शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

उंदराचा दगा, हत्तीवरच भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 01:35 IST

मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे.

ठळक मुद्दे२५ जूननंतर मान्सूनचे आगमन : मृगात रखडलेल्या पेरण्या आर्द्रात होणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मान्सूनच्या वाटचालीसाठी वातावरण अनुकूल असल्याने यंदा २२ जूननंतर हलका ते मध्यम पावसाची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. पेरणीसाठी किमान ८० मिमी पावसाची आवश्यकता असल्याने यंदा खरीप पेरणीही २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. मृगाच्या उंदराने दगा दिल्याने त्यानंतरचा आर्द्राच्या हत्तीवरच शेतकऱ्यांची मदार आहे.‘वायू’ चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून आता सक्रिय झाला आहे. एक - दोन दिवसांत कोकण, मुंबईत दाखल होणार असल्याची हवामान विभागाची माहिती आहे. यंदा केरळमध्येच एक आठवडा उशिरा मान्सून दाखल झाला. त्यानंतर अरबी समुद्रातील ‘वायू’ या चक्रीवादळाने मान्सूनची वाटचाल मंदावली होती. आता या चक्रीवादळाचा जोर पश्चिम किनारपट्टीवरून ओसरल्याने मान्सूनला सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.हवामानतज्ज्ञ व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या हवामानशास्त्र विभागाचे सहा. प्रा. अनिल बंड यांच्या महितीनुसार येत्या तीन दिवसांत मान्सून गोवा, मुंबई भागात पोहचू शकतो. हा मान्सून मुंबईला पोहोचला तरी विदर्भात पोहोचेलच याची सध्या तरी खात्री नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या चक्राकार वाºयामुळे विदर्भात २२ जूननंतर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे. २५ जूनपर्यंत मध्य भारतात चांगल्या पावसाची, तर काही ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, झपाट्याने वातावरणात बदल होत असल्याने मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा मंदावली असल्याने बंगालच्या उपसागरातील शाखेने जोर धरला आहे. त्यामुळे विदर्भात बहुधा आंध्रप्रदेशच्या दिशेने येण्याची शक्यता असल्याचे बंड यांनी सांगितले.१९ दिवसांत ८६ मिमी पावसाची तूटजिल्ह्यात १ ते १९ जून या १९ दिवसांत ९२.५ मिमी सरासरी पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ८.८ मिमी पाऊस जिल्ह्यात झालेला आहे. गतवर्षी याच दिवसांत ६०.०८ मिमी नोंद झाली होती. हा पाऊस पूर्वमौसमी होता. दोन दशकात यंदा प्रथमच प्री-मान्सूनचा पाऊस नाही. त्यामुळे यंदा धूळवाफ पेरण्या झाल्याच नाहीत. आणखी उशीर झाल्यास ६० दिवसांच्या अवधीतील मूग, उडदाचे पीक बाद होण्याची शक्यता आहे.पेरणीपूर्व मशागतीला सुरूवातरोहिणीत होणाºया पूर्वमौसमी पावसानंतर जिल्ह्यात साधारणपणे खरीपपूर्व मशागतीला वेग येतो. यंदा पूर्वमौसमी पाऊस झालाच नाही. रोहिणीसंग मृगही कोरडा गेला. त्यामुळे शेत मशागतीची कामे रखडली होती. मात्र, पुढच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार, या वार्तेनेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बियाणे बाजार सद्यस्थितीत थंडावलेला आहे. पावसाच्या आगमनानंतर येथील वर्दळ वाढणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी