शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील १६३ गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 19:46 IST

सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला.

- गजानन मोहोड

अमरावती : सर्वत्र पावसाचा कहर सुरू असला तरी अमरावती विभागातील सहा तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे या तालुक्यातील १६३ गावांमधील भूजलात १ ते ३ मीटरपर्यंत तूट आल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) च्या ४,८३२ निरीक्षण विहिरींच्या नोंदीद्वारे नोंदविले गेले. या गावांमध्ये यंदा पाणीटंचाई राहणार आहे. याविषयीचा अहवाल प्रशासनाला देण्यात आला आहे. भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे पावसाळ्यानंतर विभागातील नियमित निरीक्षणाच्या  ६५३ विहिरी व नव्याने स्थापित केलेल्या ४१६९ निरीक्षण विहिरींच्या स्थिर पाणीपातळीच्या नोंदींचा पावसाच्या नोंदीशी तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर  हा निष्कर्ष पुढे आला. विभागात सहा तालुक्यांत सरासरीच्या ३० टक्क्यांपर्यंत कमी पाऊस झालेला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ३९ गावांमध्ये भूजलस्तर १ ते ३ मीटरपर्यंत घटले. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ तालुक्यात १४ गावे, घाटंजी तालुक्यात १४ गावे, कळंब तालुक्यात ६ गावे, केळापूर तालुक्यात ४८ गावे, तर राळेगाव तालुक्यात ९ गावंमधील भूजलात घट झाल्याने यंदा पाणीटंचाईचे सावट राहणार असल्याचा ‘जीएसडीए’चा नित्कर्ष आहे. पश्चिम विदर्भात एकूण ५६ पैकी ५२ तालुक्यांत अद्यापही पुरेसे भूजल पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४५६ गावांमध्ये भूजल १ मीटरपर्यंत घटले. अकोला जिल्ह्यात सात तालुक्यांमधील ३०० गावे, यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांतील ६३५ गावे, बुलडाणा जिल्ह्यात १० तालुक्यांतील १५० गावे व वाशिम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ९४ गावांत अद्यापही भूजलात १ मीटरपर्यंत तूट आलेली असल्याचा भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आहे.बॉक्सटंचाई राहणारे तालुके, गावांची भूजल स्थितीजिल्हा        तालुका    २ ते ३ मी    १ ते २ मी    एकूणअमरावती    भातकुली    १६    २३    ३९यवतमाळ    घाटंजी    ०७    ४०    ४७यवतमाळ    कळंब    ००    ०६    ०६यवतमाळ    केळापूर    ०२    ४६    ४८यवतमाळ    राळेगाव    ००    ०९    ०९यवतमाळ    यवतमाळ    ०१    १३    १४एकूण        ०६    २६    १३७    १६३

बॉक्सभूजलाचा उपसा अन् टंचाईची कारणे पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पिकासाठी तसेच बहुवार्षिक पिकांसाठी भूजलाचा झालेला अमर्याद उपसा, विंधन विहिरीद्वारे अतिखोल जलधारांतून होत असलेला भूजलाचा उपसा, सिंचनासाठी वापरण्यात येत असलेली पारंपरिक प्रवाही पद्धत व त्याद्वारे पाण्याचा अपव्यय, पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव आदी कारणांमुळे भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत या तालुक्यांमध्ये २० ते ३० मिमी पर्जन्यमान कमी झाल्याने पाणीसंकट ओढवणार आहे.