शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

लसच उपाय, लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:06 IST

अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ...

अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. साहजिकच या लसीकरणानंतर जिल्ह्याचा मृत्यूदर कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा मृत्यूदर १.४६ च्या दरम्यान आहे.

जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. काही दिवसांनंतर सर्वच १४ तालुक्यांतील १२० केंद्रांवर लसीकरण होत आहे. लसींच्या पुरवठ्यावर कमी-अधिक प्रमाणात ही केंद्रे सुरू राहतात. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचा पुरवठा होत आहे. यामध्ये कोविशिल्ड लसींचे २,५३,२८० व कोव्हॅक्सिनचे ५९,९२०, असे एकूण ३,१३,२०० डोस प्राप्त झाले आहेत.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर्सचे २९,७४८, फ्रंटलाइन वर्कर्सचे २९,७३७, १८ ते ४४ वयोगटात १,०७६, ४५ ते ५९ वयोगटात ९८,२२६, व ६० वर्षांवरील १,४४,०२० व्यक्ती, असे एकूण ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण रविवारपर्यंत पूर्ण झाले आहे. ही एकूण उद्दिष्टाच्या ४२ टक्केवारी आहे. मात्र, लसींचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने सोमवारी बहुतेक केंद्र बंद असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागले.

बॉक्स

पहिल्या डोसनंतर तीन टक्के पॉझिटिव्ह

जिल्ह्याची लोकसंख्या ही ३० लाखांच्या घरात आहे. त्यातुलनेत सध्या झालेले ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण हे १३ टक्क्यांदरम्यान आहे.

लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजेच पाच ते सहा टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांनादेखील सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तीचे प्रमाण नगण्य म्हणजे ०.५० दरम्यान असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका कमी

जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची उदाहरणे नगण्य आहेत. कोरोना प्रतिबंधक लस असल्याने नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्ण गंभीर झालेला नसल्याचे दिसून आले आहे व लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र सर्वांनी लस घेणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्हचे प्रमाण नगण्य

जिल्ह्यात लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. विशेष म्हणजे हेल्थलाइन वर्कर जे सातत्याने कोरोना पॉझिटिव्हच्या संर्पकात राहतात त्यांना काहीअंशी शक्यता जास्त असते, जिल्हा शल्यचिकित्सकांनीदेखील लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

बॉक्स

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरण व दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित आहे व प्रत्येकाने ती घेतली पाहिजे.

डॉ. विशाल काळे

पाॅइंटर

दोन्ही डोस किती जणांनी घेतले : ५३,०२९

एकूण रुग्ण : ६७,५०१

कोरोनाने मृत्यू : १११८

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.