शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

आमच्यासाठी केले काय?

By admin | Updated: October 9, 2016 01:00 IST

पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी ...

परीक्षा पाटलांची : पदवीधरांचा सर्वत्र एकच सवालअमरावती : पदवीधरांनी आमदारपदी निवडून दिल्यानंतर आणि पुढे मंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर रणजित पाटील यांनी पदवीधरांकडे तसेच सामान्यांकडे केलेले दुर्लक्ष ही त्यांच्यासमोरील प्रमुख अडचण ठरू लागल्याचे चित्र आजघडीला सर्वत्र आहे. सामान्यांमध्ये दांडग्या जनसंपर्काचा अभाव असलेले गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना पदवीधर मतदारसंघातून मिळालेला आमदारकीचा विजय ही खरे तर राजकीय भरारी घेण्याची सुवर्ण संधी होती. उच्चविद्याविभूषित असलेल्या पाटलांना या नामी संधीचा कौशल्यपूर्ण पद्धतीने वापर करता येणे सहज शक्य होते. तथापि वैद्यकीय व्यवसायात गुणवंत असलेले पाटील येथे कमी पडले. मुख्यमंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्यामुळे रणजित पाटील यांना कालांतराने गृह खात्याच्या शहरी विभागाचे राज्यमंत्रिपद आणि अकोल्याचे पालकमंत्रिपद मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक जवळचे मंत्रिमंडळातील सहकारी, असा पाटील यांचा लौकिक झाला. मानही वाढला; परंतु या सन्मानासोबतच त्यांच्या शिरावरची जबाबदारी कैकपटीने वाढली. स्वप्रगतीचा आनंद खुद्द पाटलांना जितका होता तितकाच तो सामान्यजनांनाही होता. त्याला कारणही होते. पाटलांना बहाल झालेल्या अधिकारांमध्येही वाढ झाली होती. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, लोकांच्या भल्यासाठीचे मुद्दे शासनदबारी रेटण्यासाठी, बेराजगारांचे जीणे सुसह््य करण्यासाठी या अधिकारांचा वापर केला जाईल, या कल्पनेने त्याच्या अवतीभतवतीचे लोक हुरळले होते. त्यांच्या मतदारसंघातही याच कारणामुळे आनंदी-आनंद होता. सामान्यजनांना त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणींवर उपाय हवे होते. बेरोजगारांना नोकऱ्या अन् पदवीधरांना आयुष्याचा निर्णायक ठावठिकाणा हवा होता; पण जुनाच अनुभव आला. लाभाच्या राजकारणात व्यग्रअमरावती : हुरळलेल्या लोकांना काहीच प्राप्त झाले नाही. आपले मंत्री मुख्यमंत्र्यांकडे जाऊन समस्यांसाठी भांडतील, ही आशा मृगजळ ठरली. मुख्यमंत्र्यांचा जो लाभ पाटील यांना झाला तो सामान्यजनांपर्यंत, पदवीधरांपर्यंत पझरलाच नाही. रणजित पाटील हे लाभाच्या राजकीय डावात इतके गुंतले की, सामान्यांच्या अपेक्षांची ना त्यांनी कदर केली ना चिंता. सत्ता काहीही घडवून आणू शकते, या समिकरणावर जणू आंधळा विश्वास ठेवणाऱ्या पाटील यांनी सामान्यांच्या पदरी जी निराशा टाकली, त्यासंबंधिच्या चर्चांचे आता मोहोळ उठू लागले आहेत. आपल्या मतांवर रणजित पाटील मोठ्ठे झाले खरे; पण आपल्यासाठी त्यांनी काय केले, पदविधरांचा हा जागोजागी विचारला जाणारा सवाल बरेच काही सांगून जातो.सत्तेचा दुरुपयोगसत्तेची नशा कशी असते बघा! बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि सत्तेचा दुरुपयोग पाटील यांनी निवडणुकीवर डोळा ठेवून वर्षभरापासून सुरू केला. युवक बेरोजगारांचे मेळावे, पदवीधर मतदारसंघाची सदस्य नोंदणी, पदवीधरांना प्रलोभने, शाळांमध्ये कार्यक्रम या बाबींसाठी पाटील यांनी सर्रास शासकीय यंत्रणेचा वापर केला. विरोधी पक्षांनी त्याबाबत आकांततांडव केलाच; परंतु समान्यांच्या मनातही पाटील यांच्या या वृत्तीची चीड निर्माण झाली. बी.टी.देशमुखांसारख्या द्रष्ट्या, अभ्यासू नेत्याच्या मतदारसंघातील मतदार तसा खुळा नाहीच. राजकारणासाठी सत्तेचा दुरुपयोग त्यामुळेच खपवून घेतला जाणारा मुद्दा नाही. दुसरीकडे स्पष्टवक्तेपणाच्या स्वभावात आमुलाग्र बदल घडवून संजय खोडके यांनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला. दांडगा जनसंपर्क, सामान्यांची कामे करण्यासाठीची अव्याहत धडपड, पदवीधरांच्या समस्यानिवारणात सक्रिय सहभाग या सत्ता नसतानाही आवर्जून जपलेल्या बाबी लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला. 'बी.टी.' उभे राहणार असतील तर आजही मी माघार घेणार, हे खोडके यांचे जाहीर विधान त्यांच्या राजकीय परिपक्वतेची उंची वाढविणारे ठरले. पाटलांचा राजकीय नवखेपणे आणि खोडकेंचा राजकीय मुरब्बीपणा हादेखील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी पाटलांना बरेच होमवर्क करावे लागणार आहे.