शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

ऊर्ध्व वर्धा कार्यालय नव्या वर्षापासून बंद

By admin | Updated: November 10, 2015 00:27 IST

‘हेडटू टेल’ सिंंचनाची व्यवस्था करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अप्पर वर्धाचे पाणी देण्याची प्रशासनाची घोषणा एकीकडे हवेतच विरली आहे.

राज्य शासनाचे आदेश धडकले : शेवटच्या शेतकऱ्याला पाणी देण्याचे आश्वासन हवेतच विरले धामणगाव रेल्वे : ‘हेडटू टेल’ सिंंचनाची व्यवस्था करून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना अप्पर वर्धाचे पाणी देण्याची प्रशासनाची घोषणा एकीकडे हवेतच विरली आहे. दुसरीकडे मागील ४० वर्षांपासून जुना धामणगाव येथील ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक ३ चे कार्यालय बंद करण्यात येणार आहे़ यासंदर्भात राज्य शासनाने ३० आॅक्टोबर रोजी आदेश काढले आहेत. १ जानेवारी २०१६ पासून या कार्यालयाला कुलूप लावण्याचे आदेशात देण्यात आले आहे़ चांदूररेल्वे जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाले. १३ कोटी रूपयांच्या मिळालेल्या मूळ प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला आहे. यातून ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांची होती़ सर्वाधिक सिंचनाचा लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न जाधव यांच्यासह तत्कालीन सर्वपक्षीय नेत्यांची होती. आज पिण्याच्या पाण्याला प्रथम, शेतीला द्वितीय तसेच उद्योगाला पाणी वितरणात तृतीय क्रमांक मिळावा, असा कायदा आहे़ मात्र, शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांवर वेळोवळी आंदोलन करण्याची वेळ आली आहे़ असे असताना आता येथील कार्यालयच बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहे़ मंगरूळ, शेंदूरजना कार्यालयाला लागले कुलूपमध्य विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरावा म्हणून तब्बल १३७६़६४ कोटीमध्ये हा प्रकल्प ८४ किलोमीटर अंतरात विस्तारला आहे़ जुना धामणगाव येथे सन १९८१ मध्ये ऊर्ध्व वर्धा विभाग क्रमांक तीनची स्थापना करण्यात आली़ आसेगाव, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, धामणगाव, शेंदूरजना खुर्द असे पाच उपविभाग त्यावेळी तयार करण्यात आले होते़ उपविभागीय अभियंता, पाच शाखा अभियंता, पाच तांत्रिक सहायक, एक वरिष्ठ लिपीक, एक कनिष्ठ लिपीक, शिपाई, मजूर असे उपविभागीय कार्यालयाला कर्मचारी देण्यात आले़जुना धामणगाव विभागाचा कारभार सुरळीत सुरू असताना प्रथम शेंदूरजनाखुर्द येथील उपविभागीय कार्यालय अमरावती येथे हलवून ऊर्ध्व वर्धा विभाग १ ला जोडले़ कालवा दुरूस्तीकरिता निधी मिळत नाही. त्यामुळे हे कार्यालय बंद केले आहे.