शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

बेशिस्त वाहतूक ठरली तरूणीचा काळ

By admin | Updated: December 3, 2015 00:17 IST

येथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला.

दर्यापूर पोलिसांचे दुर्लक्ष : चौकात अवैध वाहतूक फोफावली, कृष्णालीचा हृदयद्रावक मृत्यू संदीप मानकर दर्यापूरयेथील आदर्श हायस्कूलजवळ मंगळवारी निष्पाप तरुणीचा वाहन अपघातात घटनास्थळीच बळी गेला. तरूणीच्या अकाली मृत्यूसाठी बेशिस्त वाहतूकच जबाबदार असल्याची भावना दर्यापूरकर नागरिकांनी व्यक्त केली आहे. कृष्णाली विनायकराव घाटे (२२ रा. सहकारनगर) या तरुणीचा एकता हॉस्पीटलसमोर दुर्देवी मृत्यू झाला. परंतु एकता हॉस्पीटल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघाताची घटना कैद झाली आहे. उजवीकडून नियमबाह्य पध्दतीने छोटी आॅटोरिक्षा आल्याने समोरुन येणाऱ्या कटलाधारकाची अडचण झाली. दरम्यान दुचाकीधारक तरूणीने कटल्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता एका डॉक्टरचेही वाहन आले. दोघांनाही मागून येणारा ४०७ ट्रक न दिसल्याने दुचाकीस्वार मुलगी उजव्या बाजूला पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकात येवून चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात डॉक्टर व मृत युवतीची बहिण जखमी झाली. या अपघातानंतर अख्खे दर्यापूर शहर खडबडून जागे झाले आहे. दर्यापूर शहरात भरधाव वाहनधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथील मुख्य चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे सामान्यांना पायी चालताना सुध्दा तारेवरची कसरत करावी लागते. परंतु नो-पार्किंग झोनमध्ये वाहने लावणाऱ्या वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात येत नाही. येथील बसस्थानक चौकात तीन हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या समोर मुख्य रस्त्यावर नागरिक रस्त्याच्या कडेपर्यंत वाहने उभी करतात. येथील मुख्य चौकात फळविक्रेत्यांनी भर रस्त्यावर दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सहा महिन्यांपूर्वी एका चारचाकी वाहनाचे स्टेअरिंग लॉक झाल्याने ही गाडी दुकानात शिरली होती. एसटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बससुध्दा हॉटेलमध्ये शिरल्याची घटना ताजीच आहे. येथील रेल्वे फाटकाजवळ अतिक्रमित जागेत अनेकांनी दुकाने थाटली आहेत. आॅटोरिक्षाच्या दुरूस्तीचे काम करणाऱ्या एका मॅकेनिकने तर रस्त्याच्या मधोमध आॅटोरिक्षा उभी करण्याचा सपाटा लावला आहे. कारवाई होेत नसल्याने त्याची हिंमत बरीच वाढली आहे. रेल्वे फाटक, सांगळूदकर कॉम्प्लेक्स तसेच आकोट नाका रस्त्यावर कुठेही काळी-पिवळी मॅजिकव्हॅन व ईतर वाहने बेशिस्तरित्या उभी असतात व नियमांचे उल्लंघन करतात. परंतु पोलीस त्यांच्यावर थातुरमातूर कारवाई करुन सोडून देतात. दोन वर्षांपूर्वी बसस्थानक चौकात शिरलेल्या आॅटोरिक्षा व अन्य वाहने पोलिसांनी बाहेर काढून त्यांना अमरावती, मूर्तीजापूर रस्त्यावर अधिकृत जागा दिली होती. त्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात घट झाली होती. परंतु आता पुन्हा त्यांनी बसस्थानक चौकासमोर त्यांचा ठिय्या केला आहे. अवैध रेतीतस्करही शहरातून बेशिस्त वाहतूक करतात. यानंतरे मोठे अपघात टाळायचे असतील तर बेशिस्त वाहतुकीला लगाम लावणे पोलिसांचे कर्तव्य महत्वाचे राहाणार आहे. अशा वाहनचालकाविरुध्द कारवाई करणे गरजेचे आहे.