शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

जलसाक्षरता मोहिमेतून पाण्याचे संकट टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:06 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत.

जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा : राज्याचे जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईलअमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतची कामे ही समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत नेणारी आहेत. गोरगरिबांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त करून देणारे हे अभियान आहे. समाजात या कामामुळे विश्वास निर्माण होत असून महाराष्ट्रात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जल पुनर्भरणाचे काम अधिक गतीने केल्यास पुढील काळात राज्यातील जलयुक्त शिवार अभियान देशाचे आदर्श मॉडेल होईल, असा विश्वास मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केला.येथील विभागीय आयुक्त कार्यालयात रोहयो व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्री सचिवालयाचे सचिव प्रवीण दराडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाचे सचिव नाईक यांच्यासह जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी विभागातील जलयुक्त शिवार कामाचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलयुक्त शिवार योजनेशी संबंधित उपस्थित होते.जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले की, जलयुक्त शिवाराची कामे हे स्वेच्छेने आणि मनापासून करत आहोत, असे समजावे. राज्यात जे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी मनापासून करतील ते अधिकारी राज्यातील ‘युनिक आॅफिसर’ बनतील. जलयुक्त शिवार हा कार्यक्रम नवी ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण करणारा आहे. या कामात पारदर्शकता आहे. हे काम पवित्र असून यात झोकून देऊन काम करणाऱ्यांना कधीच पश्चा:ताप होत नाही. या कामासाठी मला कधीही बोलवा मी मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तयार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कामाचा आदर आहे. त्यांनी सर्वोच्च प्राथमिकता याला दिली आहे. जलयुक्त शिवारच्या कामांना भेटीजलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या विविध कामांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांच्यासह उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, अधीक्षक कृषी अधिकारी मुळे उपस्थित होते. सावर्डी येथील पाझर तलाव आणि डवरगाव येथील तलावातील काढलेल्या गाळाची पाहणी केली. जलयुक्त शिवारमध्ये १३९६ गावांची निवडविभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी अमरावती विभागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-२०१६ या वषार्साठी १३९६ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. आतापर्यंत २६८८२ इतकी कामे पूर्ण झाली आहेत. तसेच ५२४ गावात लोकसहभागातून २२३४ कामे सुरु आहेत. या कामाद्वारे ७५२४५८७ घन मीटर गाळ काढण्यात आला. गाळ काढलेल्या रुंदीकरण, खोलिकरण कामांची लांबी ३४४ कि.मी. आहे.