शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मला रोज भेट, फोन लावत जा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

अमरावती : मला रोज भेट, फोन लावत जा, असा तगादा लावत पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात ...

अमरावती : मला रोज भेट, फोन लावत जा, असा तगादा लावत पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेचा पाठलाग करून विनयभंग करण्यात आला. २१ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास ती महिला जेवडनगर भागातील द्वारकानाथनगरातून कामाला जात असताना नितीन तायडे (४०, रा. दस्तुरनगर) याने तिचा विनयभंग केला.

तिने आरडाओरड केली असता, तिचे आई-वडीलदेखील तेथे आले. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, पीडितेचे आरोपीशी प्रेमसंबंध होते. त्यानंतर अन्य व्यक्तीशी तिचा विवाह झाला. मात्र, पतीशी पटत नसल्याने ती सहा-सात वर्षांपासून मुलासह आईकडे राहण्यास आली. दोन वर्षांपूर्वी पीडितेला आरोपी पुन्हा भेटला. लग्नाअगोदरचे प्रेमसंबंध असल्याने तू मला रोज भेटत जा, फोन लावत जा, असा तगादा त्याने लावला. नकार दिला असता, त्याने धमकी दिली. याबाबत यापूर्वीदेखील राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर नितीन तायडे थांबला नाही. २१ सप्टेंबर रोजी त्याने पाठलाग करून विनयभंग केला. दुपारी ४ च्या सुमारास त्याच्याविरुद्ध कलम ३५४, ३५४ ड, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली.