शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

वीज कंपनीने लादली ग्राहकांवर अवाजवी बिले

By admin | Updated: December 3, 2015 00:23 IST

विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले ...

अन्याय : वाढीव बिले भरण्यास नागरिकांचा नकार, वीज कंपनीप्रती रोषअंजनगाव बारी : विद्युत वितरण कंपनीने अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील मिटरचे रिडिंग घेतल्यानंतरही दरमहा ग्राहकांना २५ ते ५० हजार रुपयांचे बिल दिले जात असल्याने ग्राहक विद्युत कंपनीमुळे त्रस्त झाले आहेत. मीटरचे रिडिंग घेतल्यानंतर बिल आकारणी रिडींगप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु अंदाजे बिल आकारणी केली जाते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण भूर्दंड सोसावा लागतो. विद्युत वितरण कंपनीने रिडिंग प्रमाणे बिल द्यायला पाहिजे. परंतु यामध्ये इंधन खर्च ,मीटर भाडे बिलात आकारले जाते. परंतु ग्राहकांकडून आधीच मिटरचे पैसे कंपनी घेते. त्यानंतर मीटर भाडे का लावल्या जाते, असा प्रश्न ग्राहकांनी केला आहे. अंजनगाव बारी परिसरातील ६०० ग्राहकांना २५ हजार रुपयांचे बिल १७० ग्राहकांन, ५० हजार रुपयांचे बिल १ हजार ९९१ ग्राहकांना, २० हजार रुपयांचे बिल १५०० ग्राहकांना, १ हजार ते १ हजार ५०० रुपयांचे बील लादून आले आहे. जवळपास ३ हजार ग्राहकांना ६०० ते ७०० पर्यंतचे बिल आले आहे. तर ४० ग्राहकांना ७५ हजार ते १ लाखा पर्यंतच्या बिलाची आकारणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना लुटण्याचा सापाटा लावल्याने विद्युत कंपनीच्या विरोधी ग्राहकमंचामध्ये केस दाखल करणार असून अंजनगाव बारी परिसरातील १२ गावातील ग्राहक आक्रमक झाले आहेत. विद्युत बिलांमध्ये दुरुस्ती केली गेली तरच भरणार अन्यथा ग्राहकमंचाकडे तक्रार करण्याचा ईशारा ग्राहकांनी दिला आहे. वीज वितरण कंपनीने चुकीचे बिल न देता रिडींगप्रमाणे बिल देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे. येथील हनुमान मंदिरापासून विद्युत तारा लोंबकळल्यामुळे अपघात होऊ शकतो. अंजनगाव बारी हनुमान मंदिराच्या पोलपासून डॉक्टर हटवार यांचे घरापर्यंत पोलवरील विद्युत तारा ७ फूटांवर खाली आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या बैल बंड्या व अन्य वाहनांना अपघात होऊ शकतो. विद्युत वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांना दोन वेळा सूचना देऊनही पोलवरील लोंबकळलेले तार ओढले नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. तब्बल तीन महिने उलटूनही दुरुस्ती केली गेली नाही. वीज वितरण कंपनीशी संबंधित अनेक तक्रारींचे निवारण झाले नसल्याने तारा जमिनीपासून सात फुटांवर आल्या आहेत. ग्राहकांकडून लाखो रूपयांची वीज बिल वसुली करणाऱ्या विद्युत कंपनीने आधी तक्रारींचा निपटारा करावा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.