शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

शेतातील मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:13 IST

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत ...

आपल्या शेताचे रक्षण जंगली प्राण्यांपासून व्हावे तसेच स्वतःचेही रक्षण व्हावे, यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतात ‘मचाण’ झोपडी बांधत होता. आज आधुनिक युगात शेतकऱ्याने ही आपली वाटचाल बदलल्यामुळे आता मचाण लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पूर्वी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमालाच्या रक्षणासाठी शेतात मचाण बांधत असे. साधारणत: शेताच्या मध्यभागी उंचावर ती बांधण्यात येत होती. पिकाचे जंगली प्राण्यांपासून रक्षण व्हावे व स्वतःचेही रक्षण व्हावे, हा मचाण उंचावर बांधण्यामागचा हेतू असायचा. परंतु, कालांतराने अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीला जोडधंदा म्हणून अनेक योजना मिळत गेल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एखादी शेड बांधून कुक्कुटपालन, पशुपालन सुरु केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. ज्या शेतकऱ्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती आहे, अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये घराची निर्मिती केल्याचेही दिसून येते.

आता या मचाणकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसते आहे. पंधरा-वीस वर्ष अगोदर शेतकरी आपल्या शेतामध्ये ज्वारी हे मुख्य पीक म्हणून पेरणी करत होता. परंतु, जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात त्रास वाढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, मूग लावणे बंद केले. त्यामुळे शेतामध्ये उंचावर मचाण बांधण्यातसुद्धा कालांतराने खंड पडत गेला, असे शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले.

पूर्वी शेताचे रक्षण करण्यासाठी मोठे जमीनदार आपल्या शेतामध्ये रखवालदार ठेवत असत. आता मात्र कोणीही शेतकरी रखवालदार ठेवत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याने रखवालदार ठेवणे गरजेचे होते, आता मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतीला तारेचे, काटेरी अथवा विद्युत कुंपण योजनेंतर्गत झाल्याने रखवालदाराची गरजसुद्धा पडत नसल्याचे सांगितले जात आहे.

विज्ञानवादी युगात प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकरी तरी कसा मागे राहणार, त्यामुळे जुन्या रुढीला फाटा देत अशा मचाणांची संख्या लुप्त झाली आहे. भविष्यात येणाऱ्या पिढीला मचाणचे चित्र फक्त पुस्तकांमधूनच बघायला नक्की मिळणार...

170921\img-20210815-wa0502.jpg

फोटो