शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तळणीत अखेरच्या विसाव्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:12 IST

पान २ लिड फोटो पी ०७ तळणी धामणगाव रेल्वे : आयुष्य सरल्यानंतर दुसऱ्याच कुणाच्या शेताच्या धुऱ्यावर, बांधावर अखेरचा ...

पान २ लिड

फोटो पी ०७ तळणी

धामणगाव रेल्वे : आयुष्य सरल्यानंतर दुसऱ्याच कुणाच्या शेताच्या धुऱ्यावर, बांधावर अखेरचा विसावा घेण्याची, मृतदेह नेऊन जाळण्याची पाळी तालुक्यातील तळणी येथे आली आहे. स्मशानभूमीची जागा समृद्धी महामार्गाच्या रस्ते विकास महामंडळाने अधिग्रहीत केली. त्यामुळे येथे अखेरचा विसाव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील १२०० लोकसंख्या असलेले तळणी हे गाव या गावाच्या परिसरातून समृद्धी महामार्ग गेला आहे. येथे पूर्वी असलेल्या स्मशानभूमीची ई-क्लासची जागा समृद्धी महामार्गासाठी अधिग्रहीत केली. आता जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते विकास महामंडळाला ही जागा दिली. पूर्वी ज्या स्मशानभूमीच्या जागेवर मृतदेहाचा दफनविधी, अंत्यसंस्कार करण्यात येत असे, त्या परिसरात समृद्धी महामार्ग झाला आहे. गाव परिसरात ई-क्लासची जागा नसून, तब्बल दोन किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या गावाच्या परिसरात स्मशानभूमी व्हावी म्हणून येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी जिल्हा प्रशासनापर्यंत पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे तर वस्तुस्थिती थेट विभागीय आयुक्तांपर्यंत मांडली. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने पाठ फिरवली आहे. उन्हाळ्याच्या काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कुठेही अंत्यसंस्कार करता येईल, मात्र पावसाळ्यात दोन किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेह न्यायचा कसा. असा प्रश्न येथील उपसरपंच विशाल भैसे यांनी विचारला आहे. पुढील काळात जागा उपलब्ध न झाल्यास समृद्धी महामार्गावरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा इशारा विशाल भैसे यांनी दिला आहे