शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

उर्दू शिक्षकांची नियुक्ती वादग्रस्त

By admin | Updated: April 28, 2015 00:07 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना ..

जिल्हा परिषद : सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील शाळेवर अन्याय केल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य निशांत जाधव यांनी केला आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी आरोग्य विभागाच्या मुद्यावर वादळी चर्चा झाली.जिल्हा परिषद शिक्षण विभागाला महापालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी १७ उर्दू माध्यमांचे शिक्षक हस्तांतरीत केले होते. मात्र या शिक्षकांना शाळेवर नियुक्ती देतांना मोर्शी, वरूड, अचलपूर या तीन तालुक्यात सर्वाधिक नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नांदगाव खंडेश्र्वर येथील उर्दू शाळेत ३ शिक्षक कमी असल्याने या शाळेला दोन वर्षापासून शिक्षक देण्याची मागणी सदस्य निशांत जाधव यांनी केली होती. याची शिक्षण विभागाने दखल न घेता येथे केवळ एकाच शिक्षकाला पदस्थापना शिक्षण विभागाने दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना सभागृहात जाब विचारला. अशातच सदस्य अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे , बापूराव गायकवाड यांनी या मुद्दावर आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहाचे वातावरण तापले. अखेर सदस्यांचा आक्रमकपणा पाहूण याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीष कराळे यांनी दिले. यासोबतच शिकस्त वर्ग खोल्याचा मुद्दा पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना उत्तर विचारत यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा शाखा अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुद्यावरही वादळी चर्चा करण्यात आली. सभेच्या विषय सूचीवरील जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागातील हातपंप, विद्युत पंप दुरूस्तीचे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. दरम्यान यावर वादळी चर्चा होऊन अखेर हा ठराव मंजूर करण्यात आला. आरोग्य सर्वसाधारण क्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामे अंतर्गत सन २०१०-११ लेखाशिर्ष अंतर्गत कामांनाही सभागृहाने मंजुरी दिली आहे. याशिवाय तीन वर्षावरिल प्रलंबित प्रवास भत्ते देयकास व मौजे रेवसा येथील पुनर्वसित गावात पाणी पुरवठा योजनेच्या कामाची १ टक्का बयाणा रक्कम सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची प्रस्तावास सभागृहाने मंजुरी दिली.सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्ष तथा सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रविंद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, उमेश केने, विक्रम ठाकरे, निशांत जाधव, मनोहर सुने, ममता भांबुरकर, पं.स. सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, सिईओ अनिल भंडारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, जे. एन आभाळे, कैलास घोडके, खाते प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)