शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

भाजीपाला, फळे शेतातच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:12 IST

राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला ...

राजुरा बाजार : लॉकडाऊनमुळे मार्केट बंद असल्याने भाजीपाला, फळ उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे फळे, भाजीपाला शेतकरी व विक्रेत्यांनी उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना महामारीने जिल्ह्यात व तालुक्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंधांमुळे काढणीस आलेला भाजीपाला शेतातच सडू द्यावा लागणार आहे. यातच अत्यावश्यक सेवेत फळे, भाजीपाला, किराणा, धान्य असे अनेक अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल मार्केटमध्ये नेण्यासाठी अडथळा येत आहे. वांगी, टमाटर, भाजीपाला, कांदा हा माल काढणीस आला आहे. नाशवंत असल्याने शेतातच सडू द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शेतकरी शेतात जात असताना पोलिसांकडून दंडुका पडत आहे.

एकीकडे पीक शेतात सडत असल्याने शेतकरी चिंतेत, तर दुसऱ्या बाजूने पोलिसांचा दंडुका यामुळे शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

राजुरा, वाडेगाव, काटी, चिंचरगव्हाण, उदापूर, हातुणा, पवनी (संक्राजी) या गावांत भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्या कडक निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची झाली आहे. शेतातील माल काढण्यासाठी मजूर, वाहनाची गरज असते. काढणीस आलेला माल तसाच सडू द्यावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कोट

यावर्षी शेतातील विहिरीची पाणीपातळी वाढल्याने रबी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा, वांगी, टोमॅटोची लागवड केली. आता सर्व माल विक्रीस आला आहे. पण, मार्केट बंद आहे. निर्बंधांमुळे हा माल विक्रीस कुठे न्यावा?

- पंकज काकडे, भाजीपाला उत्पादक, राजुरा बाजार

कोट २

आठवड्यात मार्केट जर उघडले नाही, तर सहा ट्रॅक्टर कांदा शेतातच सडेल. तो फेकावा लागेल. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

- जितेंद्र बहुरूपी, कांदा उत्पादक, राजुरा बाजार