शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जलसंधारण कामांची चौकशी

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

विदर्भ विकास योजनेत विदर्भात झालेल्या सुमारे ३० कोटी रूपयांच्या जलसंधारणाच्या कामांच्या चौकशीचे आदेश कृषी आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. यामध्ये अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यांतील

अमरावती : विदर्भ विकास योजनेत विदर्भात झालेल्या सुमारे ३० कोटी रूपयांच्या जलसंधारणाच्या कामांच्या चौकशीचे आदेश कृषी आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. यामध्ये अमरावती व यवतमाळ या दोन जिल्ह्यांतील जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे. ही चौकशी करण्यासाठी हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावकर यांच्या नेतृत्वातील समिती या दोन जिल्ह्यांत दाखल झाली आहे. त्यांनी चौकशीची कारवाई सुरू केल्याची माहिती आहे. विदर्भात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी प्रश्नामुळे या भागासाठी विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत जलसंधारणाची कामे कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आली आहेत. या कामांमध्ये सिमेंट बंधारे, नाला खोलीकरण, सलग समजलचर, शेततळे आदी कामांचा समावेश आहे. या योजनेतून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात सुमारे ३० कोटी रूपयांची कामे करण्यात आली आहेत. या कामांची देणे अद्यापही बाकी आहे. सदर कामे खरोखरच करण्यात आली आहेत किंवा नाही, अंदाजपत्रकानुसार कामे झाली आहेत काय? याची पाच टक्के तपासणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्त कार्यालयाने दिल्या. हिंगोली येथील उपविभागीय कृषी अधिकारी उत्तम शिवणगावकर यांच्या पथकाला अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांच्या तपासणीची जबाबदारी दिली आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. हिंगोली येथील तपासणी समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. ही समिती आठवडाभर तपासणी करून अंतिम अहवाल कृषी आयुक्तांना सादर करणार आहे. त्यानंतरच या कामांचे देयके अदा केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)