शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 22:15 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.

ठळक मुद्देफळगळ सुरू : तीव्र पाणीटंचाई, वाढत्या तापमानाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत.जिल्ह्यातून संत्र्याचे सर्वाधिक २० हजार ६०० हेक्टर क्ष्ोत्र वरूड तालुक्यात आहे. संत्र्याच्या आंबिया बहराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाईने तोंड वर काढले. विहिरी आटायला सुरुवात झाली, तर बोअर बंद पडले. नऊ सिंचन प्रकल्पामध्ये केवळ २० ते ३० टक्केच जलसाठा आहे.अतिशय तापमान आणि खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्रा वाचविणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे.आवक असलेल्या ठिकाणावरून पाणी घेऊन रात्रीबेरात्री ओलीत करून संत्रा जिवंत ठेवावा लागत आहे. तापमान वाढल्याने तसेच कोळी रोगाने आंबिया बहराला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.आंबिया बहराला गळती !तालुक्यात संत्राउत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने असून, कोट्यवधी रुपयांची संत्री या परिसरातून विकली जातात. गेल्या काही वर्षापासून निसर्ग कोपला असल्याने आंबिया बहराला दृष्ट लागली आहे.मार्च, एप्रिल महिन्यातच अतितापमानामुळे मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याने शेतकºयांच्या हाती येणारे संत्र्याचे नगदी पीक बुडाले आहे. संत्रा उत्पादकांवर दरवर्षी अस्मानी संकट उभे ठाकत आहे.अतिशय तापमानाचा फटका बसत असल्याने ५० टक्क्यांवर आंबिया बहराला गळती लागली आहे. कोट्यवधीचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने सर्वेक्षण करून शासनाकडे तसा अहवाल द्यावा.- उद्धव फुटाणे, संत्राउत्पादक, तिवसाघाट