शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मास्क वापराने फ्ल्यू, बॅक्टेरिया, अस्थमा अन्‌ बुरशीजन्य आजार राेखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:30 IST

थंडी आली तरी कोरोनाचे संक्रमण कमीच, श्वसनाचे रोग टाळता आले अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा थैमान ऑक्टोबरपासून कमी ...

थंडी आली तरी कोरोनाचे संक्रमण कमीच, श्वसनाचे रोग टाळता आले

अमरावती : मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा थैमान ऑक्टोबरपासून कमी झाला. मात्र, शासन, प्रशासनाने नागरिकांना मास्क वापराची सक्ती केल्यामुळे गत दोन महिन्यात फ्ल्यू, बॅक्टेरीया, अस्थमा अन्‌ बुरशीजन्य आजार राेखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. विशेषत: श्वसनाचे आजार टाळता आले, असे मत ज्येष्ठ मेडिसीनतज्ज्ञ अजय डफळे यांनी व्यक्त केले.

कोविड १९ पासून बचावासाठी शासनाकडून नानाविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मार्च ते सप्टेंबर हे सात महिने कोरोना संसर्ग रोखणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरले. परंतु, त्यानंतर मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीवर भर देण्यात आला. परिणामी ऑक्टोबरपासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात मास्कचा वापर न करणारे नागरिक, वाहनचालकांना ३०० रुपये दंड आकारण्याची धडक कारवाई केली. त्यामुळे अमरावतीकरांना मास्क वापराची सवय झाली आहे. मास्क वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढीस लागल्याने साथरोगाचा फैलाव टाळता आला. ‘नाे मास्क, नो एन्ट्री’ असे शासकीय, प्रशासकीय कार्यालयांत फलक लागल्यानेसुद्धा मास्कचा वापर वाढला आहे.

----------------------

गतवर्षी आणि यावर्षीच्या हिवाळ्याच्या सुरुवातीची आकडेवारी

मागील वर्षीची ओपीडी- २९०८१

यावर्षीची ओपीडी- १८५४२

----------------------------

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळा

सप्टेंबरमध्ये कोरोनाची वाढती आकडेवारी बघता ऑक्टोबरमध्ये कोरानाचा स्फोट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली. मात्र, शासन, प्रशासनाने मास्कचा वापर अनिवार्य केल्याने साथीच्या आजाराला आळा बसला. सर्दी, पडसा, खोकल्यासह सारीच्या अनुषंगाने उद्‌भवणारे आजार रोखण्यात आरोग्य यंत्रणा यशस्वी ठरली. स्वाईन फ्ल्यू, बॅक्टेरिया व्हायरल फैलाव थांबल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.

-------------------

श्वसनाचे रोग थांबले

मास्क वापराने कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी थंडीत श्वसनाचे होणारे रोग थांबले आहे. यापूर्वी ज्यांना कोरोनाची लागण झाली अशांना बुरशीजन्य होणारे आजार राेखता आले आहे. विशेषत: सर्दी, खोकला, ताप यावर नियंत्रण मिळवता आले. थंडी सुरू होताच श्वसनाचे रोग असलेली रुग्णांची संख्यादेखील रोडावली आहे.

-----------------

कोट

मास्क वापर अनिवार्य करण्यासाठी यंत्रणेला काही कठोर उपाययोजना कराव्या लागल्या आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून कोरोना संसर्गात र्हास झाला आहे. थंडी सुरू झाली असली तरी श्वसन आजाराचे रुग्ण फार कमी आहे. सर्दी, पडसा, ताप यासह स्वाईन फ्ल्यू, बॅक्टेरिया व्हायरल रोखता आले आहे. नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा.

- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती