शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचे अनुदान क्षेत्रीय बँकेत कशासाठी?

By admin | Updated: June 8, 2014 23:33 IST

शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध

सुरेश सवळे - चांदूरबाजारशासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशातच राष्ट्रीयीकृत बँका वगळून शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेत १२ कोटींचे अनुदान जमा करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न शेतकर्‍यांमार्फत उपस्थित केला जात आहे. ऐन पेरणीच्या मोसमात काही का होईना हेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान मिळणार म्हणून शेतकरी शाश्‍वत होता. मात्र, या रखडलेल्या अनुदानामुळे आता त्या शेतकर्‍यांना नाईलाजास्तव सावकाराचे दार ठोठवावे लागत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील गारपीट नुकसानग्रस्त २३ हजार ८४४ शेतकर्‍यांना  १२ कोटी ५१ लाख ४0 हजार ८0२ रूपयांच्या अनुदानाचे वाटप करायचे होते. त्यातील ४ कोटी ९५ लाख ४0 हजार ८0२ रूपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ७ कोटी ५६ लाख रूपयांच्या अनुदानाचे बीडीएस जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयाला २0 मे रोजी प्राप्त झाले. मात्र, त्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे हे बिल ३ जूनपर्यंत कोषागार कार्यालयातून पास झाले नाही. त्यानंतर ही रक्कम दोन वर्षांंपूर्वी तालुक्यात दाखल झालेल्या शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय बँकेत जमा करण्यात आली. आता ही रक्कम वटविण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रक्रियेमुळे अनुदान वाटपात विलंब होत आहे. चांदूरबाजार शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पाच ते सहा राष्ट्रीयीकृत बँका असताना १८ किलोमीटर अंतरावरील क्षेत्रीय बँकेत रक्कम जमा करून या बँकेमार्फत इतर बँकेत अनुदान वळविण्याचा महसूल प्रशासनाचा तुघलकी निर्णयसुध्दा बँक व शेतकरी वतरुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनुदानाची रक्कम अधिक काळ आपल्या बँकेत जमा राहावी, या स्वार्थी हेतूने या बँका मनुष्यबळाच्या अभावाची कारणे सांगून शेतकर्‍यांना व त्यांना मिळणार्‍या रकमेला वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. इतकेच नव्हे तर एक शाखाधिकारी व एक लिपिक अशा दोन कर्मचारी असलेल्या विदर्भ क्षेत्रीय बँकेकडून धनादेश ‘क्लिअरिंग’ तातडीने करण्याची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याऊलट तालुक्यातील ४0 हजार २३६ अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची २७ कोटी २७ लाख ९0 हजार २७४ रूपयांच्या नुकसानीच्या रकमेपोटी आतापर्यंत २१ कोटी ६६ लाख ५५ हजार ७८३ रूपये स्टेट बँकेमार्फत वाटप करण्यात आले. अजूनही २ हजार ४९७ शेतकर्‍यांना ५ कोटी इतकी रक्कम वितरित करणे बाकी आहे. असे असताना गारपिटीची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत का जमा करण्यात आली नाही? हा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.