शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

लसच उपाय, लसीकरणानंतर जिल्ह्यात एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:06 IST

अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ...

अमरावती : जिल्ह्यात पाच टप्प्यांत नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सद्य:स्थितीत तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांचे लसीकरण झाले आहे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. साहजिकच या लसीकरणानंतर जिल्ह्याचा मृत्यूदर कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याचा मृत्यूदर १.४६ च्या दरम्यान आहे.

जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. काही दिवसांनंतर सर्वच १४ तालुक्यांतील १२० केंद्रांवर लसीकरण होत आहे. लसींच्या पुरवठ्यावर कमी-अधिक प्रमाणात ही केंद्रे सुरू राहतात. जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींचा पुरवठा होत आहे. यामध्ये कोविशिल्ड लसींचे २,५३,२८० व कोव्हॅक्सिनचे ५९,९२०, असे एकूण ३,१३,२०० डोस प्राप्त झाले आहेत.

यामध्ये हेल्थ केअर वर्कर्सचे २९,७४८, फ्रंटलाइन वर्कर्सचे २९,७३७, १८ ते ४४ वयोगटात १,०७६, ४५ ते ५९ वयोगटात ९८,२२६, व ६० वर्षांवरील १,४४,०२० व्यक्ती, असे एकूण ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण रविवारपर्यंत पूर्ण झाले आहे. ही एकूण उद्दिष्टाच्या ४२ टक्केवारी आहे. मात्र, लसींचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने सोमवारी बहुतेक केंद्र बंद असल्याने नागरिकांना केंद्रावरून माघारी परतावे लागले.

बॉक्स

पहिल्या डोसनंतर तीन टक्के पॉझिटिव्ह

जिल्ह्याची लोकसंख्या ही ३० लाखांच्या घरात आहे. त्यातुलनेत सध्या झालेले ३,०२,८०५ नागरिकांचे लसीकरण हे १३ टक्क्यांदरम्यान आहे.

लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण अत्यल्प म्हणजेच पाच ते सहा टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांनादेखील सौम्य लक्षणे आढळून आली आहेत.

कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर संसर्ग झालेल्या व्यक्तीचे प्रमाण नगण्य म्हणजे ०.५० दरम्यान असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

बॉक्स

लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका कमी

जिल्ह्यात लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याची उदाहरणे नगण्य आहेत. कोरोना प्रतिबंधक लस असल्याने नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी रुग्ण गंभीर झालेला नसल्याचे दिसून आले आहे व लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास मृत्यूचा धोका नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र सर्वांनी लस घेणे महत्त्वाचे आहे.

बॉक्स

दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्हचे प्रमाण नगण्य

जिल्ह्यात लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या नागरिकांना कोरोना संसर्ग झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. विशेष म्हणजे हेल्थलाइन वर्कर जे सातत्याने कोरोना पॉझिटिव्हच्या संर्पकात राहतात त्यांना काहीअंशी शक्यता जास्त असते, जिल्हा शल्यचिकित्सकांनीदेखील लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.

बॉक्स

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरण व दोन्ही डोस घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना लस ही पूर्णत: सुरक्षित आहे व प्रत्येकाने ती घेतली पाहिजे.

डॉ. विशाल काळे

पाॅइंटर

दोन्ही डोस किती जणांनी घेतले : ५३,०२९

एकूण रुग्ण : ६७,५०१

कोरोनाने मृत्यू : १११८

वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.