शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

जलयुक्त शिवारची आघाडी; रोहयो माघारली

By admin | Updated: December 23, 2015 00:20 IST

देशासाठी वरदान ठरलेली महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यान्वित रोजगार हमी योजना हल्ली जलयुक्त शिवार योजनेमुळे माघारली आहे.

निधीचा तुटवडा : १२ पैकी एकाच विभागात रोजगार हमी योजनेची कामे सुरूगणेश वासनिक अमरावतीदेशासाठी वरदान ठरलेली महाराष्ट्र शासनाद्वारे कार्यान्वित रोजगार हमी योजना हल्ली जलयुक्त शिवार योजनेमुळे माघारली आहे. रोहयोत निधीचा अभाव असल्याने प्रशासकीय यंत्रणादेखील या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या फक्त वन विभागात रोहयोची कामे सुरू आहेत. गावांचा विकास आणि स्थानिकांच्या हाताला काम, हे उद्दिष्ट ठेवून राज्यात १९७५ साली रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर या योजनेची व्याप्ती, उद्दिष्ट बघून केंद्र शासनाने रोजगार हमी योजना सन २००५ मध्ये सर्वत्र राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रोजगार हमी योजना गाव-खेड्यात आजतागायत राबविली जात आहे. मात्र, राज्यात युती शासन आरुढ होताच रोहयोकडे दुर्लक्ष करून दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी मागील वर्षापासून जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना जमिनीतील जलपातळी वाढविण्यासाठी निश्चितच फलदायी ठरणारी आहे. परंतु रोजगार हमी योजना १२ विभागात सुरू असताना वनविभाग वगळता अन्य ११ विभागांनी रोहयोची कामे बंद केली आहेत. या योजनेतून ९० दिवस रोजगाराची हमी तर मजुराला प्रतिदिन २६७ रुपये रोजंदारी मिळत होती. अचानक रोहयोची कामे मंदावल्याने ग्रामीण भागातील मजुराला रोजगारासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे युती शासनाने जलयुक्त शिवार योजना मोठा गाजावाजा करून सुरू केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वत:ला झोकत असल्याचे चित्र आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीचा पाऊस तर रोहयोसाठी ठणठणाट, असे विदारक चित्र आहे. ग्रामीण भागात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या रोहयोला गुंडाळण्याची शासनाची तयारी तर नाही नाा, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे. रोहयोला निधी मिळत नसल्याने ही योजना कशी राबवावी, हा प्रश्न पडला आहे. वनविभागात रोहयो अंतर्गत कामे केल्यानंतरही २ ते ३ महिन्यांपासून निधी उपलब्ध नसल्याने मजुरांना वेतन अदा करण्यासाठी संबंधितांना धावपळ करावी लागत आहे. मध्यंतरी रोहयोच्या मजुरीतील अपहार, कामातील अनियमितता टाळण्यासाठी या योजनेचे कामकाज आॅनलाईन करण्यात आले. मजुरांचे ई-मस्टर, बँकेत वेतन जमा करणे आदी कामकाजात पारदर्शकता आणली गेली. परिणामी ही योजना प्रभावीपणे राबविताना रोहयोसाठी निधी मिळत नसल्याने अचानक संबंधित यंत्रणेनेदेखील हात आखुडता घेतला आहे. हल्ली जलयुक्त शिवार योजनेसाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामी लागली आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या योजनेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असल्याने कोणता जिल्हा जलयुक्त शिवार योजनेत अव्वल राहील, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. सामाजिक वनिकरण विभागाने सन २०१३ मध्ये रोहयोची कामे बंद केली आहेत.