शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीने लादली ग्राहकांवर अवाजवी बिले

By admin | Updated: December 3, 2015 00:23 IST

विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले ...

अन्याय : वाढीव बिले भरण्यास नागरिकांचा नकार, वीज कंपनीप्रती रोषअंजनगाव बारी : विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले जात असल्याने ग्राहक विद्युत कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर बिल आकारणी रिडींगप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु अंदाजे बिल आकारणी केली जाते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण भूर्दंड सोसावा लागतो. विद्युत वितरण कंपनीने रिडिंग प्रमाणे बिल द्यायला पाहिजे. परंतु यामध्ये इंधन खर्च ,मीटर भाडे बिलात आकारले जाते. परंतु ग्राहकांकडून आधीच मिटरचे पैसे कंपनी घेते. त्यानंतर मीटर भाडे का लावल्या जाते, असा प्रश्न ग्राहकांनी केला आहे. अंजनगाव बारी परिसरातील ६०० ग्राहकांना २५ हजार रुपयांचे बिल १७० ग्राहकांन, ५० हजार रुपयांचे बिल १ हजार ९९१ ग्राहकांना, २० हजार रुपयांचे बिल १५०० ग्राहकांना, १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचे बील लादून आले आहे. जवळपास ३ हजार ग्राहकांना ६०० ते ७०० पर्यंतचे बिल आले आहे. तर ४० ग्राहकांना ७५ हजार ते १ लाखा पर्यंतच्या बिलाची आकारणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना लुटण्याचा सापाटा लावल्याने विद्युत कंपनीच्या विरोधी ग्राहकमंचामध्ये केस दाखल करणार असून अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील ग्राहक आक्रमक झाले आहेत. विद्युत बिलांमध्ये दुरुस्ती केली गेली तरच भरणार अन्यथा ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याचा ईशारा ग्राहकांनी दिला आहे. वीज वितरण कंपनीने चुकीचे बिल न देता रिडींगप्रमाणे बिल देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. येथील हनुमान मंदिरापासून विद्युत तारा लोंबकळल्यामुळे अपघात होऊ शकतो. अंजनगाव बारी हनुमान मंदिराच्या पोलपासून डॉक्टर हटवार यांचे घरापर्यंत पोलवरील विद्युत तारा ७ फूटांवर खाली आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या बैल बंड्या व अन्य वाहनांना अपघात होऊ शकतो. विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दोन वेळा सूचना देऊनही पोलवरील लोंबकळलेले तार ओढले नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तब्बल तीन महिने उलटूनही दुरुस्ती केली गेली नाही. वीज वितरण कंपनीशी संबंधित अनेक तक्रारींचे निवारण झाले नसल्याने तारा जमिनीपासून सात फुटांवर आल्या आहेत. ग्राहकांकडून लाखो रूपयांची वीज बिल वसुली करणाऱ्या विद्युत कंपनीने आधी तक्रारींचा निपटारा करावा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.