शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्ध्व वर्धा कार्यालय नव्या वर्षापासून बंद

By admin | Updated: November 10, 2015 00:27 IST

‘हेडटू टेल’ सिंंचनाची व्यवस्था करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अप्पर वर्धाचे पाणी देण्याची प्रशासनाची घोषणा एकीकडे हवेतच विरली आहे.

राज्य शासनाचे आदेश धडकले : शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले धामणगाव रेल्वे : ‘हेडटू टेल’ सिंंचनाची व्यवस्था करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अप्पर वर्धाचे पाणी देण्याची प्रशासनाची घोषणा एकीकडे हवेतच विरली आहे. दुसरीकडे मागील ४० वर्षांपासून जुना धामणगाव येथील ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक ३ चे कार्यालय बंद करण्यात येणार आहे़ यासंदर्भात राज्य शासनाने ३० आॅक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. १ जानेवारी २०१६ पासून या कार्यालयाला कुलूप लावण्याचे आदेशात देण्यात आले आहे़ चांदूररेल्वे जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाले. १३ कोटी रूपयांच्या मिळालेल्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला आहे. यातून ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांची होती़ सर्वाधिक सिंचनाचा लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न जाधव यांच्यासह तत्कालीन सर्वपक्षीय नेत्यांची होती. आज पिण्याच्या पाण्याला प्रथम, शेतीला द्वितीय तसेच उद्योगाला पाणी वितरणात तृतीय क्रमांक मिळावा, असा कायदा आहे़ मात्र, शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांवर वेळोवळी आंदोलन करण्याची वेळ आली आहे़ असे असताना आता येथील कार्यालयच बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहे़ मंगरूळ, शेंदूरजना कार्यालयाला लागले कुलूपमध्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरावा म्हणून तब्बल १३७६़६४ कोटीमध्ये हा प्रकल्प ८४ किलोमीटर अंतरात विस्तारला आहे़ जुना धामणगाव येथे सन १९८१ मध्ये ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक तीनची स्थापना करण्यात आली़ आसेगाव, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव, शेंदूरजना खुर्द असे पाच उपविभाग त्यावेळी तयार करण्यात आले होते़ उपविभागीय अभियंता, पाच शाखा अभियंता, पाच तांत्रिक सहायक, एक वरिष्ठ लिपीक, एक कनिष्ठ लिपीक, शिपाई, मजूर असे उपविभागीय कार्यालयाला कर्मचारी देण्यात आले़जुना धामणगाव विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना प्रथम शेंदूरजनाखुर्द येथील उपविभागीय कार्यालय अमरावती येथे हलवून ऊर्ध्व वर्धा विभाग १ ला जोडले़ कालवा दुरूस्तीकरिता निधी मिळत नाही. त्यामुळे हे कार्यालय बंद केले आहे.