शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 6, 2016 00:14 IST

अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते.

चार रुपये किलो दर : अवकाळी पावसाचा फटकापथ्रोट : अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, करजगाव, सिरजगाव, परसापूर, रामापूर, कासमपूर, अंजनगाव सुर्जी, पांढरी खानमपूर आदी गावांत पूर्वीपासून पांढऱ्या कांद्याचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या परिसरात कांद्याचे विक्रमी पीक घेण्याकरिता शेतकऱ्यामध्ये स्पर्धा लागत होती. कांद्याचे उत्पादन होवो अथवा न होवो काही शेतकरी पूर्वीपासून कांद्याचे पीक वर्षानुवर्षे घेत आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी या परिसरात एकरी १०० ते ११० क्विंटल कांद्याचे उत्पादन घेत होते. तेवढ्या पिकावर शेतकऱ्याचा कांदा पिकाला लागलेला खर्च निघून नफा मिळत होता. त्यामुळे शेतकरी समाधानी होता. मात्र मागील वर्षापासून शेतकऱ्याला लागलेला खर्च निघत नसून तोटा येत आहे. त्याचे मुख्य कारण असे की, नैसर्गिक आपत्ती, वाढते रासायनिक खताचे दर, वाढती मजुरी, कांदा बियाचे वाढलेले दर व मुख्य कारण म्हणजे कांदा पिकाला कवडीमोल मिळणारा भाव आदी कारणे आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड करण्याकरिता १६०० ते १८०० रुपये पायली या भावाने कांद्याचे बियाणे विकत घेऊन सप्टेंबर ते आॅक्टोबर महिन्यात वाफे तयार करून बियाणे टाकून रोप तयार करीत असे. कांदे रोपाची लागवड करण्याकरिता शेताची मशागत करून शेणखत फेकणे, एकरी प्रत्येकी तीन-तीन पोते पोटॅश व सुपर फॉस्पेटची रासायनिक खते फेकणे, वाफे तयार करणे, डिसेंबर ते जानेवारी महिन्यात मोठे झालेल्या रोपाची वाफ्यात पाणी सोडून महिला मजुराकडून त्याचे रोपण (लागवड) केले जातात. २०० रुपये प्रतिदिवस महिलेला मजुरी दिली जाते. पाणी देणाऱ्या पुरुष मजुराला २५० रुपये दर दिवसाला मजुरी, निंदण-खुरपण करणे, रासायनिक मिश्र खताची कांदा मोठा होईपर्यंत तीन वेळा मात्रा देणे, तीन ते चार वेळा रोग निर्मूलनाकरिता फवारणी केली जाते. कांदा पीक मोठे झाल्यानंतर उपडण्याचा खर्च, कापणीचा खर्च असा एकूण शेतकऱ्याला ४० हजार रुपये एकरी खर्च येतो. यावर्षी काही शेतकरी व मजूर वर्गानी मोठ्या शेतकऱ्यांकडून ३० ते ३२ क्विंटल एकराप्रमाणे कांदा पिकाकरिता शेती लागवडीने केली. मात्र त्यांना ठरल्याप्रमाणे मूळ मालकाला ३० ते ३२ क्विंटल कांदा द्यावा लागला परिणाम केलेल्या खर्चातून त्यांना लागलेला खर्च तर निघणे कठीण उलट तोटा आला. कांदा पीक घेण्याकरिता इतका खटाटोप करून शिल्लक न उरणे ही शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. उत्पादन खर्चाच्या मानाने शेतकऱ्याला एकरी १३० ते १४० क्विंटल कांदा व्हायला पाहिजे. तेव्हा शेतकऱ्यांना कांदा पीक घेणे परवडेल. यावर्षी उत्पादित झालेल्या नवी कांद्याला चार रुपये प्रतिकिलोप्रमाणे कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत आहे. (वार्ताहर)