शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.पदवीचे मूल्य शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST

अमरावती : केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.ला केराची टोपली दाखविली असून, या पदवीचे मूल्य शून्य करण्यात आले ...

अमरावती : केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल.ला केराची टोपली दाखविली असून, या पदवीचे मूल्य शून्य करण्यात आले आहे. असे असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काही महाविद्यालयांना सन २०२१-२०२२ या शैक्षणिक सत्रात एम.फिल. प्रवेशाची मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुल करण्याचा धंदा असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे.

गतवर्षी एम.फिल अभ्यासक्रम निकालाने विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला होता. आता तर सरकारने नवीन शैक्षणिक धोरणनात एम.फिल. पदवीचे मूल्य शून्य केले आहे. एम.फिल.पेक्षा पीएच.डी.ला प्राधान्य देण्यात आले आहे. तरीही काही महाविद्यालयांनी एम.फिल. प्रवेशाच्या नावे विद्यार्थ्यांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी नव्या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्याची शक्कल लढविली आहे. एम.फिल. पदवी प्रदान करून विद्यार्थी करतील तरी काय, असा सवाल शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांचा आहे. एम.फिल पदवीला नवीन शैक्षणिक धोरणात कवडीची किंमत ठेवण्यात आली नाही. तरीही काही महाविद्यालयांनी प्रवेशाचा अट्टाहास चालविल्याचे चित्र आहे. राज्यात केवळ नागपूर व अमरावती विद्यापीठातच एम.फिल सुरू असल्याची माहिती आहे.

-------------------

एम.फिल प्रवेशपूर्व परीक्षेसाठी तगादा

काही महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे एम.फिल. प्रवेशपूर्व एमपेट परीक्षा घेण्यासाठी तगादा लावल्याची माहिती आहे. वास्तविकता नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल. रद्द केल्याचे कटू सत्य आहे. केवळ प्रवेशातून शुल्क मिळविणे एवढाच हेतू महाविद्यालयांचा असल्याचे दिसून येते.

---------------------

पीएच.डी.मुळे एमफिलची गरज संपली

नवीन शैक्षणिक धोरणात पदवीनंतर पीएच.डी. करायची असल्यास चार वर्षांची पदवी आणि नोकरी करायची असल्यास त्यांना तीन वर्षांची पदवी, असा उल्लेख आहे. त्यामुळे पीए्.डी. असल्यास यापुढे एम.फिल.ची गरज असणार नाही, ही बाब स्पष्ट झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणात पदवी, पदव्युत्तर मध्येच एमफिलमधील संशोधन अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे.

-----------------

कोट

- संजय खडक्कार,

राज्यपाल नामित सदस्य परीक्षा मंडळ,