शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

प्रबोधनचे वैैभव कडू, राज गावंडे अव्वल

By admin | Updated: June 17, 2014 23:56 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण

निकाल ८२.५४ टक्के : ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घोषित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात दर्यापूर तालुक्यातील प्रबोधन हायस्कूलचे विद्यार्थी वैभव कडू व राज गावंडे यांनी ९८.२० टक्के गुण संपादन करून संयुक्तरीत्या जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त केले. तर अमरावतीच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा विद्यार्थी शुभम् करवा याने ९८ टक्के गुणांसह जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक पटकाविला. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत जिल्ह्याच्या १४ तालुक्यांमधूून सुमारे ४३ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ४३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून ३५ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याची एकूण निकालाची टक्केवारी ही ८२.५४ इतकी आहे. जिल्ह्यातील एकूण २०९ केंद्रावरून ही परीक्षा घेण्यात आली. ३ ते २७ मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदाही निकालाच्या एकूण टक्केवारीत मुलींचा वरचष्मा कायम आहे. बारावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती, हे विशेष.एकेकाळी सर्वाधिक विद्यार्थी इंग्रजी आणि गणित या विषयांत अनुत्तीर्ण होत असत. परंतु यंदा शिक्षण मंडळाने इंग्रजी आणि गणित या बागुलबुवाची भीती दूर करण्यासाठी अभ्यासक्रमात केलेला सुटसुटीत बदल विद्यार्थ्यांच्या चांगलाच पथ्यावर पडलाय. इंग्रजी विषयाचा सर्वाधिक ९९.०८ टक्के निकाल हा त्याची ग्वाही देतोय. शहरासह ग्रामीण भागातील ५०च्या जवळपास शाळांनी शभंर टक्के यश मिळविले आहे. गेल्या वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल घोषित झाला होता. त्या तुलनेत यंदा मुलांना निकालाची प्रचंड प्रतीक्षा करावी लागली. धडधड वाढविणाऱ्या उत्सुकतेनंतर बऱ्याच विलंबाने दहावीचा निकाल घोषित झाला असला तरी मुलांमध्ये उत्साह दिसून आला. अकरावीच्या केंद्रीय पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी गर्दी होईल. (प्रतिनिधी)