शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

वन्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांसमोरही पाणी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:13 IST

उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत.

नदी-नाले आटले : पाण्याची पातळीही घसरली, वन्यप्राणी मध्यप्रदेशकडे स्थलांतरितलोकमत न्यूज नेटवर्कधारणी : उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा गाठता गाठता मेळघाटातील नदी-नाले पूर्णपणे कोरडे पडले आहेत. प्रत्येक नदीपात्रात केवळ पाण्याचे अस्तित्व असल्याचे पांढरे निशाण दगडांवर पहावयास मिळत आहे. मोठ्या मुश्किलीने एखाद्या डोहात काही लीटर पाणी दिसल्यास ते फक्त सौभाग्यच म्हणावे लागेल.मेळघाटात तापी, गडगा, सिपना, खापरा, खंडू, दवाल यासारखे मोठे नदी असून हजारोंच्या संख्येने नाले आहेत. परंतु मे महिन्याच्या शेवटचा पंधरवाडा सुरू असताना जवळपास बहुतांश नदी-नाले पूर्णपणे आटल्याचे चित्र आहे. नदी-नाल्यातील पात्र आटल्याने वन्यप्राण्यांसमोर भीषण जलसंकट उभे ठाकले आहे. आपली तहान भागविण्यासाठी वन्यप्राण्यांनी गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. गावाकाठातील नदीपात्रात सुकसुकाट असल्याने पाळीव प्राण्यांनाही सळो की पळो करून सोडले आहे. वन्यप्राण्यांची अवस्था तर आणखी बिकट झालेली आहे. एकीकडे पाण्याची तीव्रता सुरू असताना दुसरीकडे जंगलांना लागणाऱ्या आगीमुळे त्यांच्या वास्तव्यालाच धोका निर्माण झाला आहे. सध्या जंगलातील वृक्षवल्ली पाने विरहीत झाले असल्याने सावलीचाही प्रश्न वन्यप्राण्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे मेळघाटातील वाघ, बिबट, रानगवा, अस्वल, जंगली डुकरे यांचेसह हरिण, सांभर, मोर व माकडांसारख्या वन्यप्राण्यांना उन्हाळा काढणे दुष्कर ठरत आहे. वन्यप्राण्यांसाठी वनविभागाकडून तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यांत पाणी नसल्याने वन्यप्राणी जंगलाकाठच्या तापी नदी पाण्याच्या शोधात उतरून मध्यप्रदेशाकडे स्थांनांतरित करीत आहे. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात वन्यप्राण्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता वन्यप्रेमींकडून वर्तविण्यात येत आहे.