शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

गारपिटीचे अनुदान क्षेत्रीय बँकेत कशासाठी?

By admin | Updated: June 8, 2014 23:33 IST

शासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध

सुरेश सवळे - चांदूरबाजारशासनाने व जिल्हाधिकारी कार्यालयाने गारपीट नुकसानीचे अनुदान संबंधित विभागाला दिले; त्यानंतरही चांदूूरबाजार तालुक्यातील आठ हजार शेतकरी सात कोटींच्या अनुदानापासून अद्याप वंचित असल्याचे उपलब्ध आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशातच राष्ट्रीयीकृत बँका वगळून शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँकेत १२ कोटींचे अनुदान जमा करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न शेतकर्‍यांमार्फत उपस्थित केला जात आहे. ऐन पेरणीच्या मोसमात काही का होईना हेक्टरी १५ हजार रूपयांचे अनुदान मिळणार म्हणून शेतकरी शाश्‍वत होता. मात्र, या रखडलेल्या अनुदानामुळे आता त्या शेतकर्‍यांना नाईलाजास्तव सावकाराचे दार ठोठवावे लागत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील गारपीट नुकसानग्रस्त २३ हजार ८४४ शेतकर्‍यांना  १२ कोटी ५१ लाख ४0 हजार ८0२ रूपयांच्या अनुदानाचे वाटप करायचे होते. त्यातील ४ कोटी ९५ लाख ४0 हजार ८0२ रूपयांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ७ कोटी ५६ लाख रूपयांच्या अनुदानाचे बीडीएस जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयाला २0 मे रोजी प्राप्त झाले. मात्र, त्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे हे बिल ३ जूनपर्यंत कोषागार कार्यालयातून पास झाले नाही. त्यानंतर ही रक्कम दोन वर्षांंपूर्वी तालुक्यात दाखल झालेल्या शिरजगाव कसबा येथील विदर्भ-कोकण क्षेत्रीय बँकेत जमा करण्यात आली. आता ही रक्कम वटविण्यासाठी करण्यात येणार्‍या प्रक्रियेमुळे अनुदान वाटपात विलंब होत आहे. चांदूरबाजार शहरात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह पाच ते सहा राष्ट्रीयीकृत बँका असताना १८ किलोमीटर अंतरावरील क्षेत्रीय बँकेत रक्कम जमा करून या बँकेमार्फत इतर बँकेत अनुदान वळविण्याचा महसूल प्रशासनाचा तुघलकी निर्णयसुध्दा बँक व शेतकरी वतरुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अनुदानाची रक्कम अधिक काळ आपल्या बँकेत जमा राहावी, या स्वार्थी हेतूने या बँका मनुष्यबळाच्या अभावाची कारणे सांगून शेतकर्‍यांना व त्यांना मिळणार्‍या रकमेला वेठीस धरण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. इतकेच नव्हे तर एक शाखाधिकारी व एक लिपिक अशा दोन कर्मचारी असलेल्या विदर्भ क्षेत्रीय बँकेकडून धनादेश ‘क्लिअरिंग’ तातडीने करण्याची अपेक्षा कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याऊलट तालुक्यातील ४0 हजार २३६ अतवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांची २७ कोटी २७ लाख ९0 हजार २७४ रूपयांच्या नुकसानीच्या रकमेपोटी आतापर्यंत २१ कोटी ६६ लाख ५५ हजार ७८३ रूपये स्टेट बँकेमार्फत वाटप करण्यात आले. अजूनही २ हजार ४९७ शेतकर्‍यांना ५ कोटी इतकी रक्कम वितरित करणे बाकी आहे. असे असताना गारपिटीची रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत का जमा करण्यात आली नाही? हा प्रश्न  उपस्थित केला जात आहे.