शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 6, 2016 00:14 IST

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते.

चार रुपये किलो दर : अवकाळी पावसाचा फटकापथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या परिसरात कांद्याचे विक्रमी पीक घेण्याकरिता शेतकऱ्यामध्ये स्पर्धा लागत होती. कांद्याचे उत्पादन होवो अथवा न होवो काही शेतकरी पूर्वीपासून कांद्याचे पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी या परिसरात एकरी १०० ते ११० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेत होते. तेवढ्या पिकावर शेतकऱ्याचा कांदा पिकाला लागलेला खर्च निघून नफा मिळत होता. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र मागील वर्षापासून शेतकऱ्याला लागलेला खर्च निघत नसून तोटा येत आहे. त्याचे मुख्य कारण असे की, नैसर्गिक आपत्ती, वाढते रासायनिक खताचे दर, वाढती मजुरी, कांदा बियाचे वाढलेले दर व मुख्य कारण म्हणजे कांदा पिकाला कवडीमोल मिळणारा भाव आदी कारणे आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्याकरिता १६०० ते १८०० रुपये पायली या भावाने कांद्याचे बियाणे विकत घेऊन सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात वाफे तयार करून बियाणे टाकून रोप तयार करीत असे. कांदे रोपाची लागवड करण्याकरिता शेताची मशागत करून शेणखत फेकणे, एकरी प्रत्येकी तीन-तीन पोते पोटॅश व सुपर फॉस्पेटची रासायनिक खते फेकणे, वाफे तयार करणे, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोठे झालेल्या रोपाची वाफ्यात पाणी सोडून महिला मजुराकडून त्याचे रोपण (लागवड) केले जातात. २०० रुपये प्रतिदिवस महिलेला मजुरी दिली जाते. पाणी देणाऱ्या पुरुष मजुराला २५० रुपये दर दिवसाला मजुरी, निंदण-खुरपण करणे, रासायनिक मिश्र खताची कांदा मोठा होईपर्यंत तीन वेळा मात्रा देणे, तीन ते चार वेळा रोग निर्मूलनाकरिता फवारणी केली जाते. कांदा पीक मोठे झाल्यानंतर उपडण्याचा खर्च, कापणीचा खर्च असा एकूण शेतकऱ्याला ४० हजार रुपये एकरी खर्च येतो. यावर्षी काही शेतकरी व मजूर वर्गानी मोठ्या शेतकऱ्यांकडून ३० ते ३२ क्विंटल एकराप्रमाणे कांदा पिकाकरिता शेती लागवडीने केली. मात्र त्यांना ठरल्याप्रमाणे मूळ मालकाला ३० ते ३२ क्विंटल कांदा द्यावा लागला परिणाम केलेल्या खर्चातून त्यांना लागलेला खर्च तर निघणे कठीण उलट तोटा आला. कांदा पीक घेण्याकरिता इतका खटाटोप करून शिल्लक न उरणे ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतकऱ्याला एकरी १३० ते १४० क्विंटल कांदा व्हायला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे परवडेल. यावर्षी उत्पादित झालेल्या नवी कांद्याला चार रुपये प्रतिकिलोप्रमाणे कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. (वार्ताहर)