शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू शिक्षकांची नियुक्ती वादग्रस्त

By admin | Updated: April 28, 2015 00:07 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना ..

जिल्हा परिषद : सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील शाळेवर अन्याय केल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य निशांत जाधव यांनी केला आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी आरोग्य विभागाच्या मुद्यावर वादळी चर्चा झाली.जिल्हा परिषद शिक्षण विभागाला महापालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी १७ उर्दू माध्यमांचे शिक्षक हस्तांतरीत केले होते. मात्र या शिक्षकांना शाळेवर नियुक्ती देतांना मोर्शी, वरूड, अचलपूर या तीन तालुक्यात सर्वाधिक नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नांदगाव खंडेश्र्वर येथील उर्दू शाळेत ३ शिक्षक कमी असल्याने या शाळेला दोन वर्षापासून शिक्षक देण्याची मागणी सदस्य निशांत जाधव यांनी केली होती. याची शिक्षण विभागाने दखल न घेता येथे केवळ एकाच शिक्षकाला पदस्थापना शिक्षण विभागाने दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना सभागृहात जाब विचारला. अशातच सदस्य अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे , बापूराव गायकवाड यांनी या मुद्दावर आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहाचे वातावरण तापले. अखेर सदस्यांचा आक्रमकपणा पाहूण याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीष कराळे यांनी दिले. यासोबतच शिकस्त वर्ग खोल्याचा मुद्दा पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना उत्तर विचारत यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा शाखा अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुद्यावरही वादळी चर्चा करण्यात आली. सभेच्या विषय सूचीवरील जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागातील हातपंप, विद्युत पंप दुरूस्तीचे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. दरम्यान यावर वादळी चर्चा होऊन अखेर हा ठराव मंजूर करण्यात आला. आरोग्य सर्वसाधारण क्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामे अंतर्गत सन २०१०-११ लेखाशिर्ष अंतर्गत कामांनाही सभागृहाने मंजुरी दिली आहे. याशिवाय तीन वर्षावरिल प्रलंबित प्रवास भत्ते देयकास व मौजे रेवसा येथील पुनर्वसित गावात पाणी पुरवठा योजनेच्या कामाची १ टक्का बयाणा रक्कम सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची प्रस्तावास सभागृहाने मंजुरी दिली.सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्ष तथा सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रविंद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, उमेश केने, विक्रम ठाकरे, निशांत जाधव, मनोहर सुने, ममता भांबुरकर, पं.स. सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, सिईओ अनिल भंडारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, जे. एन आभाळे, कैलास घोडके, खाते प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)