शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

विदर्भातील संत्र्याला प्रक्रियेचा होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:37 IST

विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

ठळक मुद्देठाणाठुणीत ज्यूस प्रकल्प। मोर्शी तालुक्यातील संत्रा उन्नती प्रकल्पामुळे उत्पादकांना ‘अच्छे दिन’

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : विदर्भातील संत्र्याचा ज्यूस काढण्याचा प्रकल्प ठाणाठुणी येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीस नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, संत्रा उत्पादकांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.ठाणाठुनी येथे १०० एकरापेक्षा अधिक जमिनीवर जैन इरिगेशन, कोकाकोला व शासन भागीदार असलेला संत्रा उन्नती प्रकल्प नव्याने उदयास येत असून, हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. संत्रा प्रकल्प हा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी उन्नतीची पर्वणीच ठरणार आहे. विदर्भातील संत्र्याला आता प्रक्रियेची साथ लाभणार आहे. तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करण्यात आली आहे.राज्यात दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड होते. त्यातील सर्वाधिक लागवड क्षेत्र अमरावती जिल्ह्याच्या वरूड, मोर्शी परिसरात आहे. त्यामुळेच या भागाला ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’देखील म्हटले जाते. याआधी मोर्शी, वरूड तालुक्यात संत्रा ज्यूस प्रकल्पाची उभारणी शक्य झाली नाही. स्थानिकांच्या दबावामुळे कृषी औद्योगिक विकास मंडळाच्या माध्यमातून मायवाडी (जि. अमरावती) व काटोल (जि. नागपूर) येथे संत्रा ग्रेडिंग आणि साठवण प्रकल्प उभे झाले. परंतु, त्याचा संत्रा उत्पादकांना काही एक फायदा झाला नाही.अशी आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्येशेतकऱ्यांकडून ‘सी’ ग्रेड संत्री व चुरा विकत घेतील. त्याला निश्चित दर मिळेल. लेमन ज्यूस तयार होणार; त्यामुळे प्रकल्प सात महिने चालणार. बेडवरील सघन लागवडीकरिता एकरी ३३३ रोपांची गरज. ठिबक सिंचनाचा खर्च राहील. लागवडीनंतर तीन वर्षांत फळधारणा. या कालावधीत हळद किंवा आल्याचे आंतरपीक घेता येते. २० हजार हेक्टर अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांत लागवडीचे उद्दिष्ट आहे. १०४ एकरांवर साकारणार प्रकल्प. ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प एका वर्षात पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा आहे.शेतकऱ्यांना सुविधाब्राझील येथीलच पाच वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाणार आहेत. प्रात्यक्षिक प्लॉट राहतील. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोयदेखील या ठिकाणी आहे. हायटेक आॅडिओ व्हिडीओ बसचा संत्रा उन्नती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी व संत्राबागांना भेटी देण्यासाठी उपयोग होणार असून, त्याद्वारे शेतकºयांना दर्जेदार शेती प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत.