शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उंदराचा दगा, हत्तीवरच भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:35 IST

मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

ठळक मुद्दे२५ जूननंतर मान्सूनचे आगमन : मृगात रखडलेल्या पेरण्या आर्द्रात होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. मृगाच्या उंदराने दगा दिल्याने त्यानंतरचा आर्द्राच्या हत्तीवरच शेतकऱ्यांची मदार आहे.‘वायू’ चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आता सक्रिय झाला आहे. एक - दोन दिवसांत कोकण, मुंबईत दाखल होणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. यंदा केरळमध्येच एक आठवडा उशिरा मान्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रातील ‘वायू’ या चक्रीवादळाने मान्सूनची वाटचाल मंदावली होती. आता या चक्रीवादळाचा जोर पश्चिम किनारपट्टीवरून ओसरल्याने मान्सूनला सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.हवामानतज्ज्ञ व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे सहा. प्रा. अनिल बंड यांच्या महितीनुसार येत्या तीन दिवसांत मान्सून गोवा, मुंबई भागात पोहचू शकतो. हा मान्सून मुंबईला पोहोचला तरी विदर्भात पोहोचेलच याची सध्या तरी खात्री नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाºयामुळे विदर्भात २२ जूननंतर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. २५ जूनपर्यंत मध्य भारतात चांगल्या पावसाची, तर काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, झपाट्याने वातावरणात बदल होत असल्याने मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा मंदावली असल्याने बंगालच्या उपसागरातील शाखेने जोर धरला आहे. त्यामुळे विदर्भात बहुधा आंध्रप्रदेशच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याचे बंड यांनी सांगितले.१९ दिवसांत ८६ मिमी पावसाची तूटजिल्ह्यात १ ते १९ जून या १९ दिवसांत ९२.५ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ८.८ मिमी पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. गतवर्षी याच दिवसांत ६०.०८ मिमी नोंद झाली होती. हा पाऊस पूर्वमौसमी होता. दोन दशकात यंदा प्रथमच प्री-मान्सूनचा पाऊस नाही. त्यामुळे यंदा धूळवाफ पेरण्या झाल्याच नाहीत. आणखी उशीर झाल्यास ६० दिवसांच्या अवधीतील मूग, उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे.पेरणीपूर्व मशागतीला सुरूवातरोहिणीत होणाºया पूर्वमौसमी पावसानंतर जिल्ह्यात साधारणपणे खरीपपूर्व मशागतीला वेग येतो. यंदा पूर्वमौसमी पाऊस झालाच नाही. रोहिणीसंग मृगही कोरडा गेला. त्यामुळे शेत मशागतीची कामे रखडली होती. मात्र, पुढच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार, या वार्तेनेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बियाणे बाजार सद्यस्थितीत थंडावलेला आहे. पावसाच्या आगमनानंतर येथील वर्दळ वाढणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी