शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

उर्दू शिक्षकांची नियुक्ती वादग्रस्त

By admin | Updated: April 28, 2015 00:07 IST

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना ..

जिल्हा परिषद : सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेअमरावती : जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिकेकडून हस्तांतरीत झालेल्या १७ उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या पदस्थापना करतांना नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील शाळेवर अन्याय केल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य निशांत जाधव यांनी केला आहे. या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. यावेळी आरोग्य विभागाच्या मुद्यावर वादळी चर्चा झाली.जिल्हा परिषद शिक्षण विभागाला महापालिकेने मागील दोन महिन्यांपूर्वी १७ उर्दू माध्यमांचे शिक्षक हस्तांतरीत केले होते. मात्र या शिक्षकांना शाळेवर नियुक्ती देतांना मोर्शी, वरूड, अचलपूर या तीन तालुक्यात सर्वाधिक नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नांदगाव खंडेश्र्वर येथील उर्दू शाळेत ३ शिक्षक कमी असल्याने या शाळेला दोन वर्षापासून शिक्षक देण्याची मागणी सदस्य निशांत जाधव यांनी केली होती. याची शिक्षण विभागाने दखल न घेता येथे केवळ एकाच शिक्षकाला पदस्थापना शिक्षण विभागाने दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांना सभागृहात जाब विचारला. अशातच सदस्य अभिजित ढेपे, रवींद्र मुंदे , बापूराव गायकवाड यांनी या मुद्दावर आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहाचे वातावरण तापले. अखेर सदस्यांचा आक्रमकपणा पाहूण याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन अध्यक्ष सतीश उईके, सभापती गिरीष कराळे यांनी दिले. यासोबतच शिकस्त वर्ग खोल्याचा मुद्दा पंचायत समितीचे सभापती गणेश राजनकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना उत्तर विचारत यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अन्यथा शाखा अभियंत्यास काळे फासण्याचा इशारा दिला आहे. यावेळी आरोग्य विभागाच्या प्रशासकीय कामकाजाच्या मुद्यावरही वादळी चर्चा करण्यात आली. सभेच्या विषय सूचीवरील जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागातील हातपंप, विद्युत पंप दुरूस्तीचे दरात वाढ करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला. दरम्यान यावर वादळी चर्चा होऊन अखेर हा ठराव मंजूर करण्यात आला. आरोग्य सर्वसाधारण क्षेत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकामे अंतर्गत सन २०१०-११ लेखाशिर्ष अंतर्गत कामांनाही सभागृहाने मंजुरी दिली आहे. याशिवाय तीन वर्षावरिल प्रलंबित प्रवास भत्ते देयकास व मौजे रेवसा येथील पुनर्वसित गावात पाणी पुरवठा योजनेच्या कामाची १ टक्का बयाणा रक्कम सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्याची प्रस्तावास सभागृहाने मंजुरी दिली.सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, माजी अध्यक्ष तथा सदस्य बबलू देशमुख, सुरेखा ठाकरे, रविंद्र मुंदे, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, उमेश केने, विक्रम ठाकरे, निशांत जाधव, मनोहर सुने, ममता भांबुरकर, पं.स. सभापती विनोद टेकाडे, आशिष धर्माळे, सिईओ अनिल भंडारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी के.एम अहमद, जे. एन आभाळे, कैलास घोडके, खाते प्रमुखांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)