शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:06 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत.

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा : राज्याचे जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईलअमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत. गोरगरिबांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देणारे हे अभियान आहे. समाजात या कामामुळे विश्वास निर्माण होत असून महाराष्ट्रात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जल पुनर्भरणाचे काम अधिक गतीने केल्यास पुढील काळात राज्यातील जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईल, असा विश्वास मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रोहयो व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव प्रवीण दराडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाचे सचिव नाईक यांच्यासह जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी विभागातील जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित उपस्थित होते.जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, जलयुक्त शिवाराची कामे हे स्वेच्छेने आणि मनापासून करत आहोत, असे समजावे. राज्यात जे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनापासून करतील ते अधिकारी राज्यातील ‘युनिक आॅफिसर’ बनतील. जलयुक्त शिवार हा कार्यक्रम नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. या कामात पारदर्शकता आहे. हे काम पवित्र असून यात झोकून देऊन काम करणाऱ्यांना कधीच पश्चा:ताप होत नाही. या कामासाठी मला कधीही बोलवा मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचा आदर आहे. त्यांनी सर्वोच्च प्राथमिकता याला दिली आहे. जलयुक्त शिवारच्या कामांना भेटीजलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अधीक्षक कृषी अधिकारी मुळे उपस्थित होते. सावर्डी येथील पाझर तलाव आणि डवरगाव येथील तलावातील काढलेल्या गाळाची पाहणी केली. जलयुक्त शिवारमध्ये १३९६ गावांची निवडविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी अमरावती विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-२०१६ या वषार्साठी १३९६ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. आतापर्यंत २६८८२ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ५२४ गावात लोकसहभागातून २२३४ कामे सुरु आहेत. या कामाद्वारे ७५२४५८७ घन मीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढलेल्या रुंदीकरण, खोलिकरण कामांची लांबी ३४४ कि.मी. आहे.