शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गावकऱ्यांनी साकारले पाणीदार गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:40 IST

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : पिंपळगाव बैनाईचा राज्यातील सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता आमिरखान, किरण राव, चित्रपट निर्माते आषुतोष गोवारीकर, अभिनेते गिरीश कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये या गावाला अतिरिक्त पुरस्कार देण्यात येणार आहे.स्पर्धेत राज्यस्तरावर १६ गावात निवड झालेले अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (बैनाई) हे एकमेव गाव आहे. या स्पर्धेदरम्यान या गावाने १३४ शोषखड्डे, २४०० झाडांची रोपवाटिका, ९ हजार घनमिटरचे काम गावकऱ्यांच्या श्रमदानाद्वारे तसेच ९० हजार घनमीटर काम यंत्राद्वारे करण्यात आले. यात ३८ शेततळे, १५०० मीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सुमारे ३६०० मीटर लांबीचे शेतातील बांध इत्यादी कामाचा समावेश आहे. या कामाद्वारे गावाने १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्याची क्षमता केवळ ४५ दिवसांत निर्माण केली. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंतच्या कालावधीत सातत्याने या गावातील गावकºयांनी एकजुटीने श्रमदान करून ही किमया घडविली. उल्लखनीय बाब म्हणजे या गावातील मुस्लीम बांधवांनी प्रार्थनस्थळावर शोषखड्डा खोदून वाहून जाणारे पाणी अडविले तसेच या समाजातील महिला देखील श्रमदानात अग्रेसर राहिल्या. यानिमित्त विविध धर्माची व समाजाची मंडळी एकजुटीने या कामाला लागल्याने गावात एकोपा निर्माण झाला आह.े.पाणी फाऊंडेशनमधील कामाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला एकोपा व वाढलेली भूजल पातळी ही खरी जमेची बाजू आहे.- शरयू अजय पंडीतसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई हे गाव राज्यस्तरावर झळकले असून यापुढेही गावकºयांच्या सहकार्यातून या कार्याचे सातत्य आम्ही कायम ठेवू.- श्रीकृष्ण राऊतउपसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई, मोखड, काजना व तालुक्यातील इतर २३ गावकºयांनाही श्रमदानातून पाणीदार गावे साकारली. आता तालुक्यातील इतर गावांनीसुद्धा कित्ता गिरवावा.- मनोज लोणारकर,तहसीलदार