शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्हायल संपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार फ्रंट लाईन वर्कर यांचे लसीकरण आटोपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोनो प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सर्वत्र सुरू करण्यात आली. सुरुवातीला लसीचा साठा पुरेसा असल्याने शहरासोबतच ग्रामीण भागात लसीकरणाने गती घेतली होती. अशातच लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर साधारणत: १२ एप्रिल रोजी जिल्ह्यात २० हजार लसींच्या डोसचा पुरवठा शासनाकडून करण्यात आला होता. यातील १४ हजार लस १४ तालुक्याला प्रत्येकी १ हजाराप्रमाणे पुरवठा करण्यात आला होता. मात्र, आता हा लसीचा साठाही संपला आहे. परिणामी जिल्हाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सुरू केलेली लसीकरणाची मोहीम गत दोन दोन दिवसांपासून लसीचा साठा संपल्यामुळे जिल्हाभरात ८० पेक्षा जास्त केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे आता नवीन लसीचा स्टॉक येईपर्यंत तरी ही लसीकरणाची केंद्र सुरू होणे अशक्य असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

नागरिक जात आहेत परत

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा संपल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रथम व द्वितीय डोस घेणाऱ्या नागरिकांची लसीकरण केंद्राकडे गर्दी होत असताना लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना आल्यापावली घराकडे परत जावे लागत आहे.

कोट

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी १४ तालुक्याला १४ हजार लसीचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानुसार पीएचसीसह ग्रामीण भागातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, आता लसीचा स्टॉक नसल्यामुळे लसीकरणाची केंद्र तूर्तास बंद आहेत.

- डॉ.दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी