शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

शेतातील मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत ...

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत होता. आज आधुनिक युगात शेतकऱ्याने ही आपली वाटचाल बदलल्यामुळे आता मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमालाच्या रक्षणासाठी शेतात मचाण बांधत असे. साधारणत: शेताच्या मध्यभागी उंचावर ती बांधण्यात येत होती. पिकाचे जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे व स्वतःचेही रक्षण व्हावे, हा मचाण उंचावर बांधण्यामागचा हेतू असायचा. परंतु, कालांतराने अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीला जोडधंदा म्हणून अनेक योजना मिळत गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एखादी शेड बांधून कुक्कुटपालन, पशुपालन सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. ज्या शेतकऱ्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घराची निर्मिती केल्याचेही दिसून येते.

आता या मचाणकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसते आहे. पंधरा-वीस वर्ष अगोदर शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्वारी हे मुख्य पीक म्हणून पेरणी करत होता. परंतु, जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग लावणे बंद केले. त्यामुळे शेतामध्ये उंचावर मचाण बांधण्यातसुद्धा कालांतराने खंड पडत गेला, असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

पूर्वी शेताचे रक्षण करण्यासाठी मोठे जमीनदार आपल्या शेतामध्ये रखवालदार ठेवत असत. आता मात्र कोणीही शेतकरी रखवालदार ठेवत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याने रखवालदार ठेवणे गरजेचे होते, आता मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे, काटेरी अथवा विद्युत कुंपण योजनेंतर्गत झाल्याने रखवालदाराची गरजसुद्धा पडत नसल्याचे सांगितले जात आहे.

विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकरी तरी कसा मागे राहणार, त्यामुळे जुन्या रुढीला फाटा देत अशा मचाणांची संख्या लुप्त झाली आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला मचाणचे चित्र फक्त पुस्तकांमधूनच बघायला नक्की मिळणार...

170921\img-20210815-wa0502.jpg

फोटो