शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

दररोज एका झोनमधील पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: April 1, 2017 00:25 IST

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे.

जीवन प्राधिकरणाचे नियोजन : वाढीव, सुरळीत पाणीपुरवठ्याचा उद्देशअमरावती : कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे. दर मंगळवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी टप्प्या टप्प्याने एकेका झोनमधील पाणीपुरवठा दररोज बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता प्राधीकरणने पाणीपुरवठा वाढविला आहे. दररोज शहरवासियांना ९५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता आता १२० दलली पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील महिन्यात तर ती स्थिती १३५ दललीवर जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यातच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी, याकरिता प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. २९ मार्चपासून शहरात टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अन्य टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आठवड्यातील सहा दिवस सर्वच परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरु राहणार असून एकाच दिवसाकरिता पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन मजीप्राने केले आहे. याचा लाभ सुध्दा नागरिकांना मिळत असल्याचे निदर्शनास आले. या टाक्यांवरील पाणीपुरवठा राहणार बंदरविवार - मायानगर व अर्जुननगरसोमवार - बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्ती, वडरपुरा, कॅम्प परिसरमंगळवार - मालटेकडी (लोअर) व नागपूरी गेटबुधवार - मालटेकडी (अप्पर झोन) व लालखडीगुरुवार - भीमटेकडी प्रभाग, वडाळी व मंगलधाम कॉलनीशुक्रवार -सातुर्णा, साईनगर व राठीनगरशनिवार - व्हीएमव्ही परिसर व पॅराडाईज कॉलनी. मोटारपंप लावून पाणी खेचणारे रडारवरशहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधीकरणाच्या पाईनलाईनला मोटारपंप लाऊन पाणी खेचले जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता हा प्रकार थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपद्वारे पाणी खेचल्याचे निदर्शनास येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. उन्हाळ्यातील वाढीव पाण्याची मागणी पूर्ण करणे व काही भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. या नियोजनामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. - किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.