शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरी स्वराज्य संस्थांना निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 15, 2016 00:16 IST

चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ८२४ रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचा शासनादेश काढण्यात आला.

४३ कोटींना मान्यता : पाठपुराव्याची गरज अमरावती : चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ८२४ रुपयांचे अनुदान देण्यात येत असल्याचा शासनादेश काढण्यात आला. मात्र, २० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही हा निधी संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या खात्यात जमा झालेला नाही. यंत्रणेसह पदाधिकाऱ्यांनाही या को्यवधी रुपयांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अपवाद वगळता बुहतांश महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीना हा निधी अद्यापही प्राप्त झालेला नही. जिल्ह्यातील ४३ कोटीच्यानिधीच्या प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील स्थानिक संस्थांना महापालिकेसह ४३ कोटींचा निधी वितरित करण्यास २४ आॅगस्टच्या शासनदेशाद्वारे मान्यता देण्यात आली. हा निधी नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालकांकडे सुपूर्द करण्यात आला. नगरपरिषद प्रशासन संचालनालयाने ही रक्कम संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हिशाची रक्कम एनईएफटी किंवा ईसीएचद्वारे वितरित करण्याच्या सूचना होत्या. मात्र १८-२० दिवस उलटून गेल्यानंतरही हा निधी खात्यात जमा झोला नाही. विशेष महापालिकांसह बहुतांश नगरपालिकांमध्ये डिसेंबर १६ ते मार्च १७ या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी हा निधी खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेवर आहे. याशिवाय राजकीय पदाधिकाऱ्यांकडूनही निधीचा विनियोग करण्याचे दबावतंत्र अवलंबविले जात आहे. निवडणुकीपूर्वी विकासकामे करुन मतदारांसमोर जाण्याचा पदाधिकारी-नगरसेवकांचा मानस आहे. संस्थानिहाय निधी अमरावती महापालिका २५.१९ कोटी, अचलपूर न.प. ४.३१ कोटी, अंजनगाव सुर्जी २.१० कोटी, वरुड न.प. २.१५ कोटी, मोर्शी न.प. १.५८ कोटी, दर्यापूर न.प. १.३८ कोटी, चांदूररेल्वे न.प. ७५.५२ लाख, चांदूर बाजार न.प. ७१.१० लाख, धामणगाव न.प. ८१.०९ लाख, शेंदूरजना १.०३ कोटी, चिखलदरा न.प. २३.७९ लाख, तिवसा नगरपंचायत १.३१ कोटी, धारणी नगरपंचायत ६८.५९ लाख, भातकुली नगरपंचायत ६७.१७ लाख, नांदगाव खंडेश्वर ९२.१२ लाख. ८२४ कोटींचा निधी आहरित करुन वितरित करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन संचार झाल्याचे आयुक्त तथा संचालक आणि सहायक संचालकांना आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन २०१६ - १७ या आर्थिक वर्षाकरिताच हा निधी खर्च करायचा आहे. मात्र अपवाद वगळता हा निधी अद्यापपर्यंतही संबंधित नागरी स्वराज्य संस्थांकडे पोहोचला नाही. महानगरपालिकेला १२.५९ कोटी प्राप्त १४ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अमरावती महापालिकेसाठी २५.१९ कोटी रुपये वितरित करण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिली. या २५.१९ कोटी रुपयांमधून महानगरपालिकेला १२.५० कोटी रुपयांचा पहिला टप्पा प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त हेमंत पवार यांनी दिली. १२२ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मनपाचा हिस्सा म्हणून हा निधी मजीप्राकडे हस्तांतरित करण्यात येणर आहे. उर्वरित रकमेची महापालिका प्रशासनाला प्रतीक्षा लागून राहिली आहे.