शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:19 IST

जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

अमरावती : जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये ७३७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ८ कोटी ७८ लाख ५६ हजार ्नरूपयांचा निधी खर्च होणार आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई जाणवत नसली तरी दुर्गम भागात तसेच उंचावरील गावे व नादुरूस्त पाणीपुरवठा योजना आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७०० गावांना पाणीटंचाईची झळ जाणवणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यात कुठल्याच गावात पाणीटंचाईची स्थिती नव्हती. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत ४३६ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा ४५५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी ५ कोटी ८२ लाख ५७ हजारांचा निधी खर्च होणार असून तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील २६४ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. यासाठी दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११३ गावांमध्ये ११५ नवीन विंधन विहिरी, कुपनलिका करण्यात आल्यात. ११२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात आली. २७ गावांमध्ये तात्पुरत्या नळयोजना सुरू करण्यात आल्यात. ७५ विहिरींमधील गाळ काढण्यात आला. १०१ गावांमध्ये १०७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही कामांना अद्याप सुरूवात सुद्धा झाली नसल्याने तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)आठ कोटींवर खर्चयंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये ८ कोटी ७८ लाख ५६ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी २ कोटी १५ लाख, नळ योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी ३ कोटी ६५ लाख, तात्पुरत्या नळ योजनेसाठी एक कोटी ४८लाख, टँकरद्वारा पाणीपुरवठ्यासाठी २७ लाख, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढण्यासाठी ४४ लाख ३० हजार, विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ७८ लाख ५१ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान २८२ उपाययोजनापाणीटंचाईची खरी झळ एप्रिल ते जून या कालावधीत पोहोचते. यासाठी कृती आराखड्यात २६४ गावांमध्ये २८२ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये ७९ गावात ८२ विंधनविहिरी, कुपनलिका, ३० नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १३ तात्पुरत्या पुरक नळयोजना, ७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, ५८ गावांमधील ६७ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ७७ गावांमध्ये ८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.