शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

भांडी धुण्याच्याच जागी धुतला जातो भाजीपालाही

By admin | Updated: September 24, 2016 01:18 IST

रघुवीरमध्ये खाद्यान्न तयार करण्यापूर्वी भाजीपाला आदी वस्तू धुण्याची आणि भांडी धुण्याची जागा एकच

अमरावती : रघुवीरमध्ये खाद्यान्न तयार करण्यापूर्वी भाजीपाला आदी वस्तू धुण्याची आणि भांडी धुण्याची जागा एकच असल्यामुळे खाद्यान्नात गंभीर संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. रघुवीरच्या कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने लोकदरबारी मांडल्यानंतर एफडीए अधिकाऱ्यांनी श्याम चौकातील प्रतिष्ठानावर धाड टाकली. तेथील व्यवस्थेची आणि खाद्यान्न तयार केले जाणाऱ्या जागेची तपासणी केली. त्यांनादेखील रघुवीरचे कामकाज एफडीएच्या नियमावलीप्रमाणे चालत नसल्याचे लक्षात आले. खाद्यान्न निर्मितीसाठी राबणाऱ्या कामगारांची नियमानुसार ठराविक कालावधीत वैद्यकीय तपासणी न होणे, धूर हवेत सोडण्यासाठी चिमणीची उपाययोजना न करणे, खाद्यपदार्थ हाताळताना अत्यावश्यक असलेले हॅन्डग्लोव्हज् न वापरणे, बेसिनजवळच खाद्यान्न निर्मितीसाठचा कच्चा माल ठेवणे, आदी ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या नियमबाह्य बाबींची अन्न औषधी प्रशासनाने नोंद घेतली होती. विश्वासाने लहान मुलांनाही ज्या रघुवीरचा नाश्ता अमरावतीकर खाऊ घालायचे, तो तयार करताना इतकी अस्वच्छता, अनारोग्यता असते, याचे सामान्य ग्राहकांना भानही नसावे. या गंभीर प्रकरणानंतरही एफडीएने कठोर कारवाई अद्याप केलेली नाही. कचोरी, समोसा, सांबारवडी, पालकवडा आदी नाश्ता तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल , जसे - पालक, सांबार, बटाटे, मिरच्या त्याजागी धुतला जातो, जेथे काही वेळापूर्वीच खरकटी भांडी घासली गेलेली असतात. ग्राहकांनी नाश्ता केल्यानंतरच्या उष्ट्या आणि खरकट्या प्लेट, चमचे तसेच गंज त्याजागी धुतले जातात. त्याजागी असलेल्या अन्नाच्या कणातून जीवघेणे संक्रमण होण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. शुद्ध आणि दर्जेदार नाश्ताचा दावा केला जात असला तरी अशुद्ध आणि अळीयुक्त नाश्ता चढ्या भावात विकणाऱ्या ‘रघुवीर’ला एफडीएचे सहायक आयुक्त जयंत वाणे यांचे अभय का? (प्रतिनिधी) अहवालाची प्रतीक्षा ४एफडीए अधिकाऱ्यांनी १४ सप्टेंबर रोजी रघुवीर प्रतिष्ठानात धाड टाकून तेथील खाद्यान्नाच्या कच्चा मालाचे नमुने घेतले. ते नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले असून त्या अहवालावरून पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे. अमरावतीकरांना त्या अहवालाची प्रतीक्षा आहे. एफडीए निगरगट्टच ४रघुवीरची श्याम चौक, राजापेठ व गाडगेनगर रोडवर अशी तीन प्रतिष्ठाने आहेत. सातुर्णा परिसरात मिठाई बनविण्याचा कारखाना आहे. श्याम चौक स्थित प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्यावर एफडीएने सर्वच प्रतिष्ठानांवर छापे मारुन नमुने गोळा करणे व अन्न सुरक्षा मानदांच्या अंमलबजावणीची तपासणी करणे, कर्तव्याचा भाग होता. अजूनही ते पार पाडले गेले नाही.