शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
3
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
4
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
5
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
6
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
7
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
8
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
9
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
10
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
11
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
12
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
13
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
14
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
15
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
16
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
17
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
18
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
19
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
20
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

तहान लागल्यावर खोदणार विहीर; ७०० गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:19 IST

जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे.

अमरावती : जिल्ह्यात यंदा जानेवारी ते जून दरम्यान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये ७३७ उपाययोजना प्रस्तावित आहेत. यासाठी ८ कोटी ७८ लाख ५६ हजार ्नरूपयांचा निधी खर्च होणार आहे. पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई जाणवत नसली तरी दुर्गम भागात तसेच उंचावरील गावे व नादुरूस्त पाणीपुरवठा योजना आदी कारणांमुळे जिल्ह्यातील ७०० गावांना पाणीटंचाईची झळ जाणवणार आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यात कुठल्याच गावात पाणीटंचाईची स्थिती नव्हती. दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत ४३६ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली. यासाठी जिल्हा परिषदेद्वारा ४५५ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यासाठी ५ कोटी ८२ लाख ५७ हजारांचा निधी खर्च होणार असून तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत जिल्ह्यातील २६४ गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. यासाठी दोन कोटी ९५ लाख ९९ हजारांचा निधी खर्च होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११३ गावांमध्ये ११५ नवीन विंधन विहिरी, कुपनलिका करण्यात आल्यात. ११२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात आली. २७ गावांमध्ये तात्पुरत्या नळयोजना सुरू करण्यात आल्यात. ७५ विहिरींमधील गाळ काढण्यात आला. १०१ गावांमध्ये १०७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. काही कामांना अद्याप सुरूवात सुद्धा झाली नसल्याने तहान लागल्यावर विहीर खोदणार का, असा नागरिकांचा सवाल आहे. (प्रतिनिधी)आठ कोटींवर खर्चयंदा पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये ८ कोटी ७८ लाख ५६ हजारांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये नवीन विंधन विहिरी व कुपनलिकांसाठी २ कोटी १५ लाख, नळ योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी ३ कोटी ६५ लाख, तात्पुरत्या नळ योजनेसाठी एक कोटी ४८लाख, टँकरद्वारा पाणीपुरवठ्यासाठी २७ लाख, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढण्यासाठी ४४ लाख ३० हजार, विहिरी अधिग्रहित करण्यासाठी ७८ लाख ५१ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान २८२ उपाययोजनापाणीटंचाईची खरी झळ एप्रिल ते जून या कालावधीत पोहोचते. यासाठी कृती आराखड्यात २६४ गावांमध्ये २८२ उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामध्ये ७९ गावात ८२ विंधनविहिरी, कुपनलिका, ३० नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. १३ तात्पुरत्या पुरक नळयोजना, ७ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, ५८ गावांमधील ६७ विहिरींचे खोलीकरण करून गाळ काढण्यात येणार आहे. तसेच ७७ गावांमध्ये ८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.