शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कालबाह्य अग्निशामक यंत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:38 IST

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय (जिल्हा परिषद) तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अग्निशामक यंत्रांची मुदत संपून जवळपास १० वर्षे झाली आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. परिणामी जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात आली आहे.

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय (जिल्हा परिषद) तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अग्निशामक यंत्रांची मुदत संपून जवळपास १० वर्षे झाली आहेत. मात्र, याकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. परिणामी जिल्हा परिषदेची सुरक्षा धोक्यात आली आहे.सध्या राज्यभर तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. यातच शार्टसर्किटमुळे आगीच्या घटना सर्वत्र घडत आहेत. दररोजच्या घटनांनी खळबळ उडत आहे. आग लागल्याच्या अनेक घटना समोर येत असताना, जिल्हा परिषद प्रशासन आगीसारख्या घटनांपासून सुरक्षिततेच्या उपाययोजनांपासून अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे, पदाधिकारी व अधिकारी या अग्निशामक यंत्रांकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभाग, भांडार विभाग, सिंचन विभाग व अन्य विभागात अग्निशामक यंत्रे सन २०८ मध्ये बसविली होती. त्यानंतर या यंत्राकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचे वास्तव आहे. मागील १० ते ११ वर्षांपासून सुरक्षिततेसाठी बसविल्या या उपाययोजनांकडे लक्ष नसल्याने जिल्हा परिषदेतील वरील तिन्ही विभागातील अग्निशामक यंत्रे शोभेची वस्तू म्हणून राहिले आहेत. विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत १४ पंचायत समिती, ८३९ ग्रामपंचायती येतात.

जिल्हा परिषदेची सुरक्षा वाऱ्यावरअनेक महत्त्वाचे शासकीय रेकॉर्ड जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात जतन केले जातात. या दस्ताऐवजाची सुरक्षितता राखण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. आगीसारख्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने सन २००८ मध्ये अग्निशामक यंत्रे निवडक विभागात बसविली. तेव्हापासून ही यंत्रणा कालबाह्य झाली आहे. अग्निशामक यंत्रांमधील पावडरची मुदत संपून दहा वर्षांहून अधिक कालावधी निघून गेला. ही बाब अधिकाºयांच्या लक्षात न येण्याचे कारण समजू शकले नाही.प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभावशासकीय व निमशासकीय कार्यालयांत बसविण्यात आलेली अग्निशामक यंत्रे आग लागल्यावर कशी वापरायची, याबाबतचे प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. याबाबत काहीच माहिती नसल्याचे अनेक कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’कडे सांगितले.अग्निशामक यंत्रांतील पावडर बदलणे गरजेचेअग्निशमन यंत्रांमधील पावडरची मुदत एक वर्ष असते. वर्ष पूर्ण होण्याआधी त्यातील पावडर संबंधित कार्यालयाने बदलण्याची कार्यवाही करावी. संबंधित कंपनीला माध्यम बनविणे गरजेचे असताना तेही करण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला मुहूर्त मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.विविध आस्थापनांच्या अग्निशामक यंत्रांची मुदत संपली आहे. ही कालबाह्य यंत्रे त्वरित हटवून नवीन यंत्रे बसविण्यासंदर्र्भात तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील.- कै लास घोडकेउपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन