शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गावकऱ्यांनी साकारले पाणीदार गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:40 IST

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : पिंपळगाव बैनाईचा राज्यातील सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता आमिरखान, किरण राव, चित्रपट निर्माते आषुतोष गोवारीकर, अभिनेते गिरीश कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये या गावाला अतिरिक्त पुरस्कार देण्यात येणार आहे.स्पर्धेत राज्यस्तरावर १६ गावात निवड झालेले अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (बैनाई) हे एकमेव गाव आहे. या स्पर्धेदरम्यान या गावाने १३४ शोषखड्डे, २४०० झाडांची रोपवाटिका, ९ हजार घनमिटरचे काम गावकऱ्यांच्या श्रमदानाद्वारे तसेच ९० हजार घनमीटर काम यंत्राद्वारे करण्यात आले. यात ३८ शेततळे, १५०० मीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सुमारे ३६०० मीटर लांबीचे शेतातील बांध इत्यादी कामाचा समावेश आहे. या कामाद्वारे गावाने १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्याची क्षमता केवळ ४५ दिवसांत निर्माण केली. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंतच्या कालावधीत सातत्याने या गावातील गावकºयांनी एकजुटीने श्रमदान करून ही किमया घडविली. उल्लखनीय बाब म्हणजे या गावातील मुस्लीम बांधवांनी प्रार्थनस्थळावर शोषखड्डा खोदून वाहून जाणारे पाणी अडविले तसेच या समाजातील महिला देखील श्रमदानात अग्रेसर राहिल्या. यानिमित्त विविध धर्माची व समाजाची मंडळी एकजुटीने या कामाला लागल्याने गावात एकोपा निर्माण झाला आह.े.पाणी फाऊंडेशनमधील कामाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला एकोपा व वाढलेली भूजल पातळी ही खरी जमेची बाजू आहे.- शरयू अजय पंडीतसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई हे गाव राज्यस्तरावर झळकले असून यापुढेही गावकºयांच्या सहकार्यातून या कार्याचे सातत्य आम्ही कायम ठेवू.- श्रीकृष्ण राऊतउपसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई, मोखड, काजना व तालुक्यातील इतर २३ गावकºयांनाही श्रमदानातून पाणीदार गावे साकारली. आता तालुक्यातील इतर गावांनीसुद्धा कित्ता गिरवावा.- मनोज लोणारकर,तहसीलदार