शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांनी साकारले पाणीदार गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:40 IST

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : पिंपळगाव बैनाईचा राज्यातील सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश

संजय जेवडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात या गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिनेअभिनेता आमिरखान, किरण राव, चित्रपट निर्माते आषुतोष गोवारीकर, अभिनेते गिरीश कुळकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाणी फाऊंडेशनतर्फे १० लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून महाराष्ट्र शासनातर्फे पाच लाख रुपये या गावाला अतिरिक्त पुरस्कार देण्यात येणार आहे.स्पर्धेत राज्यस्तरावर १६ गावात निवड झालेले अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (बैनाई) हे एकमेव गाव आहे. या स्पर्धेदरम्यान या गावाने १३४ शोषखड्डे, २४०० झाडांची रोपवाटिका, ९ हजार घनमिटरचे काम गावकऱ्यांच्या श्रमदानाद्वारे तसेच ९० हजार घनमीटर काम यंत्राद्वारे करण्यात आले. यात ३८ शेततळे, १५०० मीटर नाला रुंदीकरण व खोलीकरण, सुमारे ३६०० मीटर लांबीचे शेतातील बांध इत्यादी कामाचा समावेश आहे. या कामाद्वारे गावाने १० कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी अडविण्याची क्षमता केवळ ४५ दिवसांत निर्माण केली. ८ एप्रिल ते २२ मे पर्यंतच्या कालावधीत सातत्याने या गावातील गावकºयांनी एकजुटीने श्रमदान करून ही किमया घडविली. उल्लखनीय बाब म्हणजे या गावातील मुस्लीम बांधवांनी प्रार्थनस्थळावर शोषखड्डा खोदून वाहून जाणारे पाणी अडविले तसेच या समाजातील महिला देखील श्रमदानात अग्रेसर राहिल्या. यानिमित्त विविध धर्माची व समाजाची मंडळी एकजुटीने या कामाला लागल्याने गावात एकोपा निर्माण झाला आह.े.पाणी फाऊंडेशनमधील कामाच्या निमित्ताने गावात निर्माण झालेला एकोपा व वाढलेली भूजल पातळी ही खरी जमेची बाजू आहे.- शरयू अजय पंडीतसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई हे गाव राज्यस्तरावर झळकले असून यापुढेही गावकºयांच्या सहकार्यातून या कार्याचे सातत्य आम्ही कायम ठेवू.- श्रीकृष्ण राऊतउपसरपंच, पिंपळगाव बैनाई.पिंपळगाव बैनाई, मोखड, काजना व तालुक्यातील इतर २३ गावकºयांनाही श्रमदानातून पाणीदार गावे साकारली. आता तालुक्यातील इतर गावांनीसुद्धा कित्ता गिरवावा.- मनोज लोणारकर,तहसीलदार