शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:15 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.

ठळक मुद्देफळगळ सुरू : तीव्र पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.जिल्ह्यातून संत्र्याचे सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टर क्ष्ोत्र वरूड तालुक्यात आहे. संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटायला सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. नऊ सिंचन प्रकल्पामध्ये केवळ २० ते ३० टक्केच जलसाठा आहे.अतिशय तापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्रीबेरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. तापमान वाढल्याने तसेच कोळी रोगाने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आंबिया बहराला गळती !तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून, कोट्यवधी रुपयांची संत्री या परिसरातून विकली जातात. गेल्या काही वर्षापासून निसर्ग कोपला असल्याने आंबिया बहराला दृष्ट लागली आहे.मार्च, एप्रिल महिन्यातच अतितापमानामुळे मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने शेतकºयांच्या हाती येणारे संत्र्याचे नगदी पीक बुडाले आहे. संत्रा उत्पादकांवर दरवर्षी अस्मानी संकट उभे ठाकत आहे.अतिशय तापमानाचा फटका बसत असल्याने ५० टक्क्यांवर आंबिया बहराला गळती लागली आहे. कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सर्वेक्षण करून शासनाकडे तसा अहवाल द्यावा.- उद्धव फुटाणे, संत्राउत्पादक, तिवसाघाट