शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

फोटो पी २३ अंजनगाव बारी पान ३ ची िलड अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी ...

फोटो पी २३ अंजनगाव बारी

पान ३ ची िलड

अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख रब्बी पिके जमिनीवर झोपल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तसेच पालेभाज्या अवकाळी पावसामुळे सडल्या. वादळामुळे संत्रा, मोसंबी, निंबू इ. झाडे कोसळून पडली आहेत.

अंजनगाव बारी परिसरात गारपीट झाल्याने कांदा, गहू ही पिके जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आहे. या वर्षी ६० टक्के गहू शेतकऱ्यांच्या घरी आला. मात्र, ४० टक्के गहू अद्यापही शेतात पडून आहे. पावसाचे पाणी शिरून गव्हाच्या पेंड्या सडत आहे. पपई, आंबा हे पिके वादळाने झाडासह कोसळून पडले आहे. शेतकरी उत्पन्न वाढविण्यासाठी फळपिकांकडे वळले असताना आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, निंबू, डाळिंब ही फळे मातीमोल झाल्याने मुद्दल निघेल, याचीही शाश्वती नाही. परिसरात १० ते १५ गावांतील पार्डी(देवी), अडगांव बु., मांजरी म्हसला, उतखेड, टिमटाळा, मालखेड (रेल्वे), आमला (विश्वेश्वर), मांजरखेड (कसबा), बासलापूर येथेही वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

३०० विटभट्ट्यांचे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात ३०० विटभट्ट्या कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदारांचा एक ते दिड लाख एवढा माल निरुपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मजुरांची घरावरील टिनाची छपरे उडाल्याने संपूर्ण मजूर गावात निघून गेल्याने कारखाने ओसाड पडले आहे.

बॉक्स

पोर्टलवर नोंदवा माहिती

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव व शेत सर्वे नंबर गावातील तलाठी किंवा कृषी सहायक यांच्या कडे द्यावे, असे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ही माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.