शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

‘मृत्यूपथ’ अंथरणारा हा कसला विकास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:48 IST

शहरवासीयांचा अंत पाहणाºया येथील शिवाजीनगर ते बडनेºयापर्यंतच्या 'हाय-प्रोफाईल' सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आधीच महिनाभरापासून वैतागलेल्या....

ठळक मुद्देपीडब्ल्यूडी दावणीला : कार्बन मोनॉक्साईडचे जीवघेणे उत्सर्जन, दोन महिन्यांपासून नागरिकांचा छळ

गणेश देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरवासीयांचा अंत पाहणाºया येथील शिवाजीनगर ते बडनेºयापर्यंतच्या 'हाय-प्रोफाईल' सिमेंट रस्त्याच्या कामामुळे आधीच महिनाभरापासून वैतागलेल्या अमरावतीकरांना आता राजरोसपणे श्वसनाचे आजार प्रदान केले जात आहेत.मुंबईच्या जेपीई कंस्ट्रक्शन कंपनीकडे या रस्त्याच्या निर्मितीचे कंत्राट आहे. कामाचे मूल्य ८३.५५ कोटी रुपये आहे. काम दर्जेदार आणि जलदगतीने व्हावे यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरण्यात येत आहे. अत्यंत वर्दळीचे रस्ते अडवून महिनोगिनती लांबविले जाणारे हे काम ढिसाळ नियोजनाचा ज्वलंत नमुना ठरले आहे.जीवघेणे प्रदूषण आणि कणाहीन अधिकारीसंबंधित कामावर मंगळवारी दिवसभर जनरेटर चालविण्यात आले. हे जनरेटर १०० मीटर परिघातील लोकांच्या कानठाळ्या बसाव्यात इतका कर्कष आवात करीत होते. अशा ध्वनीप्रदूषणासोबत अत्यंत गंंभीर पातळीचे वायुप्रदूषणही हे जनरेटर करीत होते. सोबतचे छायाचित्र बघून त्याबाबतची कल्पना येऊ शकेल. रंगहीन वा पांढºया रंगाचा वायू हा कार्बन मोनॉक्साईड असतो. आरोग्यासाठी धोकादायक मानल्या जाणाºया काळ्या रंगाच्या कार्बन डायआॅक्साडच्या तुलनेत हा वायू अधिक घातक आहे. हा विषारी वायू मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जात होता. अभियंता असलेले-तगडे वेतन घेणारे; पण कणा नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना ही बाब जराही खटकली नाही. दोन महिन्यांपासून नागरिकांना धूलिकण सेवन करावे लागत आहेत, ते वेगळेच!जनरेटर उत्सर्जित वायूने ५०० लोकांचा मृत्यूअमेरिकेत कार्बन मोनॉक्साईडच्या विपरित प्रभावावर एक अभ्यास जाहीर करण्यात आला. त्यानुसार, घराबाहेर ठेवल्या जाणाºया लहान आकाराच्या जनरेटरमधून उत्सर्जित होणाºया या वायुमुळे सन २००५ पासून २०१३ पर्यंत ५०० लोकांचे मृत्यू झालेत. दरवर्षी २० हजारपेक्षा अधिक नागरिकांना इमर्जन्सी वैद्यकीय सेवा त्यामुळे घ्यावी लागते. ४००० पेक्षा अधिक लोकांना इस्पितळात दाखल व्हावे लागते. हा अभ्यास ज्या जनरेटर्सवर आधारित होता ते अमेरिकेतील होते. अर्थात ते अत्यंत कमी प्रमाणात विषारी वायू सोडणारे होते. हे जनरेटर भारतातील आहे. जुने आहे. विषारी वायू सोडण्यासाठीच निर्माण केले असावे, अशा ताकदीने वायू सोडणारे आहे. त्यामुळे मनुष्यआरोग्याची किती भयंकर हानी होत असावी?प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार काय कारवाई?वायूप्रदूषण रोखण्यासाठी राजधानी दिल्लीत रान उठले असताना अमरावतीत मुद्दामहून विषारी वायू वातावरणात सोडला जातो. येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तरीही शांतच असतात. पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत'ला राजरोसपणे खो दिला जात असतानाही प्रदूषणकर्त्यांवर कारवाई केली जाणार नाही काय?जनरेटर असावे असे आम्ही सुचविले होते; तथापि असे प्रदूषण केले जात असेल तर त्यासंबंधी दखल घेतली जाईल.- विवेक साळवे, अधीक्षक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभागविजेसाठी आम्ही भीक मागावी काय? अशा दर्जाचे काम यापूर्वी अमरावतीने बघितले तरी काय? बांधकाम विभाग विजेची सोय करून देत नाही.- राजेश लांबे, व्यवस्थापक, जेपीई.कार्बन मोनॉक्साईड हा वायू मानवी आरोग्यासाठी विषारी असतो. त्याच्या सततच्या सेवनाने श्वसनासंबंधीचे गंभीर आजार उद्भवू शकतात.- डॉ.अतुल यादगिरे, अमरावती