शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

झोपड्या तोडल्या, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचे काय?

By admin | Updated: June 5, 2015 00:37 IST

आठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणात असलेल्या गरिबांच्या पाच झोपड्या नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या.

संदीप मानकर  दर्यापूरलोकमत विशेषआठवडी बाजार परिसरातील अतिक्रमणात असलेल्या गरिबांच्या पाच झोपड्या नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काढून टाकल्या. गरिबांच्या या झोपड्यांवर नगरपालिकेने कारवाई केली. परंतु मुख्य रस्त्यावर असलेल्या विळख्यात असलेल्या अतिक्रमणाचे काय, असा सवाल दर्यापूरकर विचारत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक बसस्थानक चौक, रेल्वे गेटजवळ, अकोला रोड, मेन रोड आधी परिसरात अवैध अतिक्रमणाने थैमान घातले आहे. संपूर्ण दर्यापूर नगरीच अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. परंतु नगरपालिका या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. दर्यापूर, अकोट रस्ता हा मुख्य महामार्ग आहे. हजारो वाहने येथून रोज ये-जा करतात. किरकोळ व फळविक्रेत्यांनी येथे आपली दुकाने थाटली आहे. काही लोकांनी तर येथे चक्क आॅटो दुरुस्तीचे गॅरेज थाटले आहे. भर रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे जळ वाहनांना त्रास होतो. आधीच तर रस्त्यांची रुंदी कमी आहे. त्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे ये-जा करणाऱ्यांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर्यापूर शहराचे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा अनेक वेळा चर्चेला येतो. पण नेमकी माशी कुठे शिंकते हेत कळत नाही. मुख्याधिकारी सुधाकर पाणझाडे यांनी यासंदर्भात अनेक वेळा बैठका घेतल्या. परंतु कधी पोलीस बंदोबस्त मिळत नाही. कधी नगरसेवकांचा विरोध अशा अनेक कारणांमुळे अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नसल्याचे समजते. परंतु सुंदर शहर करण्याच्या दृष्टीने अतिक्रमण काढणे गरजेचे असल्याच्या भावना आहेत.नवनिर्वाचित अध्यक्षांकडून अपेक्षानुकतीच दर्यापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या वंदना राजगुरे निवडून आल्या. सुंदर दर्यापूर शहर करण्यासाठी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले अतिक्रमण ते काढतील का? असा प्रश्न दर्यापुरातील नागरिक विचारत आहेत. वंदना राजगुरे यांच्यासमोर अतिक्रमण काढण्याचे आव्हान आहे व लोकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे. उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन व नगरपालिका यांनी बैठक घेऊन संयुक्तरित्या कारवाई करणे गरजेचे आहे. चुकीच्या गतिरोधकामुळे मणक्यांच्या आजारात वाढनुकत्याच दर्यापूर नगरपालिकेने पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले. परंतु संस्कृती कलेक्शन ते नगरपालिकापर्यंत करण्यात आलेल्या या रस्त्यांवर तब्बल सात ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहे. हे गतिरोधक उंच व चुकीच्या पद्धतीने टाकले असल्याचे मत अनेक नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. येथून ये-जा करणाऱ्या लोकांना या गतिरोधकामुळे मणक्याच्या आजारात वाढ झाल्याचे अनेकांनी सांगितले.एवढे गतिरोधक टाकण्याचे काम नसल्याचे अनेकांनी सांगितले.