शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प लवकरच

By admin | Updated: July 28, 2014 23:18 IST

नजिकच्या सुकळी येथे महापालिकेच्या अखत्यारित कम्पोस्ट डेपोत लवकरच कचऱ्यापासून खतनिर्मिती हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. त्याकरिता पर्यावरण तज्ज्ञांनी जागेची पाहणी केली.

तज्ज्ञांची भेट: जुन्याच जागी बांधकामअमरावती : नजिकच्या सुकळी येथे महापालिकेच्या अखत्यारित कम्पोस्ट डेपोत लवकरच कचऱ्यापासून खतनिर्मिती हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. त्याकरिता पर्यावरण तज्ज्ञांनी जागेची पाहणी केली. तुंबलेला कचरा कसा कमी करता येईल, या विषयी निर्णय घेण्यात आला आहे. नवीन जागा हस्तांतराचा वाद संपुष्टात येईपर्यंत जुन्याच जागेवर प्रकल्प उभारण्याचे ठरविण्यात आहे. आॅगस्ट अखेर याप्रकल्पाचा श्रीगणेशाचा संकल्प महापालिकेचा आहे.महापालिका प्रशासन हल्ली अनेक संकटातून वाटा शोधत आहे. आर्थिक टंचाई ही गंभीर समस्या असली तरी घनकचरा विल्हेवाट ही मोठी समस्या उभी ठाकली आहे. गत आठवड्यात आयुक्त अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली कम्पोस्ट डेपोतील समस्याविषयी बैठक घेण्यात आली. याबैठकीला राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण तज्ज्ञ माल्हे, शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम, स्वच्छता विभाग प्रमुख देवेंद्र गुल्हाणे, पर्यावरण अधिकारी महेश देशमुख, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अजय जाधव, ईको फिल प्रा.लि. चे पटनाईक आदी उपस्थित होते. अमरावती नगरपरिषद ते महापालिका स्थापनेपर्यंत सुकळी येथील कम्पोस्ट डेपोत कचरा साठवून ठेवला जात आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्रशासनाला अपयश आल्याने या भागात तुंबलेल्या कचऱ्यामुळे गंभीर स्वरुपाची रोगराई होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचऱ्यापासून खत निर्मिती हा प्रकल्प राबविण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. या स्वरुपाचा प्रकल्प राबविण्यासाठी दोन कंपन्याला कंत्राट सोपविण्यात आला होता. मात्र काही कारणामुळे कचऱ्यापासून खत व वीज निर्मिती हा प्रकल्प सुरु करता आला नाही. आता आयुक्त डोंगरे यांनी हा प्रकल्प नव्याने सुरु करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. मुंबई येथील ईको फिल कंपनीला ३० वर्षांसाठी कचऱ्यापासून खत निर्मितीला कंत्राट सोपविण्यात आला. प्रकल्पासाठी नव्याने १८ हेकटर जागा हस्तांतरण करण्यात आली. काही कारणांमुळे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया लांबणीवर पडली व हा प्रकल्प वेळेत सुरु करता आला नाही. मात्र कंम्पोस्ट डेपोत ४० ते ५० फूट उंच तुंबलेला कचरा कमी करणे, हे प्रशासनापुढे आव्हान असल्याने ते पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी युद्धस्तरावर हालचाली चालविल्या आहेत. प्रकल्प साकारण्यासाठी जागेची तपासणी करण्यात आली असून जुन्या जागेवर कचरा मोकळा करीत प्रकल्पाचे बांधकाम केले जाणार आहे. एकदा हा प्रकल्प सुरु झाला की, २ ते ३ वर्षांतच कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लावली जाईल,अशी तयारी प्रशासनाची आहे. हस्तांतरित नवीन जागेवरही प्रकल्प साकारण्यात येणार आहे.