शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

दररोज एका झोनमधील पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: April 1, 2017 00:25 IST

कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे.

जीवन प्राधिकरणाचे नियोजन : वाढीव, सुरळीत पाणीपुरवठ्याचा उद्देशअमरावती : कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दररोज शहरातील एका झोनमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने केले आहे. दर मंगळवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी टप्प्या टप्प्याने एकेका झोनमधील पाणीपुरवठा दररोज बंद करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता प्राधीकरणने पाणीपुरवठा वाढविला आहे. दररोज शहरवासियांना ९५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, उन्हाळ्यातील पाण्याची मागणी लक्षात घेता आता १२० दलली पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील महिन्यात तर ती स्थिती १३५ दललीवर जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यातच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. या पाणीपुरवठ्यात सुधारणा व्हावी, याकरिता प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा आठवड्यातील एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. २९ मार्चपासून शहरात टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अन्य टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आठवड्यातील सहा दिवस सर्वच परिसरातील नागरिकांचा पाणीपुरवठा सुरु राहणार असून एकाच दिवसाकरिता पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन मजीप्राने केले आहे. याचा लाभ सुध्दा नागरिकांना मिळत असल्याचे निदर्शनास आले. या टाक्यांवरील पाणीपुरवठा राहणार बंदरविवार - मायानगर व अर्जुननगरसोमवार - बडनेरा जुनी वस्ती, नवी वस्ती, वडरपुरा, कॅम्प परिसरमंगळवार - मालटेकडी (लोअर) व नागपूरी गेटबुधवार - मालटेकडी (अप्पर झोन) व लालखडीगुरुवार - भीमटेकडी प्रभाग, वडाळी व मंगलधाम कॉलनीशुक्रवार -सातुर्णा, साईनगर व राठीनगरशनिवार - व्हीएमव्ही परिसर व पॅराडाईज कॉलनी. मोटारपंप लावून पाणी खेचणारे रडारवरशहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधीकरणाच्या पाईनलाईनला मोटारपंप लाऊन पाणी खेचले जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांकडे सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता हा प्रकार थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ज्यांच्याकडे मोटारपंपद्वारे पाणी खेचल्याचे निदर्शनास येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आवश्यकता पडल्यास पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. उन्हाळ्यातील वाढीव पाण्याची मागणी पूर्ण करणे व काही भागातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक झोनमधील पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. या नियोजनामुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. - किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, मजीप्रा.