शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

‘बोधीवृक्ष’ नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: May 22, 2016 00:07 IST

अवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

तथागत गौतमबुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार : देशात, देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्षरोशन कडू  तिवसाअवघ्या विश्वाला शांततेचा, प्रेमाचा, मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, समतेचा आणि नैसर्गिक पर्यावरण संतुलनाचा संदेश देणारा पिंपळवृक्ष काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर दु:ख मुक्तीचा मार्ग शोधून संपूर्ण मानव जातीला दु:खमुक्त होण्यासाठी संदेश दिला, अशा तथागत बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचा साक्षीदार असलेला आणि बौद्ध धर्मात पवित्र मानला जाणाऱ्या महावृक्षांचा महाराजा म्हणून ओळखला जाणारा बोधीवृक्ष म्हणजेच पिंपळवृक्ष.या जुन्या व प्राचीन अशा पिंपळवृक्षाची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत असून हा वृक्ष पर्यावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या विशाल वृक्षाचे पर्यावरणातून नामशेष होणे ही बाब पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक व बाधक ठरत आहे. पिंपळ हे वृक्ष जवळपास प्रत्येक गावात सर्रासपणे पाहायला मिळत असायचा. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेचे पिंपळ व वटवृक्ष मोठ्या प्रमाणात तोडण्यात आले. मात्र त्या पुन्हा ती झाडे लावण्यात आली नाहीत. हा वृक्ष विहिरींमध्ये तसेच विहिरींच्या काठावर मोठ्या प्रमाणात दिसायचे. पण या झाडावरील पक्षांची विष्ठा विहिरीत पडते म्हणून अनेकांनी हे पिंपळ तोडले आहेत. पूर्वी पिंपळ वृक्ष सर्रासपणे दिसायचे, आता मात्र तो मंदिर व स्मशानभूमीच्या आवारात पहावयास मिळतो. मोकळ्या जागेत पिंपळवृक्ष लावल्यास पर्यावरणासाठी निश्चितच फायदा होईल. पिंपळ हा खास करून हळद्या, पोपट, मैना आदी पक्षांचा आवडता वृक्ष आहे. देशात आणि देशाबाहेरही पूजनीय ज्ञानवृक्ष पिंपळवृक्ष मूळचा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील असून हिंदीमध्ये पिपल, इंग्रजीत होली ट्री तर शास्त्रीय भाषेत फायकस रेलिजीओसा नावाने ओळखला जातो. हा वृक्ष मोरेसी कुळातील असून सर्वाधिक आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. भारत आणि भारताबाहेरही हा वृक्ष पूजनीय मानला जातो. पिंपळवृक्ष हा आयुर्वेद शास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या वृक्षाची मुळे व फांद्या डायबेटीस (मधुमेह) या आजारांवर गुणकारी आहेत. याशिवाय पिंपळवृक्षाच्या पाला शेळा, मेंढ्या आवडीने खातात. वाटसरूंना निवांत बसता यावे म्हणून या वृक्षांच्या बाजूने पार बांधण्याची परंपरा प्राचीन काळापासूनची आहे.आरोग्यासाठी गुणकारी वृक्षपर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील हा वृक्ष खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो. वातावरणातील कार्बनडाय आॅक्साईड घेऊन शुद्ध प्राणवायू (आॅक्सिजन) देण्याचे महत्त्वाचे काम हा वृक्ष करतो.आरोग्याच्या दृष्टीने हृदयविकाराचे आजार, त्वचारोग आदी आजारांवर देखील हा वृक्ष गुणकारी आहे. पिंपळवृक्ष पानगळ होणाऱ्या वृक्षांमध्ये मोडतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला याची सर्व पाने गळून जातात. बोधीवृक्षाला म्हणजे पिंपळवृक्षाला ‘अश्वत’ म्हणूनही ओळखले जाते. अश्वत म्हणजे कधीही नाश न पावणारा किंवा कधीही नष्ट न होणारा पण आता मात्र पिंपळवृक्षाची कमी होणारी संख्या ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब होऊ लागली आहे. पिंपळवृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली म्हणून या वृक्षाला ज्ञानवृक्ष मानले जाते.