शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

भाजीपाला, फळे शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला ...

राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला शेतकरी व विक्रेत्यांनी उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीने जिल्ह्यात व तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंधांमुळे काढणीस आलेला भाजीपाला शेतातच सडू द्यावा लागणार आहे. यातच अत्यावश्यक सेवेत फळे, भाजीपाला, किराणा, धान्य असे अनेक अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटमध्ये नेण्यासाठी अडथळा येत आहे. वांगी, टमाटर, भाजीपाला, कांदा हा माल काढणीस आला आहे. नाशवंत असल्याने शेतातच सडू द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकरी शेतात जात असताना पोलिसांकडून दंडुका पडत आहे.

एकीकडे पीक शेतात सडत असल्याने शेतकरी चिंतेत, तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा दंडुका यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

राजुरा, वाडेगाव, काटी, चिंचरगव्हाण, उदापूर, हातुणा, पवनी (संक्राजी) या गावांत भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या कडक निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. शेतातील माल काढण्यासाठी मजूर, वाहनाची गरज असते. काढणीस आलेला माल तसाच सडू द्यावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कोट

यावर्षी शेतातील विहिरीची पाणीपातळी वाढल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा, वांगी, टोमॅटोची लागवड केली. आता सर्व माल विक्रीस आला आहे. पण, मार्केट बंद आहे. निर्बंधांमुळे हा माल विक्रीस कुठे न्यावा?

- पंकज काकडे, भाजीपाला उत्पादक, राजुरा बाजार

कोट २

आठवड्यात मार्केट जर उघडले नाही, तर सहा ट्रॅक्टर कांदा शेतातच सडेल. तो फेकावा लागेल. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

- जितेंद्र बहुरूपी, कांदा उत्पादक, राजुरा बाजार