गोराळा शिवारापर्यंत अत्यल्प पाऊस झाला असल्याने शेतातील विहीरी आताच कोरड्या झाल्या आहेत. यामुळे संत्रा बागा कशा जगवायच्या, या विवंचनेत संत्रा बागायतदार शेतकरी आहेत.यावर्षीसुद्धा पावसाची नोंद मोर्शी येथे तालुक्याच्या ठिकाणी घेतली गेली. परंतु, तेथून दोन किलोमीटर अंतरावरच तळणी ते गोराळा शिवारापर्यंतच्या अंदाजे २० ते २५ किलोमीटर परिसरात अत्यल्प पाऊस पडला. पर्यायाने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे डिसेंबरअखेर तसेच जानेवारीच्या सुरुवातीलाच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. अजून उन्हाळा यायचाच, तर रब्बीची पिके कशी काढावी आणि मुख्यत्वे संत्रा बागा कशा जगवाव्यात, या विवंचनेत येथील शेतकरी आहे.यावर्षी २००३ पेक्षाही भीषण दुष्काळ परिस्थिती असल्याने तसेच परिसरातील बराचसा भाग ड्राय झोनमध्ये असल्याने बोअरवेल (कुपविहीर) करता येत नाही. तेव्हा संत्रा बागायतदार शेतकरी संत्रा बागा कशा जगविणार, या विवंचनेत आहेत.तेव्हा मिळाले होते सिंचनासाठी पाणी, अनुदान२००३ मध्ये तत्कालीन शासनाने अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक क्षेत्रात आलेल्या पाइप लाइनमधून शेतकºयांना संत्राबागांकरिता पाणी देण्यात आले होते. याकरिता सावरखेड येथे पाणी वापर संस्थेची निर्मिती करून त्या माध्यमातून संत्रा बागा जगविण्याकरिता शेतकºयांना पाणी देण्यात आले होते. पाण्याअभावी वाळलेल्या संत्रा झाडांकरिता १२५ रुपये प्रतिझाड याप्रमाणे ८० झाडांसाठी एकूण ९०४३ शेतकºयांना ६ कोटी ८५ लाख ६१ हजार ८७५ रुपये अनुदान सरकारतर्फे देण्यात आले होते.संत्रा बागा जगविण्याकरिता सरकारने सन २००३ प्रमाणेच अप्पर वर्धा धरणातून नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीला नेलेल्या पाइप लाईनवरून पाणीपुरवठा करून शेतकºयांना दिलासा द्यावा. वाटल्यास त्या पाण्याचे योग्य भाडे घ्यावे.- धनंजय तट्टे, संचालक, मोर्शी कृषिउत्पन्न बाजार समिती