शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:13 IST

फोटो पी २३ अंजनगाव बारी पान ३ ची िलड अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी ...

फोटो पी २३ अंजनगाव बारी

पान ३ ची िलड

अंजनगाव बारी : सततच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे गहू, कांदा ही प्रमुख रब्बी पिके जमिनीवर झोपल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तसेच पालेभाज्या अवकाळी पावसामुळे सडल्या. वादळामुळे संत्रा, मोसंबी, निंबू इ. झाडे कोसळून पडली आहेत.

अंजनगाव बारी परिसरात गारपीट झाल्याने कांदा, गहू ही पिके जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आहे. या वर्षी ६० टक्के गहू शेतकऱ्यांच्या घरी आला. मात्र, ४० टक्के गहू अद्यापही शेतात पडून आहे. पावसाचे पाणी शिरून गव्हाच्या पेंड्या सडत आहे. पपई, आंबा हे पिके वादळाने झाडासह कोसळून पडले आहे. शेतकरी उत्पन्न वाढविण्यासाठी फळपिकांकडे वळले असताना आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, पेरू, निंबू, डाळिंब ही फळे मातीमोल झाल्याने मुद्दल निघेल, याचीही शाश्वती नाही. परिसरात १० ते १५ गावांतील पार्डी(देवी), अडगांव बु., मांजरी म्हसला, उतखेड, टिमटाळा, मालखेड (रेल्वे), आमला (विश्वेश्वर), मांजरखेड (कसबा), बासलापूर येथेही वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे.

३०० विटभट्ट्यांचे नुकसान

अंजनगाव बारी परिसरात ३०० विटभट्ट्या कारखानदार आहेत. अवकाळी पावसामुळे तयार झालेला ७० ते ८० लाखांचा कच्चा माल वाया गेला आहे. लावलेल्या भट्टीतील प्रत्येक कारखानदारांचा एक ते दिड लाख एवढा माल निरुपयोगी झाला आहे. हा माल झाकलेला असतानाही उपलब्ध सामग्री फाटल्याने व उडाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मजुरांची घरावरील टिनाची छपरे उडाल्याने संपूर्ण मजूर गावात निघून गेल्याने कारखाने ओसाड पडले आहे.

बॉक्स

पोर्टलवर नोंदवा माहिती

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव व शेत सर्वे नंबर गावातील तलाठी किंवा कृषी सहायक यांच्या कडे द्यावे, असे आदेश कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत. नुुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ही माहिती विमा कंपनीच्या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.