शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पाणीटंचाई आराखडा, प्रशासनात लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सन २०२१ मध्ये उद्भवणाऱ्या टंचाईसाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात करण्यात ...

अमरावती : जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सन २०२१ मध्ये उद्भवणाऱ्या टंचाईसाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात करण्यात आली आहे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेत लगीनघाई सुरू झाली आहे. जिल्हा स्तरावरून तालुकास्तरावर पंचायत समित्यांना आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तरीदेखील मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. काही वर्षांत मात्र पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा थोड्याफार प्रमाणात कमी झाला असला तरी दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. पावसाने उसंत घेतल्यानंतर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचे आराखडे तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे आराखडे डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मागविण्यात आले आहे. यंदा उशिरापर्यंत पाऊस राहिल्याने टंचाई उशिरा सुरू होईल, असा अंदाज आहे. गतवर्षी जवळपास ५० ते ७० च्या वर वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. याशिवाय टँकर आणि टंचाईग्रस्त गावांतील नळजोडणी योजना दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशासनाकडून गतवर्षीही टंचाईचा आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठिवला होता. दोन वेळा दुरुस्तीनंतर त्या प्रस्तावाला मंजुरीसुद्धा देण्यात आली. त्यानुसार ही कामे करण्यात आली आहेत.

बॉक्स

आराखड्यात उपाययोजनांची कामे

दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसांत भेडसावणाऱ्या पाणीटंचाई निवारणार्थ प्रत्येक तालुक्याच्या टंचाई आराखड्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावे, याशिवाय टंचाईच्या पार्श्वभूमीवर नळजोडणीची कामे, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विंधन विहिरी, बोअरवले आदी कामांचा समावेश केला जातो.